शहरं
Join us  
Trending Stories
1
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
2
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
3
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
4
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
5
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
6
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
7
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
8
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
9
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
10
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
11
Dharali floods: 43 किमी वेग... 1230 उंच डोंगरावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
12
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
13
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
14
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
15
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
16
अभिनेत्री मुक्ता बर्वे व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित, भावना व्यक्त करत म्हणाली...
17
VIDEO: साडी नेसून.. डोक्यावर पदर घेऊन... 'देसी भाभी'चा शकिराच्या 'हिप्स डोन्ट लाय' वर भन्नाट डान्स
18
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
19
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर
20
मुलगा वापरायचा मृत आईचं बँक खातं, अचानक खात्यात आले १०० कोटी रुपये, त्यानंतर...

प्लॅस्टिकमिश्रीत रस्त्याची चाळण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2018 03:46 IST

पनवेल महापालिकेचा प्रयोग फसला : सहा महिन्यांतच रस्ता उखडला; कंत्राटदाराला दिले निर्देश

वैभव गायकर

पनवेल : महापालिकेने मोठा गाजावजा करीत रस्त्यांच्या डांबरीकरणासाठी प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर करण्याचा प्रयोग केला होता; परंतु महापालिकेचा हा प्रयोग सपशेल फसला आहे. कारण अवघ्या सहा महिन्यांत या रस्त्याची चाळण झाली आहे. प्रयोगिक तत्त्वावर प्लॅस्टिक मिश्रणापासून तयार करण्यात आलेला ५०० मीटरच्या या रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले आहेत.

पनवेल महापालिकेने सर्वप्रथम प्लॅस्टिक पिशव्यांवर बंदी घातली होती. यानंतर राज्यभर प्लॅस्टिकबंदीचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर विविध विक्रेते व दुकानदारांकडून जप्त करण्यात आलेल्या प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर रस्त्याच्या डांबरीकरणात करण्यात आला होता. २६ फेब्रुवारी रोजी महापालिकेचे तत्कालीन आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांच्या उपस्थितीत २६ फेब्रुवारी २०१८ रोजी आगरी समाज हॉल येथे प्लॅस्टिक मिश्रणातून रस्त्याच्या डांबरीकरणाचा शुभारंभ करण्यात आला होता. त्यासाठी जप्त केलेला चार टन प्लॅस्टिकचा वापर करण्यात आला होता. रायगड जिल्ह्यात प्रथमत:च अशाप्रकारे प्लॅस्टिक मिश्रीत डांबरी रस्ता तयार करण्यात आल्याचा दावादेखील पालिकेमार्फ त करण्यात आला होता. या प्रयोगामुळे रस्त्याचे आयुर्मान वाढेल, असेही महापालिकेकडून स्पष्ट करण्यात आले होते; परंतु अवघ्या सहा महिन्यांतच महापालिकेचा हा दावा फोल ठरला आहे. प्रायोगिक तत्त्वावर तयार करण्यात आलेल्या ५०० मीटर रस्त्याची अक्षरश: चाळण झाली आहे. वेंगुर्ला नगरपरिषदेने सर्वप्रथम हा प्रयोग राज्यात सुरू केला होता. प्लॅस्टिक आणि डांबरचे मिश्रण तयार करून यामध्ये ९० टक्के डांबर आणि १० टक्के प्लॅस्टिक पिशव्यांचा समावेश करण्यात आला होता. पनवेल महापालिकेने आगरी समाज हॉल ते सावरकर चौक या ५०० मीटरच्या अंतरात हा रस्ता तयार केला होता. हे काम अवघ्या चार दिवसांत पूर्ण करण्यात आले होते. त्यासाठी तब्बल २५ लाख रुपये खर्च करण्यात आले होते; परंतु महापालिकेचा हा प्रयोग पूर्णत: फसल्याचे दिसून आले आहे.आगरी समाज हॉल ते सावरकर चौक या ५०० मीटरच्या रस्त्याचे डांबरीकरण; यामध्ये ९० टक्के डांबर तर १० टक्के प्लॅस्टिकचे मिश्रण होते. यात सुमारे चार टन प्लॅस्टिकचा वापर करण्यात आला होता. रायगड जिल्ह्यात प्रथमच अशाप्रकारचा प्रयोग करण्यात आला होता; परंतु अवघ्या सहा महिन्यांतच हा प्रयोग फसल्याचे स्पष्ट झाले असून, त्यामुळे महापालिकेचे २५ लाख रुपये पाण्यात गेले आहेत.संबंधित कंत्राटदाराला पत्र काढले आहे. प्लॅस्टिक मिश्रीत रस्त्याच्या कामाचा सुरक्षा कालावधी एक वर्षाचा आहे; परंतु सहा महिन्यांतच रस्त्यावर खड्डे पडले आहेत, त्यामुळे या रस्त्याचे पुन्हा काम करण्यासंदर्भात संबंधित कंत्राटदाराला बजावण्यात आले आहे.- संजय कटेकर, शहर अभियंता, पनवेल महानगरपालिका

टॅग्स :Raigadरायगडroad safetyरस्ते सुरक्षा