शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

हवेतील उग्र दर्पाने पनवेलकर त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2019 01:59 IST

प्रदूषणात वाढ : रात्रीच्या वेळी कंपन्यांमधून सोडण्यात येतो रसायनिक वायू

वैभव गायकर

पनवेल : दिल्लीतील प्रदूषणाची चर्चा सध्या सर्वत्र होत आहे. यावर उपाययोजना करण्यासाठी त्या ठिकाणी सम-विषम वाहने चालविण्यात येत असून शाळाही बंद ठेवण्यात आल्या आहेत. अशीच काहीशी परिस्थिती सध्या पनवेलमध्ये उद्भवली आहे. शहरीकरणाबरोबर तळोजा एमआयडीसीतील प्रदूषणामुळे पनवेलमधील वातावरण दिवसेंदिवस दूषित होत असून, रात्रीच्या वेळी कंपन्यांमधून सोडण्यात येणाऱ्या रासायनिक वायूमुळे पनवेलकर त्रस्त आहेत. ज्येष्ठांबरोबरच लहान मुले, तरुणांमध्येही श्वासोच्छ्वासाचे आजार बळावत असल्याने दिसून येत आहे.

दिवाळीनंतर थंडी वाढते. त्याचबरोबरच धुके पसरायला सुरुवात होते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून धुक्याबरोबरच वातावरणात धुराचेही प्रमाण वाढल्याचे दिसून येत आहे. धुक्याच्या आडून पनवेल, तळोजा एमआयडीसीतील काही कंपन्यांमधून दूषित विषारी वायू मोठ्या प्रमाणात हवेत सोडले जात आहेत.प्रदूषणाची आकडेवारीची माहिती देणाºया एका साइटवर गेल्या २४ तासांत हवेची सरासरी गुणवत्ता निर्देशांक (एक्यूआय) १५७ म्हणजेच आरोग्यास धोकादायक असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. पनवेलमध्ये विशेषत: रात्रीच्या वेळी खारघर, कळंबोली, कामोठे तसेच एमआयडीसीतील काही भागात सध्या अतिशय उग्र दर्प अनुभवास येत आहे.तळोजा एमआयडीसीमधील प्रदूषणाच्या विषय तर राष्ट्रीय हरित लवादामध्ये गेला आहे. लवादाने वेळोवेळी संबंधित यंत्रणेला दंड ठोठावला आहे. मात्र, प्रदूषणाबाबत अद्यापही एमआयडीसी, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रक मंडळ बेफिकीर असल्याचे पाहावयास मिळत आहे. याचिकाकर्ते नगरसेवक अरविंद म्हात्रे यांनी याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. तळोजा एमआयडीसीतील प्रदूषणाचा फटका स्थानिकांबरोबरच खारघर, तळोजा नोड, पनवेल परिसरातील नागरिकांनाही बसत आहे. पनवेलमधील वाढत्या प्रदूषणासंदर्भात प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी राहुल मोटे यांच्याकडे विचारणा केली असता, प्रदूषणासंदर्भात राबविण्यात येणाºया उपाययोजनांची माहिती फोनवर देता येणार नसल्याचे सांगून त्यांनी टाळाटाळ केली. एकीकडे वाढत्या प्रदूषणामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असताना अधिकारी वर्ग मात्र जबाबदारी झटकत असल्याचे दिसून आले.उग्र वायूने नागरिक हैराणखारघर, कळंबोली, कामोठे, पनवेल परिसरातील नागरिकांना संध्याकाळ होताच उग्र दर्पाला सामोरेजावे लागते. हा दर्प नवजात बालके, श्वसनाचात्रास असलेल्यांसाठी घातक आहे. याबाबतप्रदूषण नियंत्रण मंडळाने योग्य ती पावले उचलणे गरजेचे आहे.वायुप्रदूषणामुळे उद्भणारे आजारच्श्वासोच्छ्वासाचा त्रास बळावतो.च्घसा दुखणे, डोळ्यांची जळजळ होणेच्स्मरणशक्तीवर परिणाम होतोच्चिडचिड वाढते.च्एकाग्रतेत बाधा येते.च्फुप्फुसांना सूज येते. परिणामी, रक्तवाहिन्या व हृदयाला इजा होण्याची शक्यता बळावते

टॅग्स :RainपाऊसRaigadरायगडpanvelपनवेल