शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

हवेतील उग्र दर्पाने पनवेलकर त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2019 01:59 IST

प्रदूषणात वाढ : रात्रीच्या वेळी कंपन्यांमधून सोडण्यात येतो रसायनिक वायू

वैभव गायकर

पनवेल : दिल्लीतील प्रदूषणाची चर्चा सध्या सर्वत्र होत आहे. यावर उपाययोजना करण्यासाठी त्या ठिकाणी सम-विषम वाहने चालविण्यात येत असून शाळाही बंद ठेवण्यात आल्या आहेत. अशीच काहीशी परिस्थिती सध्या पनवेलमध्ये उद्भवली आहे. शहरीकरणाबरोबर तळोजा एमआयडीसीतील प्रदूषणामुळे पनवेलमधील वातावरण दिवसेंदिवस दूषित होत असून, रात्रीच्या वेळी कंपन्यांमधून सोडण्यात येणाऱ्या रासायनिक वायूमुळे पनवेलकर त्रस्त आहेत. ज्येष्ठांबरोबरच लहान मुले, तरुणांमध्येही श्वासोच्छ्वासाचे आजार बळावत असल्याने दिसून येत आहे.

दिवाळीनंतर थंडी वाढते. त्याचबरोबरच धुके पसरायला सुरुवात होते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून धुक्याबरोबरच वातावरणात धुराचेही प्रमाण वाढल्याचे दिसून येत आहे. धुक्याच्या आडून पनवेल, तळोजा एमआयडीसीतील काही कंपन्यांमधून दूषित विषारी वायू मोठ्या प्रमाणात हवेत सोडले जात आहेत.प्रदूषणाची आकडेवारीची माहिती देणाºया एका साइटवर गेल्या २४ तासांत हवेची सरासरी गुणवत्ता निर्देशांक (एक्यूआय) १५७ म्हणजेच आरोग्यास धोकादायक असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. पनवेलमध्ये विशेषत: रात्रीच्या वेळी खारघर, कळंबोली, कामोठे तसेच एमआयडीसीतील काही भागात सध्या अतिशय उग्र दर्प अनुभवास येत आहे.तळोजा एमआयडीसीमधील प्रदूषणाच्या विषय तर राष्ट्रीय हरित लवादामध्ये गेला आहे. लवादाने वेळोवेळी संबंधित यंत्रणेला दंड ठोठावला आहे. मात्र, प्रदूषणाबाबत अद्यापही एमआयडीसी, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रक मंडळ बेफिकीर असल्याचे पाहावयास मिळत आहे. याचिकाकर्ते नगरसेवक अरविंद म्हात्रे यांनी याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. तळोजा एमआयडीसीतील प्रदूषणाचा फटका स्थानिकांबरोबरच खारघर, तळोजा नोड, पनवेल परिसरातील नागरिकांनाही बसत आहे. पनवेलमधील वाढत्या प्रदूषणासंदर्भात प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी राहुल मोटे यांच्याकडे विचारणा केली असता, प्रदूषणासंदर्भात राबविण्यात येणाºया उपाययोजनांची माहिती फोनवर देता येणार नसल्याचे सांगून त्यांनी टाळाटाळ केली. एकीकडे वाढत्या प्रदूषणामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असताना अधिकारी वर्ग मात्र जबाबदारी झटकत असल्याचे दिसून आले.उग्र वायूने नागरिक हैराणखारघर, कळंबोली, कामोठे, पनवेल परिसरातील नागरिकांना संध्याकाळ होताच उग्र दर्पाला सामोरेजावे लागते. हा दर्प नवजात बालके, श्वसनाचात्रास असलेल्यांसाठी घातक आहे. याबाबतप्रदूषण नियंत्रण मंडळाने योग्य ती पावले उचलणे गरजेचे आहे.वायुप्रदूषणामुळे उद्भणारे आजारच्श्वासोच्छ्वासाचा त्रास बळावतो.च्घसा दुखणे, डोळ्यांची जळजळ होणेच्स्मरणशक्तीवर परिणाम होतोच्चिडचिड वाढते.च्एकाग्रतेत बाधा येते.च्फुप्फुसांना सूज येते. परिणामी, रक्तवाहिन्या व हृदयाला इजा होण्याची शक्यता बळावते

टॅग्स :RainपाऊसRaigadरायगडpanvelपनवेल