शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
2
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
3
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
4
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
5
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
6
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
7
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
8
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
9
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
10
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
11
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
12
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
13
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
14
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
15
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
16
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
17
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
18
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
19
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
20
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले

पाली-खोपोली राज्यमार्ग अवघ्या बारा तासांत पूर्ववत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2018 02:13 IST

मुसळधार पावसामुळे खोपोली-पाली राज्यमार्गावरील पूल वाहून गेला होता. त्यामुळे वाहतूक ठप्प होती.

जयंत धुळपअलिबाग : मुसळधार पावसामुळे खोपोली-पाली राज्यमार्गावरील पूल वाहून गेला होता. त्यामुळे वाहतूक ठप्प होती. रायगड जिल्हा आपत्ती निवारण प्राधिकरण आणि बांधकाम विभागाच्या समन्वयाने अवघ्या बारा तासांत युध्दपातळीवर काम करून हा पूल बांधण्यात आल्याने राज्यमार्गावरील वाहतूक सुरू झाली आहे.रविवारी रात्री मुसळधार पावसामुळे पाली - खोपोली रस्त्यावरील खुरावले फाट्याजवळील पूल सोमवारी सकाळी अकराच्या सुमारास वाहुन गेला. अपघात रोखण्यासाठी पालीचे पोलीस निरीक्षक रवींद्र शिंदे यांनी वाहतूक बंद केली. पोलीस निरीक्षक शिंदे यांनी जड वाहने वाकण फाट्यावरून पेण मार्गे वळविली, तर लहान वाहनांची रहदारी उद्धर मार्गे वळविण्यात आली.जिल्ह्यात नुकताच केंद्रीय राष्ट्रीय महामार्ग निर्माण मंत्रालयाने वाकण- पाली-खोपोली हा रस्ता एनएच ५४८-अ राष्ट्रीय महामार्ग घोषित केला. या रस्त्याच्या रु ंदीकरणाचे काम सुरु आहे. त्यासाठी खुरावले फाट्याजवळ रस्त्याच्या निम्म्याभागाचे काम सुरु होते व जुन्या निम्म्या भागावरून रहदारी सुरु होती. या ठिकाणी असलेला छोटा पूल (पाइप मोरी) संततधार पावसामुळे आलेल्या प्रचंड लोंढ्यामुळे वाहून गेली. त्यावेळी पालीचे तहसीलदार बी.एन. निंबाळकर पदवीधर निवडणूक मतदान प्रक्रियेत व्यस्त होते. परंतु परिस्थितीचे गांभीर्य ओळखून ते लगेचच घटनास्थळी रवाना झाले. घटनेची माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्रमुख निवासी उपजिल्हाधिकारी किरण पाणबुडे व आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सागर पाठक यांना देण्यात आली.लगेचच रायगड पोलीस, महसूल, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ आणि संबंधित रस्त्याचे काम करणारे ठेकेदार या सर्वांचा समन्वय ३० मिनिटांत साधण्यात आला. घटनास्थळी निंबाळकर यांच्या समवेत महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे कार्यकारी अभियंता संजय गांगुर्डे, उपअभियंता सचिन निफाडे, पालीचे पोलीस निरीक्षक रवींद्र शिंदे आदी वरिष्ठ अधिकारी पोहोचले.दीड तासात पुलाच्या उभारणीचे काम सुरूदोन हायड्रा मशिन्स, दोन जेसीबी आणि दोन पोकलॅन्डच्या मदतीने सोमवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास नव्या पुलाच्या उभारणीस सुरु वात करण्यात आली. पुलाचे जुने पाइप ६०० मिमीचे होते. ते हटवून त्या ठिकाणी १२०० मिमीचे सिमेंट पाइप टाकणे आवश्यक होते. तेथून जवळच जांभूळपाडा येथे याच रस्त्याच्या कामाचा डेपो होता तेथून तातडीने पाइप आणले.रस्त्याचा भराव मोकळा करून पाइप टाकण्यासाठी जागा तयार करून पाइप टाकण्यात आले. रस्त्यावरून रहदारी पूर्ववत सुरु करण्यात आली आहे. अवजड वाहतूक मात्र अद्याप सुरु केलेली नाही. अर्थात ही तात्पुरती व्यवस्था आहे, पावसाळा संपल्यावर रस्त्याच्या निम्म्या भागाचे काँक्रीटीकरण पूर्ण झाल्यावर त्यावरु न रहदारी वळवून उर्वरित भागाचे काम पुन्हा करण्यात येईल, अशी माहिती राज्य रस्ते विकास महामंडळाचे उप अभियंता सचिन निफाडे यांनी दिली आहे.