शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने भारताची भीती घेतली! पीओकेमधील हॉटेल्स अन् गेस्ट हाऊसमध्ये सैन्य; मदरसे बंद
2
पाकिस्तानने अटारी, वाघा बॉर्डरचे गेट उघडले; धास्ती एवढी की पाकिस्तानींनाही घेत नव्हते...
3
श्रीराम दर्शनाची ओढ लागली, ३०० वर्षे जुनी परंपरा मोडली; हनुमानगढीचे महंत मंदिराबाहेर पडले!
4
बजाज चेतकला एप्रिल फूल बनविले; टीव्हीएस पहिल्यांदाच नंबर १, विक्रीत ओला कुठे...
5
पाकिस्तानी हवाई क्षेत्र बंद; एअर इंडियाल 5000 कोटी रुपयांचा फटका बसण्याचा अंदाज...
6
दारूच्या व्यसनाने आई आणि चुलतीचा खून; बीड जिल्हा दोन हत्येच्या घटनांनी हादरला
7
पंकजा मुंडेंना कॉल अन् पाठवला अश्लील मेसेज, पुण्यातील तरुणाला पोलिसांनी केली अटक
8
CEOs चा १ तासाचा पगार सामान्य कर्मचाऱ्याच्या वर्षाच्या पगाराइतका, एका रिपोर्टमध्ये झाले अनेक आश्चर्यकारक खुलासे
9
अन्न पुन्हा गरम करणं आरोग्यासाठी ठरतंय घातक; 'या' ५ गोष्टी टाळाल तरच ठणठणीत राहाल
10
 संतापजनक! मासिक पाळीत स्वयंपाक करणं महिलेच्या जीवावर बेतलं,नणंद आणि सासूने खून केल्याचा आरोप, दोन मुलं अनाथ
11
नवी मुंबईत ठाकरे गटाला खिंडार! माजी नगरसेवकांचे उद्धवसेनेला जय महाराष्ट्र, शिंदेसेनेत प्रवेश
12
"मॅडम येत आहेत, त्यांना..."; पोलीस असल्याचं सांगून दुकानात घुसले अन् २ लाखांचे दागिने चोरले
13
ISI कडून मिळाले आदेश, बेताब खोऱ्यात लपवली शस्त्रे; NIA च्या अहवालात धक्कादायक खुलासा
14
संजय राऊतांनी PM मोदींच्या नेतृत्वक्षमतेवर घेतली शंका; म्हणाले, “शाह यांचा राजीनामा का घेत नाही”
15
काश्मीरात सर्च ऑपरेशन सुरूच, आतापर्यत ३००० जण ताब्यात; जंगलात लपलेत पहलगाम हल्ल्याचे दहशतवादी
16
चिनी कर्मचाऱ्यांना पगारही मिळत नाहीये, ट्रम्प टॅरिफमुळे कारखाने होताहेत बंद; कामगार उतरले रस्त्यावर
17
हॉटेलमधील 'तो' पदार्थ खाणं पडलं महागात! निक्की तांबोळीला ICU मध्ये केलं दाखल, आता कशी आहे अभिनेत्रीची तब्येत?
18
"हा, आम्ही दहशतवादी पोसले पण आता..."; संरक्षण मंत्र्यानंतर बिलावल भुट्टोनेही दिली कबुली
19
Nashik Hit and Run: भावासमोरच जयश्रीने सोडला जीव, नाशिकमध्ये पिकअपने तीन वाहनांना उडवले
20
Ganga Saptami 2025: गंगा सप्तमीला 'हे' उपाय केले असता घरात येईल सुख समृद्धी!

पाली - खोपोली रस्त्याकडे दुर्लक्ष; खड्डे, धुळीचे साम्राज्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2018 00:38 IST

