शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
2
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
3
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  
4
Video: रस्त्यात खड्डे की, खड्ड्यात रस्ते..? 5 प्रवाशांना घेऊन Scorpio-N अख्खी बुडाली...
5
गौतम अदानींची 'पॉवर'फुल कामगिरी; अवघ्या 2 दिवसांत केली 1.7७ लाख कोटींची कमाई
6
कॉकपिटमध्ये घुसण्याचा प्रयत्न; नऊ प्रवासी ताब्यात, एअर इंडियाच्या विमानात नेमकं काय घडलं?
7
मराठवाड्यातील अतिवृष्टीचा एकनाथ शिंदेंनी घेतला आढावा; जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवरून संवाद
8
शेअर आहे की पैशांचं झाड...? या महारत्न कंपनीनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल, 1 लाखाचे केले थेट 25 लाख! 3 वेळा वाटले बोनस शेअर
9
पाकिस्तानात निसर्गाचा हाहाकार; मुसळधार पाऊस अन् पुरामुळे 1 हजारहून अधिक जणांचा मृत्यू
10
भारताविरोधात गन सेलिब्रेशन करणाऱ्या पाकिस्तानच्या फरहानचा माजोरडेपणा कायम, आता म्हणाला....
11
काँग्रेसचे नेते आणि हिमाचलमधील मंत्री विक्रमादित्य सिंह यांनी केलं दुसरं लग्न, कोण आहे त्यांची दुसरी पत्नी?
12
डीजेचा मोठा आवाज ठरेल जीवघेणा; हार्ट अटॅक, ब्रेन हॅमरेजचा धोका, फुटू शकते मेंदूची नस
13
चार्ली किर्कच्या शोकसभेत पत्नीने केलं अनपेक्षित विधान; एरिका किर्क म्हणाल्या," त्या तरुणाला मी..."
14
जुगाराच्या व्यसनामुळे बनला 'चोर'; वडिलांशी खोटं बोलून मित्रांच्या नावाने घेतलं ३३ लाखांचं कर्ज
15
टाटा-महिंद्राच्या कंपनीचे शेअर आपटले! पण अदानींचा 'हा' स्टॉक ठरला टॉप गेनर; IT क्षेत्राला सर्वाधिक फटका
16
मेट्रोचे सर्व टप्पे २०२६च्या अखेरपर्यंत प्रवाशांकरता खुले होतील- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
17
“आता रिकामे ठेवू नका, काहीतरी जबाबदारी द्या, चुकलो असेन तर...”; धनंजय मुंडेंची भरसभेत विनंती
18
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातावर मोठी अपडेट; सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला नोटीस पाठवली, AAIB अहवालाबाबत सांगितली ही बाब
19
VIDEO: आईची माया! सिंहीणने रेडकूवर घातली झडप, म्हशीने शिंगाने लावलं उडवून अन् पुढे...
20
बगरम हवाई तळावर अमेरिकेचा 'डोळा'; ट्रम्प यांना आता का हवंय अफगाणिस्तानचं 'एअरफील्ड'?

सरकारी रुग्णालयात पाण्याविना रुग्ण बेहाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2018 22:56 IST

जिल्हा सरकारी रुग्णालयामध्ये पुरशा प्रमाणात पाण्याची व्यवस्था नसल्याने, रुग्णांसह नातेवाइकांना त्रास सहन करावा लागत आहे.

- आविष्कार देसाईअलिबाग : जिल्हा सरकारी रुग्णालयामध्ये पुरशा प्रमाणात पाण्याची व्यवस्था नसल्याने, रुग्णांसह नातेवाइकांना त्रास सहन करावा लागत आहे. आंतररुग्ण विभागामधील पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यावरील विविध वार्डमधील स्वच्छतागृहांमधील नळाला पाणी नसल्याने तेथे पाण्याच्या टाक्या भरून ठेवण्यात येतात. मात्र, त्यामध्येही पुरेसे पाणी नसल्याने रुग्णांची चांगलीच गैरसोय होत आहे, यामध्ये सर्वाधिक हाल महिला प्रसूती विभागातील रुग्णांचे होत आहेत.

