शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
2
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
3
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
4
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
5
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
6
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
7
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
8
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
9
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
10
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
11
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
12
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
13
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
14
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...
15
निर्वस्त्र करुन मारहाण, एक्स गर्लफ्रेंडसोबत संबंध; मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीने संपवले आयुष्य
16
मोहम्मद सिराजचा मोठा पराक्रम, गोलंदाज असूनही मोडला धोनीचा रेकॉर्ड!
17
कधी भूस्खलन तर कधी ढगफुटी; नैसर्गिक की मानवी चूक? उत्तराखंड विनाशाच्या वाटेवर...
18
Raksha Bandhan 2025: यंदाही रक्षाबंधनाला भद्राचे सावट? पंचक सुरु होण्याआधी 'या' मुहूर्तावर बांधा राखी!
19
सुप्रीम कोर्टाचा निकाल विरोधात जाण्याची भीती?; शिंदेंच्या दिल्लीवारीबाबत असीम सरोदेंचा मोठा दावा
20
लालू यादवांच्या मुलाची बिहार निवडणुकीसाठी अजब खेळी, अभिनेत्री दिशा पटानीशी कनेक्शन काय?

सरकारी रुग्णालयात पाण्याविना रुग्ण बेहाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2018 22:56 IST

जिल्हा सरकारी रुग्णालयामध्ये पुरशा प्रमाणात पाण्याची व्यवस्था नसल्याने, रुग्णांसह नातेवाइकांना त्रास सहन करावा लागत आहे.

- आविष्कार देसाईअलिबाग : जिल्हा सरकारी रुग्णालयामध्ये पुरशा प्रमाणात पाण्याची व्यवस्था नसल्याने, रुग्णांसह नातेवाइकांना त्रास सहन करावा लागत आहे. आंतररुग्ण विभागामधील पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यावरील विविध वार्डमधील स्वच्छतागृहांमधील नळाला पाणी नसल्याने तेथे पाण्याच्या टाक्या भरून ठेवण्यात येतात. मात्र, त्यामध्येही पुरेसे पाणी नसल्याने रुग्णांची चांगलीच गैरसोय होत आहे, यामध्ये सर्वाधिक हाल महिला प्रसूती विभागातील रुग्णांचे होत आहेत.

स्वच्छतागृहात पाणी नसल्याने अन्य आजार बळावण्याची शक्यताही निर्माण झाली आहे, यामध्ये रुग्णालय प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन रुग्णांसह नातेवाइकांची गैरसोय दूर करावी, अशी मागणी जोर धरत आहे. रायगड जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या अलिबाग येथे जिल्हा सरकारी रुग्णालय आहे. येथे विविध आजारांवर उपचार करण्यासाठी कर्जत ते पोलादपूरपासून रुग्ण मोठ्या संख्येने रोज येत असतात.

सरकारी रुग्णालयामध्ये येणारे रुग्ण हे आर्थिकदृष्ट्या सक्षम नसतात, त्यामुळे त्यांना सरकारी रुग्णालयामध्ये उपचार करून घ्यावे लागतात; परंतु सरकार आणि प्रशासन आवश्यक सुविधा देण्यास कमी पडत असल्याचे दिसून येते. या रुग्णालयामध्ये गरीब रुग्ण येत असल्याने विविध समस्यांकडे गांभीर्याने पाहिले जात नसल्याचा आरोप करण्यात येत आहे.

जिल्हा सरकारी रुग्णालयाची क्षमताही २७६ खाटांची आहे, तर अतिदक्षता विभागात सहा खाटा आहेत. २७६ खाटांपैकी महिला प्रसूती विभागात ४२ ची व्यवस्था आहे. महिला प्रसूती वार्डमधील रुग्णांची संख्या नेहमीच तुलनेने जास्त असते.

सध्या रुग्णालयामध्ये तापांच्या रुग्णांची संख्या अधिक प्रमाणात आहे. २७६ पैकी सुमारे २५५ खाटा रुग्णांनी भरलेल्या आहेत, याचा अर्थ २५५ रुग्ण अधिक. त्यांचे किमान दोन नातेवाईक असे मिळून तब्बल ५१० जणांचा भार या रुग्णालय व्यवस्थेवर असल्याचे स्पष्ट होते. मात्र पाणी पुरवठ्याअभावी रुग्णांना तसेच त्यांच्या नातेवाईकांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे.

रुग्णालयामध्ये कोणतीही असुविधा होणार नाही, याची काळजी रुग्णालय प्रशासनामार्फत घेतली जाते. काही दिवसांपूर्वी अलिबाग नगरपालिकेने पाणीपुरवठा करणाºया पाइपचे काम हाती घेतले होते, त्यामुळे पाण्याचा पुरेसा पुरवठा होऊ शकला नाही. आता व्यवस्थित पाणीपुरवठा सुरू आहे.- डॉ. अनिल फुटाणे, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक

पाण्याअभावी आजार बळावणार

  • पहिल्या आणि दुसºया मजल्यावरील प्रत्येक वार्डमध्ये स्वच्छतागृहे उभारण्यात आलेली आहेत. मात्र, त्यांना अधूनमधून पुरेशा प्रमाणात पाणीच नसते, त्यामुळे रुग्णांसह त्यांच्या नातेवाइकांची चांगलीच गैरसोय होते.
  • नळाला पाणी आले नाही, तर रुग्णांसह त्यांच्या नातेवाइकांसाठी तेथेच पाणी साठवून ठेवण्यात येते; परंतु कधी कधी त्यामधील पाण्याचा साठा संपलेला असतो, याबाबत रुग्णाचे नातेवाईक तक्रार करतात, तेव्हा नगरपालिकेकडून पाणीपुरवठा होत नसल्याचे कारण पुढे केले जाते.
  • स्वच्छतागृहांमध्ये पाणीच नसणे, हे फारच गंभीर आहे. कारण रुग्ण बरे होण्यासाठी रुग्णालयात येतात. मात्र, तेथील स्वच्छतागृहांमध्ये पाणी नसल्याने तेथे अस्वच्छताच असणार त्यामुळे अन्य आजार बळावण्याची शक्यता अधिक आहे.
टॅग्स :Healthआरोग्यhospitalहॉस्पिटलwater shortageपाणीटंचाई