शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

पाली-खोपोली राज्यमार्ग अवघ्या बारा तासांत पूर्ववत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2018 02:13 IST

मुसळधार पावसामुळे खोपोली-पाली राज्यमार्गावरील पूल वाहून गेला होता. त्यामुळे वाहतूक ठप्प होती.

जयंत धुळपअलिबाग : मुसळधार पावसामुळे खोपोली-पाली राज्यमार्गावरील पूल वाहून गेला होता. त्यामुळे वाहतूक ठप्प होती. रायगड जिल्हा आपत्ती निवारण प्राधिकरण आणि बांधकाम विभागाच्या समन्वयाने अवघ्या बारा तासांत युध्दपातळीवर काम करून हा पूल बांधण्यात आल्याने राज्यमार्गावरील वाहतूक सुरू झाली आहे.रविवारी रात्री मुसळधार पावसामुळे पाली - खोपोली रस्त्यावरील खुरावले फाट्याजवळील पूल सोमवारी सकाळी अकराच्या सुमारास वाहुन गेला. अपघात रोखण्यासाठी पालीचे पोलीस निरीक्षक रवींद्र शिंदे यांनी वाहतूक बंद केली. पोलीस निरीक्षक शिंदे यांनी जड वाहने वाकण फाट्यावरून पेण मार्गे वळविली, तर लहान वाहनांची रहदारी उद्धर मार्गे वळविण्यात आली.जिल्ह्यात नुकताच केंद्रीय राष्ट्रीय महामार्ग निर्माण मंत्रालयाने वाकण- पाली-खोपोली हा रस्ता एनएच ५४८-अ राष्ट्रीय महामार्ग घोषित केला. या रस्त्याच्या रु ंदीकरणाचे काम सुरु आहे. त्यासाठी खुरावले फाट्याजवळ रस्त्याच्या निम्म्याभागाचे काम सुरु होते व जुन्या निम्म्या भागावरून रहदारी सुरु होती. या ठिकाणी असलेला छोटा पूल (पाइप मोरी) संततधार पावसामुळे आलेल्या प्रचंड लोंढ्यामुळे वाहून गेली. त्यावेळी पालीचे तहसीलदार बी.एन. निंबाळकर पदवीधर निवडणूक मतदान प्रक्रियेत व्यस्त होते. परंतु परिस्थितीचे गांभीर्य ओळखून ते लगेचच घटनास्थळी रवाना झाले. घटनेची माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्रमुख निवासी उपजिल्हाधिकारी किरण पाणबुडे व आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सागर पाठक यांना देण्यात आली.लगेचच रायगड पोलीस, महसूल, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ आणि संबंधित रस्त्याचे काम करणारे ठेकेदार या सर्वांचा समन्वय ३० मिनिटांत साधण्यात आला. घटनास्थळी निंबाळकर यांच्या समवेत महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे कार्यकारी अभियंता संजय गांगुर्डे, उपअभियंता सचिन निफाडे, पालीचे पोलीस निरीक्षक रवींद्र शिंदे आदी वरिष्ठ अधिकारी पोहोचले.दीड तासात पुलाच्या उभारणीचे काम सुरूदोन हायड्रा मशिन्स, दोन जेसीबी आणि दोन पोकलॅन्डच्या मदतीने सोमवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास नव्या पुलाच्या उभारणीस सुरु वात करण्यात आली. पुलाचे जुने पाइप ६०० मिमीचे होते. ते हटवून त्या ठिकाणी १२०० मिमीचे सिमेंट पाइप टाकणे आवश्यक होते. तेथून जवळच जांभूळपाडा येथे याच रस्त्याच्या कामाचा डेपो होता तेथून तातडीने पाइप आणले.रस्त्याचा भराव मोकळा करून पाइप टाकण्यासाठी जागा तयार करून पाइप टाकण्यात आले. रस्त्यावरून रहदारी पूर्ववत सुरु करण्यात आली आहे. अवजड वाहतूक मात्र अद्याप सुरु केलेली नाही. अर्थात ही तात्पुरती व्यवस्था आहे, पावसाळा संपल्यावर रस्त्याच्या निम्म्या भागाचे काँक्रीटीकरण पूर्ण झाल्यावर त्यावरु न रहदारी वळवून उर्वरित भागाचे काम पुन्हा करण्यात येईल, अशी माहिती राज्य रस्ते विकास महामंडळाचे उप अभियंता सचिन निफाडे यांनी दिली आहे.