शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

अधिकाऱ्यांना चिरीमिरी दिल्याखेरीज प्रवासी भत्त्याची रक्कम मिळत नसल्याची पोलिस पाटलांची खंत

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2023 17:37 IST

मानधनाच्या वाढीसाठी शासनाविरोधात संघर्ष करण्याची पोलिस पाटील संघटनेची घोषणा

मधुकर ठाकूर, उरण : शासनाकडून राज्यातील पोलिस पाटलांना देण्यात येणारे साडेसहा हजार रुपयांचे  मानधन महागाईच्या दृष्टीने फार कमी आहे. त्यामुळे पोलीस पाटलांच्या मानधन वाढीचा आणि इतर मागण्यांच्या पुर्ततेसाठी संघटनेच्या माध्यमातून आवाज उठविणार असल्याची घोषणा महाराष्ट्र राज्य पोलीस पाटील संघटनेचे अध्यक्ष पंढरीनाथ पाटील यांनी चिरनेर येथील आयोजित बैठकीतून केली. न्यू महाराष्ट्र राज्य गाव कामगार पोलीस पाटील संघटनेच्या वतीने पोलीस पाटलांच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते.चिरनेर येथील ग्रामपंचायतीच्या सभागृहात रविवारी (१)  महाराष्ट्र राज्य पोलीस पाटील संघटनेचे अध्यक्ष पंढरीनाथ पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आलेल्या सभेत ते बोलत होते.

या सभेत बोलताना पंढरीनाथ पाटील यांनी कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस पाटील हे पोलीस यंत्रणेला कायमच मदत करीत असतात. प्रशासन व समाज यामधील पोलीस पाटील हा दुवा आहे. त्यामुळे पोलीस पाटील यांची कामगिरी आणि कार्यक्षमता यांचे मूल्यांकन करणे गरजेचे असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले.यावेळी शासनाच्या धोरणावर त्यांनी जोरदार आसुड ओढताना पूर्वीच्या काळात पोलीस पाटील हे तूटपूंज्या  मानधनावर आपले कुटुंब चालवत होते. मात्र बऱ्याच वर्षांनी पोलिस पाटलांच्या मानधनात वाढ झाली आहे. सध्या मिळणारे मानधन साडेसहा हजार रुपयांचे असले तरी हे मानधन महागाईच्या दृष्टीने फारच कमी आहे. त्यामुळे शासनाने पोलीस पाटलांच्या मानधन वाढीचा आणि इतर मागण्यांचा विचार करण्याची वेळ येऊन ठेपली आहे.

यासाठी संघटनेच्या माध्यमातून शासनाविरोधात आवाज उठविणार असल्याचे पंढरीनाथ पाटील यांनी यावेळी जाहीर केले. तर यावेळी कोकण प्रांत अध्यक्ष संजय पाटील यांनी मनोगत व्यक्त करताना लोकाभिमुख, पारदर्शकता व कामात गती आणण्यासाठी पोलीस पाटील पदाचे महत्त्व वाढविण्याची आवश्यकता आहे.पोलीस पाटीलांनी गाव, ग्रामपंचायत व पोलीस यंत्रणेच्या संपर्कात रहा, लोकांचा विश्वास संपादन करा असे आवाहन संजय पाटील यांनी केले.

यावेळी अनेक पोलीस पाटलांनी त्यांना भेडसावत असणाऱ्या व्यथा मांडल्या.प्रवास भत्ता प्राप्त करण्यासाठी पोलीस पाटलांना शासन दरबारी अनेक खेपा घालाव्या लागतात.अधिकारी प्रवास भत्ता काढण्यासाठी सरळ पैशाची मागणी करतात. चिरीमिरी दिल्याशिवाय ते प्रवास भत्त्याचे पैसेच हातात देत नाहीत.हे थांबायला पाहिजे अशी खंतही अनेक पोलीस पाटलांनी जाहीर सभेतून व्यक्त केली. यावेळी उपस्थित अनेक पोलीस पाटलांनी विशेष लक्षवेधी सूचनाही मांडल्या.

या आयोजित करण्यात आलेल्या सभेसाठी रायगड जिल्हा अध्यक्ष महादूदादा पाटील, उत्तर विभागीय अध्यक्ष रामदास म्हात्रे,  रायगड जिल्हा कार्याध्यक्ष  राम सावंत, रायगड जिल्हा उपाध्यक्ष श्रीधर गोळे, सहसचिव लक्ष्मण पाटील, नवी मुंबईचे अध्यक्ष संजय पाटील, तालुका सहसचिव उमेश गोंधळी, सुधागड तालुका सचिव महेश शिरसे, मुख्य संघटक सुरेश सोनावणे, खजिनदार नरेश तुपे, सहाय्यक पोलीस निरीक्षक उमाकांत भोईर, सहखजिनदार संतोष मोकल, उरण संपर्क प्रमुख प्रमोद आगलावे, उरण तालुका अध्यक्ष रंगनाथ पाटील, उरण तालुका माजी अध्यक्ष शांताराम म्हात्रे, कर्जतच्या अध्यक्षा सुरेखा मराठे, रायगड जिल्हा कमिटीच्या मालती पायगुडे, रायगड जिल्हा सदस्या सुरेनी कोळी, उरण  तालुका उपाध्यक्षा सुनीता ठाकूर, पोलीस पाटील सुरेखा फेगडे, पोलीस पाटील ज्योती घरत, पोलीस पाटील भक्ती चव्हाण, पोलीस पाटील शुभांगी पाटील, पोलीस पाटील सुजाता पाटील, पोलीस पाटील रेखा दिसले, पोलीस पाटील अनिता आदईकर, पोलीस पाटील जोत्सना म्हसकर, पोलीस पाटील दत्ताराम गोंधळी, पोलीस पाटील विनायक मोकल, पोलीस पाटील  दीपक म्हात्रे तसेच रायगड जिल्ह्यातील पोलीस पाटील व राज्य पदाधिकारी मोठ्या संख्येने  उपस्थित होते.

टॅग्स :uran-acउरण