शहरं
Join us  
Trending Stories
1
'कुठून मी या पुण्याचा पालकमंत्री झालो, जो तो उठतो अन्...'; अजित पवारांनी जोडले हात, असं काय घडलं?
2
'एकाच घराच्या पत्त्यावर 80 मतदार आहेत, कारण..."; राहुल गांधींचा आरोप, बूथ लेव्हल ऑफिसरने केला खुलासा 
3
'भारत आता कुणासमोरही झुकणार नाही', 'ट्रम्प टॅरिफ बॉम्ब'वर केंद्रीय मंत्री पीयुष गोयल काय बोलले?
4
"दिल्लीत ठाकरेंचा मान काय ते लक्षात आलं, आमच्यासोबत असताना ते..."; CM देवेंद्र फडणवीसांचा ठाकरेंवर बाण
5
'माझे मित्र पुतिन...', ट्रम्प यांच्या टॅरिफ वॉर दरम्यान PM मोदींनी रशियन राष्ट्राध्यक्षांशी संवाद साधला; भारत भेटीचे आमंत्रण दिले
6
"...नाहीतर भारताने अमेरिकेला गुड बाय म्हणावं"; शशी थरूर यांचा मोदी सरकारला मोलाचा सल्ला
7
'मतदार याद्यांमध्ये घोळ, आम्हालाही मान्य; आमची मागणी होती की...", CM फडणवीसांचं मोठं विधान
8
Nashik: पती-पत्नीने एक्स्प्रेस ट्रेनसमोर उडी मारत आयुष्य संपवले, लग्नाला झाली होती ११ वर्ष
9
Donald Trump Tariff News : ट्रम्प यांच्या टॅरिफविरोधात भारत 'अ‍ॅक्शन'मोडवर ! अमेरिकेकडून शस्त्र खरेदी थांबवली, राजनाथ सिंह यांचा USA दौराही पुढे ढकलला
10
'महादेवी हत्तीणीवर उपचार करण्यासाठी महाराष्ट्रात एकही केंद्र नाही', 'पेटा'ने जाहीर केली भूमिका
11
सरकारने आयकर विधेयक २०२५ मागे घेतले; टॅक्स स्लॅबमध्ये काय बदल होणार? जाणून घ्या...
12
तेल कंपन्यांना 30,000 कोटींचे अनुदान, उज्ज्वला योजनेसाठी...; केंद्र सरकारने घेतले पाच मोठे निर्णय
13
ज्या आदित्य श्रीवास्तवचं नाव घेऊन राहुल गांधींनी ECI ला घेरले; तोच आता समोर आला, सांगितलं 'सत्य'
14
DPL 2025 च्या नव्या हंगामात प्रितीच्या 'हिरो'नं केली हवा! १९८ च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या १११ धावा
15
Eknath Shinde : ज्यांनी स्वाभिमान गुंडाळून ठेवला, त्यांचं....; उद्धव ठाकरेंना मागची जागा दिल्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
16
राहुल गांधींच्या आरोपानंतर काँग्रेस आक्रमक; दादरमध्ये रास्ता रोको, भाजपाविरोधात घोषणाबाजी
17
NASA : नासाचा मोठा निर्णय! इंटरनॅशनल स्पेस स्टेशन समुद्रात पाडणार! कारण ऐकून धक्का बसेल
18
अतुल परचुरेंच्या आठवणीत भावुक झाले दिलीप प्रभावळकर; म्हणाले, "डॉक्टरांनी त्याला..."
19
IND vs AUS: टीम इंडियाविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर, भारतीय वंशाच्या दोन खेळाडूंना संधी!
20
हृदयस्पर्शी! "तुम्ही माझ्यासाठी श्रीकृष्णासारखे..."; महिलेने साडी फाडून मुख्यमंत्र्यांना बांधली राखी

कळंब-बोरगाव रस्त्याचे निकृष्ट काम पाडले बंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2018 00:09 IST

कर्जत तालुक्यातील कळंब-बोरगाव रस्त्यावर अनेक वर्षांनंतर रस्त्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे;

- कांता हाबळे नेरळ : कर्जत तालुक्यातील कळंब-बोरगाव रस्त्यावर अनेक वर्षांनंतर रस्त्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे; परंतु हे काम निकृष्ट दर्जाचे असल्याने हे काम उंबरखांड आणि बोरगाव ग्रामस्थांनी आंदोलनाचा पवित्रा घेऊन पोलिसांच्या मदतीने बंद पाडले आहे.कळंब-बोरगाव या एक कि.मी.च्या रस्त्याचे काम गेले दोन दिवस सुरू आहे. या संदर्भात ग्रामस्थांनी कामाची पाहणी केल्यानंतर या पूर्वीच्या रस्त्यावर डांबर न टाकता केवळ खडी टाकण्याचे काम सुरू होते. याबाबत ग्रामस्थ एकनाथ खडेकर, दत्ता खडेकर व इतर ग्रामस्थ मंडळींनी याबाबत जाब विचारला असता ठेकेदारांनी अरेरावी केली व तुम्हाला कुणाकडे तक्रार करायची ती करा, असे उत्तर दिले. याबाबत ग्रामस्थांनी पत्रकारांना बोलावून सदर रस्त्याचे काम निकृष्ट असल्याचे खडी बाजूला करून दाखवून दिले.>ग्रामस्थ आंदोलनाच्या पावित्र्यातकळंब-बोरगाव या रस्त्याला तात्पुरता पर्यायी मार्ग असतानाही ठेकेदारांनी हे काम रात्री उशिरा अतिशय घाईत उरकण्यास सुरुवात केल्याने ग्रामस्थ संतापले व त्यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला. या रस्त्याने उंबरखाड, बोरगाव, कळंब व आदिवासी वाड्यातील प्रवासी ये-जा करीत असतात; पण रस्त्यावर चुकीच्या पद्धतीने खडी अंथरून काम सुरू केले होते.या ग्रामीण भागातील रस्त्यावर दहा ते पंधरा वर्षे पुन्हा रस्त्याचे काम होत नाही. ठेकेदार निकृष्ट दर्जाचे काम करतात. त्यामुळे लगेचच हा रस्ता उखडतो आणि रस्त्यावर पुन्हा खड्डे पडतात, म्हणूच ग्रामस्थांनी हे निकृष्ट दर्जाचे काम पाहत पोलिसांच्या मदतीने बंद पाडले. पुन्हा चांगल्या दर्जाचा रस्ता तयार करण्याची मागणी केली आहे.सदर कामाची पाहणी करून त्या रस्त्याचे काम व्यवस्थित करण्यात येईल. या रस्त्याचे काम त्वरित थांबवण्याबाबत संबंधित ठेकेदारांना कळविण्यात आले आहे. सदर रस्ता ग्रामस्थांच्या मागणीप्रमाणे कार्यादेशानुसार करण्यात येईल.- के. ए. केदारे, उप अभियंता, रायगड जिल्हा परिषद,बांधकाम विभागसदर रस्त्यावर कुठेही डांबर टाकलेले दिसत नाही. रस्त्याचे काम निकृष्ट आहे. याबाबत काम करणाऱ्या ठेकेदारांना विचारणा केली असता त्यांनी अरेरावीची भाषा केली. सदर रस्त्याचे काम मंगळवारी रात्री ७ वाजेपर्यंत अंधारात चालू होते. यावरून काम किती घाईत उरकण्यात आले आहे याची कल्पना येते. हा रस्ता ग्रामस्थांच्या उपस्थितीत व्यवस्थित करून द्यावा.- दत्तात्रेय खडेकर,ग्रामस्थ, बोरगाव