शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
2
IND vs PAK: गंभीरनं टीम इंडियातील खेळाडूंना स्पष्ट सांगितलंय की...; सहाय्यक कोच नेमकं काय म्हणाले?
3
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
4
Asia Cup 2025 Points Table : भारत-पाक लढतीआधी लंकेची विजयी सलामी! तरीही अफगाणिस्तान ठरले भारी!
5
नेपाळ हिंसाचारासंदर्भात CM योगी आदित्यनाथ यांचं मोठं विधान; म्हणाले - "छोट्या-छोट्या गोष्टींकडे..."
6
BAN vs SL : श्रीलंकेचा डंका! एका पराभवासह बांगलादेश संघ स्पर्धेतून OUT होण्याच्या उंबरठ्यावर
7
चार दिवसांत थंड व्हाल, हिंम्मत असेल तर कारागृहात पाठवून दाखवा; प्रशांत किशोर यांचं संजय जायसवाल यांना आव्हान
8
२०७ खुनाचा आरोप, तिला पकडण्यासाठी होते २ कोटींचे इनाम ! पण तिच्या 'या' निर्णयाने तिलाच मिळतील २५ लाख
9
कमाल झाली! हसरंगाचा बॉल स्टंपला लागला, पण नशिबाच्या जोरावर बॅटर Not Out राहून चमकला (VIDEO)
10
शेअर असावा तर असा...! 5 वर्षांत लखपतींना केलं करोडपती; TV-AC अन् वॉशिंग मशीन तयार करते कंपनी
11
"होय, मतचोरी झाली !" मत चोरीतूनच भाजप सत्तेत; काँग्रेसच्या आरोपाला नक्षल्यांचे समर्थन
12
Women's Asia Cup 2025 Final : भारताची फायनलमध्ये धडक! चीनचा हिशोब चुकता करुन इतिहास रचण्याची संधी
13
IND vs PAK Head To Head Record : पाकचा नवा डाव; पण टीम इंडियाविरुद्ध फिकी ठरेल त्यांची ही चाल, कारण...
14
लाईफबॉय साबण ८, डव शाम्पू ५५, टूथपेस्ट १६ रुपयांनी स्वस्त झाली; हिंदुस्तान युनिलिव्हरची यादी आली...   
15
आता पश्चाताप करून काय उपयोग? रोखण्याचा प्रयत्न करूनही तरुणीनं खोल पाण्यात उडी घेतली; थरकाप उडवणारा VIDEO
16
सासऱ्यावर गोळी झाडली, स्वतःला वाचवण्यासाठी पळत सुटला अन् पुराच्या पाण्यात पडला जावई! पुढे जे झालं...
17
असुरक्षित! पहाटे पुणे स्टेशनला उतरलेल्या तरुणाने पैसे न दिल्याने पोटात चाकूने वार
18
उल्हासनगरातील हॅन्ड्रेड बारमध्ये महिला वेटर्सचे अश्लील चाळे, महिला वेटर्ससह ९ जणांवर गुन्हा 
19
घरात ‘टॉप टू बॉटम’ डॉक्टर ; पण आयएएस झाले आणि लोकसेवेत आले...
20
योगेश आळेकरी यांना मिळाली नवीकोरी दुचाकी; पुढच्या प्रवासाला सुरुवात करणार पण...

शेकापच्या पाठबळावर फिरतेय राजकारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2019 01:02 IST

स्थानिक राजकारणावर शेतकरी कामगार पक्षाचाच प्रभाव असल्याने तो पक्ष ज्याच्यासोबत त्याची स्थिती तुलनेने दिलासादायक असल्याचा प्रत्यय या निवडणुकीतही येतो आहे.

