शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
2
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
3
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
4
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
5
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
6
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
7
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
8
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...
9
Airtel Down! कॉल आणि इंटरनेटवर परिणाम; हजारो युजर्सनी नोंदवल्या तक्रारी
10
आता Zepto वर १० मिनिटांत मिळणार प्लॉट? 'या' रिअल इस्टेट कंपनीसोबत केला मोठा करार
11
'वरण भात म्हणजे गरिबांचं जेवण', विवेक अग्निहोत्रींच्या वक्तव्यावर मराठी अभिनेत्रीचा संताप
12
प्रीमियम लक्झरीमध्ये 'स्पोर्टी' टच! टोयोटा कॅमरीची नवीन 'स्प्रिंट एडिशन' भारतात लॉन्च
13
Sarfaraz Khan Century : ज्याला टीम इंडियातून बाहेर काढलं; त्या पठ्ठ्यानं संधी मिळताच शतक ठोकलं
14
Vladimir Putin High-Level Security : पुतिन यांची 'विष्ठा'ही परत नेली रशियात, अलास्काच्या दौऱ्यात लघवीसाठी होती खास सुटकेस; कारण...
15
'त्यांचा दीर्घ अनुभव देशाच्या कामी येणार', सीपी राधाकृष्णन यांच्या भेटीनंतर PM मोदींची प्रतिक्रिया
16
Maharashtra Rain: अचानक इतका पाऊस का पडतोय? अजून किती दिवस पावसाचा जोर कायम राहणार?
17
पोलीस कॉन्स्टेबलचा पत्नी-मुलावर तलवारीनं हल्ला; मग स्वत: धावत्या ट्रेनसमोर घेतली उडी, त्यानंतर...
18
CCTV देणं प्रायव्हेसी उल्लंघन कसं?; दिल्लीत पत्रकार परिषद घेत विरोधकांचा ECI वर हल्लाबोल
19
सलग ४३ व्या दिवशी 'या' शेअरला अपर सर्किट; किंमत ₹१०० पेक्षाही कमी, २ महिन्यांत केलं मालामाल
20
Aja Eakadashi 2025: श्रावणातले अजा एकादशीचे लाभदायी व्रत; का आणि कसे करावे? वाचा!

कर्जत तालुक्यातील पूल धोकादायक

By admin | Updated: July 16, 2017 02:51 IST

कर्जत तालुक्यातील अनेक छोट्या-मोठ्या पुलांची अवस्था धोकादायक असून, पुलांचे संरक्षक कठडे अनेक वर्षांपासून तुटलेले आहेत. काही पुलांवरील रेलिंग गायब झाली आहेत.

- कांता हाबळे । लोकमत न्यूज नेटवर्कनेरळ : कर्जत तालुक्यातील अनेक छोट्या-मोठ्या पुलांची अवस्था धोकादायक असून, पुलांचे संरक्षक कठडे अनेक वर्षांपासून तुटलेले आहेत. काही पुलांवरील रेलिंग गायब झाली आहेत. तर काही पुलांवर अद्याप संरक्षक कठडेच नसल्याने अपघाताची दाट शक्यता आहे; परंतु याकडे लक्ष देण्यास बांधकाम विभागाला वेळ मिळत नसल्याने अपघात झाल्यास जबाबदार कोण? असा प्रश्न चालक व प्रवाशांकडून उपस्थित केला जात आहे.तालुक्यातील काही पूल हे सार्वजनिक बांधकाम खाते व काही पूल हे जिल्हा परिषद बांधकाम खात्यांतर्गत येतात. या पुलांकडे ना सार्वजनिक बांधकाम खात्याचे लक्ष, ना जिल्हा परिषद बांधकाम खात्याचे, त्यामुळे पुलांची दुर्दशा झाली आहे. तालुक्यातील पोशीर नदीवरील माले पूल, सालोख, वारे-कुरुंग रस्त्यावरील पूल, दहीवली पूल, मिरचोली पूल, मोहिली पूल, तलवडे पूल, अशा अनेक पुलांवरील संरक्षक कठडे व रेलिंग गायब आहेत. तर अनेक छोट्या-मोठ्या पुलांवर अद्याप संरक्षक कठडे बसवण्यात आलेले नाहीत. पुलावरील रस्तेही खराब झाल्याने प्रवास धोकादायक बनला असून, जीवघेणा ठरू शकतो.पुलांवरील तुटलेली व गायब झालेली रेलिंग बसविण्याची मागणी अनेक वर्षांपासून होत आहे. अनेक वेळा रस्त्यांची डागडुजी केली जाते; परंतु पुलांच्या दुरुस्तीकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे प्रवासी व वाहनचालकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतो. त्यामुळे बांधकाम विभाग आणि स्थानिक लोकप्रतिनिधींनी लक्ष घालून लवकरात लवकर असे पूल दुरु स्त करावेत, अशी मागणी चालक, प्रवासी व स्थानिकांकडून होत आहे. कर्जत तालुक्यातील पुलावरील तुटलेल्या रेलिंग संदर्भात वर्षभरापूर्वी दुरु स्ती प्रस्ताव शासनाकडे पाठवला आहे; मंजुरी मिळाली की पुलाच्या रेलिंगची दुरु स्ती करण्यात येईल व अन्य नादुरु स्त पुलांचीही पाहणी करण्यात येईल. - चंद्रशेखर सहनाल, उप अभियंता, सा. बा. विभाग कर्जतकर्जत तालुक्यातील अनेक पूल धोकादायक अवस्थेत असल्याने वाहन चालवणे कठीण झाले आहे. त्यामुळे बांधकाम विभागाने पुलांवरील रेलिंग लवकरात लवकर बसवाव्या, जेणेकरून अपघात होऊ नये.- मच्छींद्र्र मसणे, वाहनचालकपुलावरील तुटलेले संरक्षक पाइप बसविण्यासाठी बांधकाम विभागाकडे गतवर्षी तक्र ार केली होती; परंतु बांधकाम विभागाने अद्याप या संदर्भात कोणतीही उपाययोजना केली नाही. पुन्हा एकदा बांधकाम विभागाला कळविले जाईल. - सुदाम पेमारे, जिल्हा परिषद, सदस्य तुटलेल्या पुलांवरील आणि गायब झालेल्या संरक्षक पाइप बसविण्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींनी बांधकाम विभागाकडे पाठपुरावा करणे गरजेचे आहे. अनेक वर्षांपासून पुलांवरील तुटलेले पाइप बसविण्यात येत नाहीत, याला लोकप्रतिनिधी जबाबदार आहेत.- प्रवीण शिंगटे, प्रवासी