स्वच्छतागृहात पाणी नसल्याने अन्य आजार बळावण्याची शक्यताही निर्माण झाली आहे, यामध्ये रुग्णालय प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन रुग्णांसह नातेवाइकांची गैरसोय दूर करावी, अशी मागणी जोर धरत आहे. रायगड जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या अलिबाग येथे जिल्हा सरकारी रुग्णालय आहे. येथे विविध आजारांवर उपचार करण्यासाठी कर्जत ते पोलादपूरपासून रुग्ण मोठ्या संख्येने रोज येत असतात.

सरकारी रुग्णालयामध्ये येणारे रुग्ण हे आर्थिकदृष्ट्या सक्षम नसतात, त्यामुळे त्यांना सरकारी रुग्णालयामध्ये उपचार करून घ्यावे लागतात; परंतु सरकार आणि प्रशासन आवश्यक सुविधा देण्यास कमी पडत असल्याचे दिसून येते. या रुग्णालयामध्ये गरीब रुग्ण येत असल्याने विविध समस्यांकडे गांभीर्याने पाहिले जात नसल्याचा आरोप करण्यात येत आहे.

जिल्हा सरकारी रुग्णालयाची क्षमताही २७६ खाटांची आहे, तर अतिदक्षता विभागात सहा खाटा आहेत. २७६ खाटांपैकी महिला प्रसूती विभागात ४२ ची व्यवस्था आहे. महिला प्रसूती वार्डमधील रुग्णांची संख्या नेहमीच तुलनेने जास्त असते.

सध्या रुग्णालयामध्ये तापांच्या रुग्णांची संख्या अधिक प्रमाणात आहे. २७६ पैकी सुमारे २५५ खाटा रुग्णांनी भरलेल्या आहेत, याचा अर्थ २५५ रुग्ण अधिक. त्यांचे किमान दोन नातेवाईक असे मिळून तब्बल ५१० जणांचा भार या रुग्णालय व्यवस्थेवर असल्याचे स्पष्ट होते. मात्र पाणी पुरवठ्याअभावी रुग्णांना तसेच त्यांच्या नातेवाईकांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे.

रुग्णालयामध्ये कोणतीही असुविधा होणार नाही, याची काळजी रुग्णालय प्रशासनामार्फत घेतली जाते. काही दिवसांपूर्वी अलिबाग नगरपालिकेने पाणीपुरवठा करणाºया पाइपचे काम हाती घेतले होते, त्यामुळे पाण्याचा पुरेसा पुरवठा होऊ शकला नाही. आता व्यवस्थित पाणीपुरवठा सुरू आहे.- डॉ. अनिल फुटाणे, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक

पाण्याअभावी आजार बळावणार

  • पहिल्या आणि दुसºया मजल्यावरील प्रत्येक वार्डमध्ये स्वच्छतागृहे उभारण्यात आलेली आहेत. मात्र, त्यांना अधूनमधून पुरेशा प्रमाणात पाणीच नसते, त्यामुळे रुग्णांसह त्यांच्या नातेवाइकांची चांगलीच गैरसोय होते.
  • नळाला पाणी आले नाही, तर रुग्णांसह त्यांच्या नातेवाइकांसाठी तेथेच पाणी साठवून ठेवण्यात येते; परंतु कधी कधी त्यामधील पाण्याचा साठा संपलेला असतो, याबाबत रुग्णाचे नातेवाईक तक्रार करतात, तेव्हा नगरपालिकेकडून पाणीपुरवठा होत नसल्याचे कारण पुढे केले जाते.
  • स्वच्छतागृहांमध्ये पाणीच नसणे, हे फारच गंभीर आहे. कारण रुग्ण बरे होण्यासाठी रुग्णालयात येतात. मात्र, तेथील स्वच्छतागृहांमध्ये पाणी नसल्याने तेथे अस्वच्छताच असणार त्यामुळे अन्य आजार बळावण्याची शक्यता अधिक आहे.
टॅग्स :Healthआरोग्यhospitalहॉस्पिटलwater shortageपाणीटंचाई