वैभव गायकर
पनवेल: विरोधकांच्या समन्वयाचा अभावाचा फायदा घेऊन विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढविणाऱ्या भाजपने पनवेल महापालिकेवर दुसऱ्यांदा झेंडा फडकवला. प्रदूषण, पाणीटंचाई आणि वाढीव मालमत्ता करावर प्रचंड राजकारण सुरू असताना हे विकासाच्या राजकारणात महत्त्वाचे मुद्दे मागे पडले. भाजपने सात जणांना बिनविरोध विजयी करून महाविकास आघाडीवर पहिलाच जोरदार धक्का दिला होता. त्यामुळे पुढील काळात सर्व मुद्दे मागे पडले आणि केवळ बिनविरोध उमेदवारांच्या अवतीभवती ही निवडून लढवली गेली. त्यातच निवडणुकीपूर्वी २० पेक्षा जास्त महत्वाकांक्षी प्रकल्पांचे उद्घाटन भाजपने प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत पार पाडले. त्याचाही लाभभाजपला झाला.
सोशल मीडिया, प्रत्यक्ष प्रचारात विकासाचा मुद्दा सातत्याने अग्रस्थानी ठेवल्याने भाजपाला याचा फायदा झाला. तर शेकाप नेते माजी आमदार बाळाराम पाटील यांच्या व्यतिरिक्त एकही नेता कुठेही फिरला नाही. त्याचा फटका त्यांना निवडणुकीत बसला
ठाकूर बंधुंचा प्रचार फलदायी
७१ जागांपैकी ५६ जागांवर विजय संपादन केला. सभागृह नेते राहिलेले परेश ठाकूर यांनीदेखील स्वतः निवडणुकीतून माघार घेत पक्ष संघटनेला महत्त्व दिले. त्यांनीदेखील आमदार प्रशांत ठाकूर यांच्या सोबत खांद्याला खांदा लावून संपूर्ण पालिका क्षेत्रात प्रचारात आघाडी घेतली. उर्वरित कोणत्याच पक्षाला दोन अंकी आकडा गाठता आला नसल्याने भाजपचे सूक्ष्म नियोजन, प्रभावी नेतृत्व तसेच योग्य उमेदवारांच्या निवडीमुळे प्रशांत ठाकूर हे पनवेलच्या यशाचे खरे मानकरी ठरले.
मुख्यमंत्री, मंत्र्यांची फौज कामी
भाजपने मात्र नेते, मुख्यमंत्री, केंद्रीयमंत्री, राज्यातील मंत्री यांची फौज विविध प्रभागात उतरविल्याने त्याचा फायदा मतदारांना आकर्षित करण्यासाठी झाला. प्रत्येक आघाडीवर भाजपने पुढाकार घेतला. उलटपक्षी महाविकास आघाडीत शेवटच्या क्षणापर्यंत समन्वयाचा अभाव दिसून आला. शेजारील उरण नगरपरिषदेवर महाविकास आघाडीचे नगराध्यक्ष विराजमान झाले. मात्र त्या निवडणुकीचा प्रभावदेखील पनवेल महापालिकेवर महाविकास आघाडीला पाडता आला नाही.
Web Summary : BJP retained Panvel, capitalizing on opposition disunity and focusing on development, despite issues like pollution. Early victories and project inaugurations boosted their campaign. Strong leadership and strategic planning ensured a decisive win, while the opposition lacked coordination.
Web Summary : भाजपा ने विपक्ष की फूट का फायदा उठाकर और विकास पर ध्यान केंद्रित करते हुए पनवेल को बरकरार रखा। शुरुआती जीत और परियोजना के उद्घाटन ने उनके अभियान को बढ़ावा दिया। मजबूत नेतृत्व और रणनीतिक योजना ने निर्णायक जीत सुनिश्चित की, जबकि विपक्ष में समन्वय का अभाव था।