शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

वसईत रस्त्यावरील भंगार, बेवारस वाहनांवर पोलिसांची कारवाई सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2020 23:34 IST

गेल्या चारपाच दिवसांपासून अशा गाड्या उचलण्यासाठी वाहतूक पोलिसांनी विशेष मोहीम हाती  घेतली आहे.

नालासोपारा : वसई-विरार शहरांतील गर्दी होणाऱ्या रस्त्यांच्या कडेला हजारो बेवारस आणि भंगार वाहनांमुळे नागरिकांना चालण्यास त्रास सहन करावा लागत आहे. या गाड्यांमुळे वाहतूककोंडी आणि पार्किंगची समस्या वाढली आहे. यामुळे गेल्या चारपाच दिवसांपासून अशा गाड्या उचलण्यासाठी वाहतूक पोलिसांनी विशेष मोहीम हाती  घेतली आहे.

काही दिवसांपूर्वी मुंबई हायकोर्टाने रस्त्याच्या कडेला असलेली बेवारस वाहने हटविण्यासाठी आणि नो-पार्किंग झोनमध्ये अनधिकृतपणे वाहने पार्क केली जातात, त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी आदेश जाहीर केला होता. वसई-विरार शहर महानगरपालिकेकडे पार्किंग झोन नसल्यामुळे वाहतूक पोलिसांना कारवाई कशी करावी, हा प्रश्न पडला होता. मुंबई हायकोर्टाच्या आदेशानंतरही वसई तालुक्यातील अनेक रस्त्यांच्या कडेला अशी वाहने बिनधास्तपणे पडलेली असूनही वसई-विरार महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी बघ्याची भूमिका घेतली होती. मात्र, चारपाच दिवसांपासून वाहतूक पोलिसांनी अशी वाहने उचलण्यास सुरुवात केली आहे.

वसई, विरार, नालासोपारा या शहरांतील अनेक रस्त्यांच्या कडेला कित्येक महिन्यांपासून भंगार गाड्या पडलेल्या असल्याने सर्वत्र घाण पसरत होती. नागरिक या भंगार गाड्यांवर कचऱ्याच्या पिशव्या फेकत होते. साफसफाई कर्मचारी हे कचरा उचलत नसल्याने कचरा सडून दुर्गंधी पसरली असल्याने मच्छरांची पैदाससुद्धा वाढली होती.

टॅग्स :RaigadरायगडPoliceपोलिस