शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
3
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
4
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
5
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
6
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
7
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
8
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
9
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
10
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
11
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
12
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
13
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
14
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
15
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
16
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
17
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
18
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
19
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
20
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
Daily Top 2Weekly Top 5

पर्यावरण रक्षणासाठी पेण वनविभाग सरसावला; इकोफ्रेंडली होळीसाठी प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2019 23:37 IST

वनराई संरक्षणासाठी वनक्षेत्रावर करडी नजर

पेण : पृथ्वीच्या तापमानात होणाऱ्या बदलांमुळे नैसर्गिक चक्रावर ठिकठिकाणी अनिष्ट परिणाम झालेले दिसून येतात. सतत येणाऱ्या नैसर्गिक आपत्तीमुळे मानवी समूहांना अनेक राष्ट्रात जीवितहानीसह मोठ्या आर्थिक हानीचा सामना करावा लागतो. पृथ्वीवर येणारी ही नैसर्गिक संकटे रोखण्यासाठी झाडे वाचली पाहिजे, वनराईचे संरक्षण करण्याबरोबर सतत होणारी वृक्षतोड थांबली पाहिजे. सध्या कोकणात होळीच्या सणासाठी मोठ्या प्रमाणात वृक्षतोड केली जाते यासाठी पेणचा वनविभागाने आपल्या कार्यक्षेत्रातील वनक्षेत्रात कडक प्रतिबंधक उपाययोजना केल्या आहेत. नागरिकांनी इक ोफ्रेंडली होळीचा सण साजरा करून राष्ट्राची संपत्ती असलेल्या वनांचे रक्षणाची जबाबदारी वनखात्याकडे आहे. हौसेपोटी वृक्षावर कुºहाडीचे घाव घालणारे हात थांबवावे. त्याचबरोबरीने झाडांचा पालापाचोळा, केळीची पाने, गोवºया याद्वारे पर्यावरणपूरक अशाप्रकारे होळीचा सण साजरा करावा, असे आवाहन पेण वनक्षेत्रपाल प्रसाद गायकवाड यांनी केले.पेण वनविभागाची व्याप्ती सुमारे ९ हजार ९०० चौ. मी. असून या क्षेत्रात पानझडी जंगलाचा समावेश आहे. या क्षेत्रात सात राऊंड असून सात वनपाल व २५ वनरक्षकांद्वारे या वनांचे संरक्षण केले जाते. गेल्या काही वर्षांपासून शतकोटी वृक्षलागवडीमुळे, नागरिकांमध्ये वृक्षप्रेम वाढीस लागले आहे. हौसमौज व उत्साहामुळे होळी सणाच्या वेळी विशेषत: कोकणात मोठ्या प्रमाणावर जी वृक्षतोड होत होती ते प्रमाण आता कित्येक पटीने कमी झाल्याचे चित्र दिसू लागले आहे. सध्या लोकांचा दृष्टिकोन बदलला असून पर्यावरणाला मारक ठरणाºया अनेक गोष्टी लोकांकडून बहिष्कृत होवू लागल्यात. हे चांगले सुलक्षण असून पर्यावरणपूरक पद्धतीने होळीचा सण साजरा करण्यावर शहरी भागातील नागरिकांनी भर दिला आहे. गेल्या सात ते आठ वर्षांपासून पर्यावरणपूरक होळीचा सण साजरा करण्यासाठी पेण वन विभागाच्या कार्यालयीन ग्राऊंडमध्ये गोवºया, पालापाचोळा, केळीची पाने यांचा वापर करून होळी सणाच्या इकोफे्रं डली डेमोचे प्रात्यक्षिक सादरीकरण वनविभाग व वृक्षप्रेमींतर्फे केले जात आहे.पर्यावरणपूरक होळी सण साजरा करण्यासाठी आम्ही व्यापक मोहीम हाती घेतली असून पेण शहर व ग्रामीण परिसरातील सरपंच, नागरी संकुलातील सोसायट्यांचे प्रमुख, माध्यमिक व उच्च माध्यमिक शालेय विद्यार्थी, शिक्षक तसेच त्या क्षेत्रातील जिल्हा परिषद सदस्यांना निमंत्रित करून शालेय विद्यार्थ्यांसमवेत पर्यावरणपूरक होळी डेमो सादरीकरणातून दिवसात जनजागृती करण्यावर भर दिला जात आहे. या मोहिमेद्वारे वृक्षतोड थांबविणे हाच उद्देश आहे.- प्रसाद गायकवाड,वनक्षेत्रपाल पेणवृक्ष हे मानवी जीवनाला आवश्यक असे प्राणवायू देणारे प्राणसंजीवक मित्र असल्याने सतत बदलणारे तापमान, येणाºया नैसर्गिक आपत्ती हे सर्व थांबवायचे असेल तर वृक्षतोड करू नये. होळीचा सण इकोफ्रेंडली साजरा करावा.- प्रा. उदय मानकवळे, वृक्षप्रेमी सामाजिक कार्यकर्ते

टॅग्स :Holiहोळीforest departmentवनविभाग