रुंदीकरणाचा मूळ रस्त्याला फटका; स्थानिक आंदोलनाच्या पवित्र्यात

- विनोद भोईर पाली : पाली ते खोपोली या राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम एमएसआरडीने हाती घेतले आहे. रुंदीकरण करताना सध्या वाहतूक होत असलेल्या रस्त्याकडे कंत्राटदाराचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. अनेक ठिकाणी डांबर निघाल्याने खडी बाहेर आली आहे. या खडीवरून दुचाकी, चारचाकी वाहने घसरत असल्याने अपघात होत आहेत. रुंदीकरणापूर्वी वाहतूक सुरू असलेल्या रस्त्याची डागडुजी करणे आवश्यक असल्याचे परिसरातील नागरिक तसेच चालकांचे म्हणणे आहे.रुंदीकरणामुळे साइडपट्टी तोडण्यात आल्या आहेत. शिवाय मातीचा भराव टाकल्याने सर्वत्र धुळीचे साम्राज्य पसरले आहे. वाहनांची सतत वर्दळ असल्याने रस्त्यावर मातीचा धुरळा उडतो. चालकांना वाहन चालविताना अडचणी येत असल्याने अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे चालकांमधून संताप व्यक्त होत आहे. ठेकेदाराने वाहतुकीचा रस्ता सुरळीत न केल्यास पाली व्यापारी असोसिएशनतर्फे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती अध्यक्ष अशोक ओसवाल यांनी दिली आहे.पाली-खोपोली महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम पावसाळ्यात जोमात सुरू होते. परंतु गेल्या दोन महिन्यांपासून हे काम बंद होते. या संदर्भात पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्यासोबत झालेल्या बैठकीत, महामार्गाचे काम सुरु करावे आणि रस्ता वाहतुकीसाठी सुरळीत करून द्यावा असे आदेश कंत्राटदाराला देण्यात आले होते. परंतु कंत्राटदार रस्ता रुंदीकरणावर भर देत वाहतूक सुरू असलेल्या रस्त्याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे निदर्शनास येत आहे.पाली ते खोपोली फाटा हा साधारण पस्तीस किमीच्या रस्त्यात काही ठिकाणी रु ंदीकरणाचे काम सुरू आहे. यात ज्या रस्त्यावरील भाग काँक्रीटचा झाला आहे त्यावरून वाहतूक वळविण्यात आली आहे. परंतु काँक्रीटचा रस्ता सुरू होतो, त्या ठिकाणी खड्डे पडल्याने वाहने आदळतात. वाहने आदळू नये म्हणून चालक अचानक ब्रेक दाबत असल्यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे. गेल्या अनेक दिवसांपासून रखडलेले पाली-खोपोली रस्त्याचे काम आता वेगाने सुरू होईल, अशी शक्यता आहे.काम संथगतीने चालकांमध्ये नाराजीवर्दळीसाठी महत्त्वाच्या असलेल्या पाली-खोपोली महामार्गावरून मंत्री, आमदार, खासदार, लोकप्रतिनिधी, तहसीलदार तसेच उच्च दर्जाचे सरकारी अधिकारी यांचे जाणे - येणे असते. परंतु या त्रासाबद्दल कोणीच काही बोलत नाही.पालकमंत्र्यांनी रस्त्याची पाहणी करून रुंदीकरणाच्या कामापेक्षा अगोदर वाहतुकीचा रस्ता सुरळीत करण्याचे आदेश कंत्राटदाराला द्यावेत, अशी मागणी होत आहे.रुंदीकरणापेक्षा पीडब्ल्यूडीच्या ताब्यात असलेला रस्ताच बरा होता अशी प्रतिक्रि या आता लोकांमधून येत आहे. हे काम असेच संथ गतीने सुरु राहिले तर पुढील पावसाळ्यात हा रस्ता वाहतुकीयोग्य राहणार नाही.पाली-खोपोली मार्गावरील जो रस्ता अजून रुंदीकरणासाठी घेतलेला नाही, तेथे मूळ डांबरी रस्त्यावर अनेक छोटे-मोठे खड्डे पडले आहेत. या रस्त्यावरून वाहनचालकांना गाडी चालवताना अक्षरश: कसरत करावी लागते. त्यामुळे वाहनांचेही मोठे नुकसान होत आहे.दुपदरी रस्त्याचे रुंदीकरण होऊन रस्ता मोठा होणार असला तरी जोपर्यंत हे काम पूर्ण होत नाही तोपर्यंत वाहतुकीसाठी वापरला जाणारा रस्ता हा सुरळीत ठेवण्याची जबाबदारी कंत्राटदाराची असून त्याकडे दुर्लक्ष होत असल्याचे परिसरातील नागरिकांचे म्हणणे आहे.अतिशय खराब झालेल्या या रस्त्यावरून रात्रीच्या वेळी मार्गावर ज्या ठिकाणी रुंदीकरणाचे काम सुरु आहे त्या ठिकाणी मातीचा भराव घातला असून वाहनांमुळे धुराळा उडत आहे. यामुळे या भागातील अनेक जणांना त्वचा रोग आणि श्वसनाचा त्रास जाणवत आहे.

टॅग्स :Raigadरायगडroad transportरस्ते वाहतूक