शहरं
Join us  
Trending Stories
1
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
2
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
3
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
4
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
5
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
6
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
7
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
8
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
9
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
10
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
11
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
12
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
13
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
14
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
15
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
16
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
17
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
18
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
19
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
20
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!

वनजमिनीसंबंधी प्रश्न सोडवण्याला प्राधान्य देणार - पार्थ पवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2019 23:58 IST

वनजमिनीवर घर करून राहणारे आदिवासी यांना घरापर्यंत जाणारा रस्ता बनवायचा आहे, त्यांच्या घरात वीज पोहचविण्याचे काम करायचे आहे

कर्जत : तालुक्यातील वनजमिनीवर घर करून राहणारे आदिवासी यांना घरापर्यंत जाणारा रस्ता बनवायचा आहे, त्यांच्या घरात वीज पोहचविण्याचे काम करायचे आहे आणि वन खात्याच्या परवानग्यासाठी अडून राहिलेले प्रकल्प मार्गी लावण्यासाठी आपल्याला संसदेत जायचे आहे असा विश्वास मावळ लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार पार्थ पवार यांनी व्यक्त केला. कशेळे येथील प्रचारसभेत पार्थ पवार बोलत होते.कर्जत तालुक्यातील कशेळे येथील हनुमान मंदिर चौकात राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे उमेदवार पार्थ पवार यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. सभेला संबोधित करताना पार्थ पवार यांनी आपल्याला लहान मुलांसाठी केंद्र पातळीवरील शाळा सुरू करायच्या असून आदिवासी भागातील एकही गाव, वाडी वीज पुरवठ्यापासून वंचित राहणार नाही यासाठी आपल्याला लोकसभेत पाठवावे अशी विनंती केली. पवार यांनी पुढे बोलताना भीमाशंकर घाटरस्त्याचा प्रश्न भाजप सरकारने सोडविला नाही, आजही अनेक आदिवासी वाड्या रस्त्याने जोडल्या नाहीत. हे प्रश्न सोडविण्यासाठी आणि अनेक रस्त्यांचे रुंदीकरण हे वनजमिनीचा प्रश्न सोडविला गेला नसल्याने रखडले आहेत ते सोडविण्यासाठी आपल्याला लोकसभेत पोहचायचे आहे. माथेरानसारख्या पर्यटन स्थळी जाण्यासाठी वाहतूक सुविधा अधिक सक्षम करण्यासाठी तसेच माथेरान आणि सह्याद्री या डोंगर रांगांना लागलेला इको सेन्सेटिव्ह झोनमुळे निर्माण झालेल्या अडचणी दूर करण्यासाठी सक्षम लोकप्रतिनिधी आपल्याला पाठवायचा आहे आणि काँग्रेस आघाडीने तो पर्याय मावळ लोकसभा मतदारसंघात निर्माण केला आहे. त्याला आपले प्रेम पाहिजे आहे, असे आवाहन पार्थ पवार यांनीकेले.याप्रसंगी शेकापचे नेते विलास थोरवे यांनी आमच्या कार्यकर्त्यांसाठी पाथरज प्रभाग जास्त मताधिक्य देतो की कळंब प्रभाग यावर स्पर्धा चालली आहे. आम्ही आमच्या नेत्यांनी दिलेला आदेश शिरसावंद्य मानून पार्थ पवार यांना मताधिक्य देणार असा विश्वास थोरवे यांनी व्यक्त केला. आमदार सुरेश लाड यांनी आम्ही पार्थ पवार यांची उमेदवारी मागून घेतली असून १० वर्षात आम्ही अनेक आदिवासी वाड्यांना वीज पुरवठा पोहोचविला आहे, विद्यमान खासदारांनी तुंगीमध्ये लाइट कोणत्या शिवसेना नेत्यांसाठी नेली हे त्यांनी जाहीर करावे, असे आवाहन केले.

टॅग्स :Maharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019maval-pcमावळNCPराष्ट्रवादी काँग्रेस