शहरं
Join us  
Trending Stories
1
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
2
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
3
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
4
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
5
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
6
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
7
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
8
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
9
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
10
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
11
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
12
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
13
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
14
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
15
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
16
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
17
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
18
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
19
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
20
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त

कळंब-बोरगाव रस्त्याचे निकृष्ट काम पाडले बंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2018 00:09 IST

कर्जत तालुक्यातील कळंब-बोरगाव रस्त्यावर अनेक वर्षांनंतर रस्त्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे;

- कांता हाबळे नेरळ : कर्जत तालुक्यातील कळंब-बोरगाव रस्त्यावर अनेक वर्षांनंतर रस्त्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे; परंतु हे काम निकृष्ट दर्जाचे असल्याने हे काम उंबरखांड आणि बोरगाव ग्रामस्थांनी आंदोलनाचा पवित्रा घेऊन पोलिसांच्या मदतीने बंद पाडले आहे.कळंब-बोरगाव या एक कि.मी.च्या रस्त्याचे काम गेले दोन दिवस सुरू आहे. या संदर्भात ग्रामस्थांनी कामाची पाहणी केल्यानंतर या पूर्वीच्या रस्त्यावर डांबर न टाकता केवळ खडी टाकण्याचे काम सुरू होते. याबाबत ग्रामस्थ एकनाथ खडेकर, दत्ता खडेकर व इतर ग्रामस्थ मंडळींनी याबाबत जाब विचारला असता ठेकेदारांनी अरेरावी केली व तुम्हाला कुणाकडे तक्रार करायची ती करा, असे उत्तर दिले. याबाबत ग्रामस्थांनी पत्रकारांना बोलावून सदर रस्त्याचे काम निकृष्ट असल्याचे खडी बाजूला करून दाखवून दिले.>ग्रामस्थ आंदोलनाच्या पावित्र्यातकळंब-बोरगाव या रस्त्याला तात्पुरता पर्यायी मार्ग असतानाही ठेकेदारांनी हे काम रात्री उशिरा अतिशय घाईत उरकण्यास सुरुवात केल्याने ग्रामस्थ संतापले व त्यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला. या रस्त्याने उंबरखाड, बोरगाव, कळंब व आदिवासी वाड्यातील प्रवासी ये-जा करीत असतात; पण रस्त्यावर चुकीच्या पद्धतीने खडी अंथरून काम सुरू केले होते.या ग्रामीण भागातील रस्त्यावर दहा ते पंधरा वर्षे पुन्हा रस्त्याचे काम होत नाही. ठेकेदार निकृष्ट दर्जाचे काम करतात. त्यामुळे लगेचच हा रस्ता उखडतो आणि रस्त्यावर पुन्हा खड्डे पडतात, म्हणूच ग्रामस्थांनी हे निकृष्ट दर्जाचे काम पाहत पोलिसांच्या मदतीने बंद पाडले. पुन्हा चांगल्या दर्जाचा रस्ता तयार करण्याची मागणी केली आहे.सदर कामाची पाहणी करून त्या रस्त्याचे काम व्यवस्थित करण्यात येईल. या रस्त्याचे काम त्वरित थांबवण्याबाबत संबंधित ठेकेदारांना कळविण्यात आले आहे. सदर रस्ता ग्रामस्थांच्या मागणीप्रमाणे कार्यादेशानुसार करण्यात येईल.- के. ए. केदारे, उप अभियंता, रायगड जिल्हा परिषद,बांधकाम विभागसदर रस्त्यावर कुठेही डांबर टाकलेले दिसत नाही. रस्त्याचे काम निकृष्ट आहे. याबाबत काम करणाऱ्या ठेकेदारांना विचारणा केली असता त्यांनी अरेरावीची भाषा केली. सदर रस्त्याचे काम मंगळवारी रात्री ७ वाजेपर्यंत अंधारात चालू होते. यावरून काम किती घाईत उरकण्यात आले आहे याची कल्पना येते. हा रस्ता ग्रामस्थांच्या उपस्थितीत व्यवस्थित करून द्यावा.- दत्तात्रेय खडेकर,ग्रामस्थ, बोरगाव