शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
3
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
4
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
5
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
6
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
7
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
8
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
9
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
10
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
11
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
12
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
13
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
14
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
15
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
16
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
17
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
18
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
19
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
20
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!

वसईत रस्त्यावरील भंगार, बेवारस वाहनांवर पोलिसांची कारवाई सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2020 23:34 IST

गेल्या चारपाच दिवसांपासून अशा गाड्या उचलण्यासाठी वाहतूक पोलिसांनी विशेष मोहीम हाती  घेतली आहे.

नालासोपारा : वसई-विरार शहरांतील गर्दी होणाऱ्या रस्त्यांच्या कडेला हजारो बेवारस आणि भंगार वाहनांमुळे नागरिकांना चालण्यास त्रास सहन करावा लागत आहे. या गाड्यांमुळे वाहतूककोंडी आणि पार्किंगची समस्या वाढली आहे. यामुळे गेल्या चारपाच दिवसांपासून अशा गाड्या उचलण्यासाठी वाहतूक पोलिसांनी विशेष मोहीम हाती  घेतली आहे.

काही दिवसांपूर्वी मुंबई हायकोर्टाने रस्त्याच्या कडेला असलेली बेवारस वाहने हटविण्यासाठी आणि नो-पार्किंग झोनमध्ये अनधिकृतपणे वाहने पार्क केली जातात, त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी आदेश जाहीर केला होता. वसई-विरार शहर महानगरपालिकेकडे पार्किंग झोन नसल्यामुळे वाहतूक पोलिसांना कारवाई कशी करावी, हा प्रश्न पडला होता. मुंबई हायकोर्टाच्या आदेशानंतरही वसई तालुक्यातील अनेक रस्त्यांच्या कडेला अशी वाहने बिनधास्तपणे पडलेली असूनही वसई-विरार महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी बघ्याची भूमिका घेतली होती. मात्र, चारपाच दिवसांपासून वाहतूक पोलिसांनी अशी वाहने उचलण्यास सुरुवात केली आहे.

वसई, विरार, नालासोपारा या शहरांतील अनेक रस्त्यांच्या कडेला कित्येक महिन्यांपासून भंगार गाड्या पडलेल्या असल्याने सर्वत्र घाण पसरत होती. नागरिक या भंगार गाड्यांवर कचऱ्याच्या पिशव्या फेकत होते. साफसफाई कर्मचारी हे कचरा उचलत नसल्याने कचरा सडून दुर्गंधी पसरली असल्याने मच्छरांची पैदाससुद्धा वाढली होती.

टॅग्स :RaigadरायगडPoliceपोलिस