- जयंत धुळपप्रकल्पांचा जिल्हा म्हणून ओळख बनलेल्या रायगडवरील वर्चस्वासाठी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस कितीही झुंजत असली, तरी येथील स्थानिक राजकारणावर शेतकरी कामगार पक्षाचाच प्रभाव असल्याने तो पक्ष ज्याच्यासोबत त्याची स्थिती तुलनेने दिलासादायक असल्याचा प्रत्यय या निवडणुकीतही येतो आहे.चारवेळा निवडून आलेले अनंत गिते यांना प्रस्थापितांविरोधी नाराजीचा सामना करावा लागतो आहे. मागील निवडणुकीत त्यांना दिलेला पाठींबा काढून घेत निसटता पराभव पत्करावा लागलेले राष्ट्रवादीचे सुनील तटकरे यांच्यासोबत यावेळी शेकाप आहे. त्यासाठी त्यांनी राष्ट्रवादी, त्यांच्या नेत्यांशी पूर्वी असलेले वाद मिटवले आहेत.रायगडमध्ये आलेले किंवा येऊ घातलेले प्रकल्प, त्यातील विस्थापित, रेल्वेचे रखडलेले प्रकल्प, जलवाहतूक किंवा बंदरांचे प्रश्न यापैकी एकही मुद्दा ठळकपणे प्रचारात नाही. मुंबई-गोवा महामार्गाचा मुद्दा काही प्रमाणात सभा गाजवतो, पण तेवढ्यापुरताच. गीतेंनी तटकरेंच्या कथित भ्रष्टाचारावर प्रचारात भर दिला आहे, तर तटकरेंनी गीतेंच्या निष्क्रियतेवर. मंत्रीपद असूनही गीते एकही मोठा उद्योग किंवा प्रकल्प आणू न शकल्यावर आणि त्यामुळे बेरोजगारीचा प्रश्न सुटत नसल्यावर त्यांचा भर आहे. रत्नागिरी जिल्ह्याचा जो भाग या मतदारसंघात येतो, तेथे फळबागायतदारांचा प्रश्न काहीसा चर्चेत येतो. त्यामुळे प्रचारात ठोस मुद्यांचा अभाव आहे. खासदारांची कामे, त्यांच्याकडून असलेल्या अपेक्षा, केंद्र सरकारची कामगिरी- तेथून जिल्ह्याला काय मिळाले, यासारखे मुद्दे गौण होत वैयक्तिक हेवेदावे, उमेदवारांची क्षमता-दर्जा याभोवती भाषणे फिरताना दिसतात.

राष्ट्रवादीतील वाद मिटवण्याबरोबरच शेकापचा पाठींबा, काँग्रेसची नाराजी दूर करण्यात वेळीच यश आल्याचा परिणाम तटकरेंच्या प्रचारावर दिसतो आहे. रायगड जिल्ह्याच्या मोजका भाग वगळता भाजप हवा तितका प्रबळ नसल्याने शिवसेनेला या मतदारसंघात एकाकी खिंड लढवावी लागते आहे. युतीतील पक्ष म्हणून भाजप, त्यांचे नेते सोबत आहेत, पण त्याचा परिणाम रत्नागिरीत तुलनेने अधिक दिसतो आहे. नवमतदारांचे प्रमाण वाढते असूनही प्रचारसभांत तरूणांची संख्या नगण्य असल्याचे अस्वस्थ करणारे चित्र या मतदारसंघात पाहायला मिळते.
>भ्रष्टाचारी व्यक्तीला रायगड-रत्नागिरीचे मतदार खासदार म्हणून कधीही निवडून देणार नाहीत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे आपल्या देशाचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचले आहे. बलशाली भारत बनवायचा असेल, तर देशाचे नेतृत्व पुन्हा एकदा मोदींकडे असणे आवश्यक आहे.- अनंत गीते, शिवसेना>मतदारांना नेहमी फसवता येत नाही. निष्क्रीय खासदार सर्वांना अनुभवण्यास मिळाले. त्यांना रायगडचा मतदार पुन्हा स्वीकारणार नाही. माझ्या कारकिर्दीत आणलेल्या कोट्यवधी रुपयांच्या निधीतून केलेली विकासकामे मतदारांसमोर आहेत. डुप्लिकेट उमेदवार कितीही उभे केले, तरी माझा विजय नक्की.- सुनील तटकरे, राष्ट्रवादी>कळीचे मुद्देमुंबई- गोवा राष्ट्रीय महामार्गाचे अपूर्णावस्थेतील काम आणि कोकण रेल्वेच्या गंभीर बनत गेलेल्या विविध समस्या.अवजड उद्योगमंत्री असतानाही गीतेंनी एकही कारखाना, मोठा उद्योग आणला नाही. बेरोजगारी कमी होण्याऐवजी प्रचंड वाढल्याची टीका.

टॅग्स :Maharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019raigad-pcरायगडAnant Geeteअनंत गीते