शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
3
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
4
मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
5
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
6
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
7
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर
8
BMC School: १३ वर्षांत मुंबई महापालिकेच्या १३१ मराठी शाळा बंद!
9
मुलांच्या उच्च शिक्षणाची चिंता सतावतेय? SIP, SSY आणि PPF मधून करा करोडपती होण्याची तयारी!
10
गुरुचरित्रात ‘असे’ येते गणेशाचे अद्भूत वर्णन; बाप्पाच्या महात्म्याचा संदर्भ कुठे, कसा येतो?
11
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
12
'मम्मीने दरवाजा उघडला, काशी काका आता आले अन्...'; 9 वर्षाच्या मुलाने सांगितले कशी झाली बापाची हत्या?
13
'आता पुन्हा शरद पवारांकडे जायचे नाही, असं ठरवलंय'; पवारांचा निष्ठावंत दुखावला, बळीराम काका साठेंनी मन केलं मोकळं
14
Swami Samartha: 'भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे' हे स्वामींचे वचन; पण आहे 'ही' एक अट!
15
रोहित शर्माच्या पत्नीचा पाठलाग करत घरापर्यंत पोहोचला, फोटोही काढू लागला, पाहतात रितिकाचा राग अनावर, त्यानंतर...  
16
हिंदी सक्तीवरून राज ठाकरेंचं महाराष्ट्रातील शाळांच्या मुख्याध्यापकांना खुलं पत्र, वाचा जसच्या तसं...
17
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!
18
Mumbai: नियोजनाच्या अभावामुळे विक्रोळीत वाहतूककोंडी
19
Israel Iran War : 'मोसाद'ची नवीन खेळी!, इराण अलर्टवर, नागरिकांना मोबाईलमधून WhatsApp डिलिट करण्याचे आदेश
20
दूधवाल्याची चूक अन् छत्रपती संभाजीनगरजवळ कारसह दोन बस एकमेकांवर धडकल्या

राजकीय लढतीचे चित्र आज होणार स्पष्ट

By admin | Updated: February 13, 2017 05:13 IST

जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीतून उमेदवारांना माघार घेण्याची सोमवारी शेवटची संधी आहे. युती आघाडीतील उमेदवारांनी

आविष्कार देसाई /अलिबागजिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीतून उमेदवारांना माघार घेण्याची सोमवारी शेवटची संधी आहे. युती आघाडीतील उमेदवारांनी एकमेकांच्या विरोधात उमेदवार उभे केले आहेत. त्यामुळे त्या-त्या पक्षप्रमुखांसमोर चांगलाच पेच निर्माण झाला आहे. उमेदवारी अर्ज मागे घेतले नाही, तर जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या रणांगणावर वेगळेच चित्र उमटणार आहे. त्यामुळे शिवतीर्थावर सत्ता बदलाची शक्यता व्यक्त केली जात आहे. सोमवारी लढतींचे खरे चित्र स्पष्ट होणार असल्याने सत्ता हस्तगत करण्यासाठी कोण किती पाण्यात आहे. हे रायगडकरांना कळणार आहे.निवडणुकीत शेकाप आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची युती झाली आहे, तर काँग्रेस, शिवसेना-भाजपा यांनी काही ठिकाणी सोयीस्कर आघाडी केली आहे. अलिबाग, कर्जत आणि पेण तालुक्यांमध्ये काँग्रेसने शिवसेनेसोबत घरोबा केला आहे. महाड, पोलादपूर, माणगाव, म्हसळा तालुक्यांत काँग्रेस स्वतंत्र लढत आहे. काँग्रेसने अलिबागमध्ये काही ठिकाणी शिवसेनेच्या विरोधात उमेदवार उभे केले आहेत. शेकाप राष्ट्रवादीनेही एकमेकांच्या विरोधात उमेदवार उभे केले आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने रोहे तालुका हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला आहे. तेथे शेकापने उमेदवार उभे केले आहेत. खामगावमधून शेकापने आस्वाद पाटील यांना राष्ट्रवादीच्या मधुकर पाटील यांच्याविरोधात उभे केले आहे. जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या उमेदवार आदिती तटकरे यांच्या विरोधात शेकापच्या राजश्री सानम या अपक्ष म्हणून आहेत. अलिबाग तालुका हा शेकापचा गड मानला जातो. येथेही राष्ट्रवादीने उमेदवार उभे केले आहेत, त्याचप्रमाणे कर्जतमध्येही कळंब मतदार संघातून रायगड जिल्हा परिषदेचे अध्यक्ष सुरेश टोकेरे यांनी शेकापचे अधिकृत उमेदवार सुदाम पेमारे यांच्याविरोधात आव्हान उभे केले आहे. नागोठणेमध्ये राष्ट्रवादीचे नरेंद्र जैन यांना शेकापचे राजेश सानप यांचे आव्हान आहे. सत्तेच्या साठमारीसाठी सर्वच प्रमुख पक्षांनी एकमेकांच्या विरोधात उमेदवार दिले आहेत. जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रामुख्याने शेकाप, राष्ट्रवादी आणि शिवसेना आग्रही आहते. जास्त जागा निवडून येणाऱ्या पक्षाचा उमेदवार हा अध्यक्ष असणार आहे. यासाठी शिवतीर्थावर सत्ता काबीज करण्यासाठी युती आघाड्यांमध्येच लढत असल्याचे दिसून येते. सोमवारी युती आघाड्यांसाठी अडचणींच्या ठरणाऱ्या उमेदवारांनी माघार घेतली नाही, तर युती आघाडी यांच्यातील बिघाडी अटळ आहे. युत्या आघाड्यांच्या माध्यमातून रायगडच्या राजकारणात सत्तेचे साकारलेले चित्र फिके झाले, तर सत्तेची समिकरणे बदलण्याची शक्यता आहे.