शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

सरकारी रुग्णालयात पाण्याविना रुग्ण बेहाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2018 22:56 IST

जिल्हा सरकारी रुग्णालयामध्ये पुरशा प्रमाणात पाण्याची व्यवस्था नसल्याने, रुग्णांसह नातेवाइकांना त्रास सहन करावा लागत आहे.

- आविष्कार देसाईअलिबाग : जिल्हा सरकारी रुग्णालयामध्ये पुरशा प्रमाणात पाण्याची व्यवस्था नसल्याने, रुग्णांसह नातेवाइकांना त्रास सहन करावा लागत आहे. आंतररुग्ण विभागामधील पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यावरील विविध वार्डमधील स्वच्छतागृहांमधील नळाला पाणी नसल्याने तेथे पाण्याच्या टाक्या भरून ठेवण्यात येतात. मात्र, त्यामध्येही पुरेसे पाणी नसल्याने रुग्णांची चांगलीच गैरसोय होत आहे, यामध्ये सर्वाधिक हाल महिला प्रसूती विभागातील रुग्णांचे होत आहेत.

स्वच्छतागृहात पाणी नसल्याने अन्य आजार बळावण्याची शक्यताही निर्माण झाली आहे, यामध्ये रुग्णालय प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन रुग्णांसह नातेवाइकांची गैरसोय दूर करावी, अशी मागणी जोर धरत आहे. रायगड जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या अलिबाग येथे जिल्हा सरकारी रुग्णालय आहे. येथे विविध आजारांवर उपचार करण्यासाठी कर्जत ते पोलादपूरपासून रुग्ण मोठ्या संख्येने रोज येत असतात.

सरकारी रुग्णालयामध्ये येणारे रुग्ण हे आर्थिकदृष्ट्या सक्षम नसतात, त्यामुळे त्यांना सरकारी रुग्णालयामध्ये उपचार करून घ्यावे लागतात; परंतु सरकार आणि प्रशासन आवश्यक सुविधा देण्यास कमी पडत असल्याचे दिसून येते. या रुग्णालयामध्ये गरीब रुग्ण येत असल्याने विविध समस्यांकडे गांभीर्याने पाहिले जात नसल्याचा आरोप करण्यात येत आहे.

जिल्हा सरकारी रुग्णालयाची क्षमताही २७६ खाटांची आहे, तर अतिदक्षता विभागात सहा खाटा आहेत. २७६ खाटांपैकी महिला प्रसूती विभागात ४२ ची व्यवस्था आहे. महिला प्रसूती वार्डमधील रुग्णांची संख्या नेहमीच तुलनेने जास्त असते.

सध्या रुग्णालयामध्ये तापांच्या रुग्णांची संख्या अधिक प्रमाणात आहे. २७६ पैकी सुमारे २५५ खाटा रुग्णांनी भरलेल्या आहेत, याचा अर्थ २५५ रुग्ण अधिक. त्यांचे किमान दोन नातेवाईक असे मिळून तब्बल ५१० जणांचा भार या रुग्णालय व्यवस्थेवर असल्याचे स्पष्ट होते. मात्र पाणी पुरवठ्याअभावी रुग्णांना तसेच त्यांच्या नातेवाईकांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे.

रुग्णालयामध्ये कोणतीही असुविधा होणार नाही, याची काळजी रुग्णालय प्रशासनामार्फत घेतली जाते. काही दिवसांपूर्वी अलिबाग नगरपालिकेने पाणीपुरवठा करणाºया पाइपचे काम हाती घेतले होते, त्यामुळे पाण्याचा पुरेसा पुरवठा होऊ शकला नाही. आता व्यवस्थित पाणीपुरवठा सुरू आहे.- डॉ. अनिल फुटाणे, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक

पाण्याअभावी आजार बळावणार

  • पहिल्या आणि दुसºया मजल्यावरील प्रत्येक वार्डमध्ये स्वच्छतागृहे उभारण्यात आलेली आहेत. मात्र, त्यांना अधूनमधून पुरेशा प्रमाणात पाणीच नसते, त्यामुळे रुग्णांसह त्यांच्या नातेवाइकांची चांगलीच गैरसोय होते.
  • नळाला पाणी आले नाही, तर रुग्णांसह त्यांच्या नातेवाइकांसाठी तेथेच पाणी साठवून ठेवण्यात येते; परंतु कधी कधी त्यामधील पाण्याचा साठा संपलेला असतो, याबाबत रुग्णाचे नातेवाईक तक्रार करतात, तेव्हा नगरपालिकेकडून पाणीपुरवठा होत नसल्याचे कारण पुढे केले जाते.
  • स्वच्छतागृहांमध्ये पाणीच नसणे, हे फारच गंभीर आहे. कारण रुग्ण बरे होण्यासाठी रुग्णालयात येतात. मात्र, तेथील स्वच्छतागृहांमध्ये पाणी नसल्याने तेथे अस्वच्छताच असणार त्यामुळे अन्य आजार बळावण्याची शक्यता अधिक आहे.
टॅग्स :Healthआरोग्यhospitalहॉस्पिटलwater shortageपाणीटंचाई