शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

पेणमध्ये समाधानकारक पावसाने भातशेती बहरली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2018 04:42 IST

खरीप हंगामात जून, जुलै या दोन महिन्यांत पावसाने चिवट व टिच्चून फलंदाजी केल्याने पावसाच्या या हंगामी खेळातच सरासरी ७५ टक्के पावसाची नोंद झाल्याने शिवारातील भातशेतीची लागवड पूर्ण झाली आहे.

पेण : खरीप हंगामात जून, जुलै या दोन महिन्यांत पावसाने चिवट व टिच्चून फलंदाजी केल्याने पावसाच्या या हंगामी खेळातच सरासरी ७५ टक्के पावसाची नोंद झाल्याने शिवारातील भातशेतीची लागवड पूर्ण झाली आहे. साधारणपणे लागवडीखालील भातपिकांना अनुकूल हवामान लाभल्याने पेणच्या १३ हजार १०० हेक्टर क्षेत्राच्या शिवारात भातपिकाने चांगलंच बाळसं धरून भातपीक वाऱ्यावर स्वच्छंदपणे हिंदोळत आहे. एकंदर या वर्षीचा खरीप हंगाम उन्नत शेती, समृद्ध शेतकरी या शासनाच्या संकल्पनेनुसार आशादायक चित्र शिवारात निपजल्याने शेतकरीवर्गात आनंदी वातावरण असल्याचे चित्र दिसत आहे.उत्तम शेती व श्रमजीवी शेतकरी असल्याने या वर्षीचा खरीप हंगाम शेतीसाठी पॉवरफुल्ल ठरला आहे. जून महिन्यापासून सुरू झालेला पाऊस सतत राहिल्याने जुलै महिन्याच्या २० तारखेपर्यंत त्याने नित्यनियमाने आपले कर्तव्य बजावले. पेणमधील एकंदर पावसाची परिस्थिती पाहता तब्बल २२०० मि.मी. पाऊस आतापर्यंत पडलेला आहे. सरासरी पाऊस ३००० मि.मी. एवढा पडतो. मात्र, गतवर्षी ४४०० मि.मी. पाऊस पडला होता. त्यानंतर पावसाने या वर्षीचा प्रारंभी जून आणि जुलै महिन्यात चांगला वर्षाव केला आहे. यावर्षी १२ हजार ८०० हेक्टरवर प्रारंभी लागवड झाली. त्यानंतर खारभूमी क्षेत्रातील ५०० हेक्टर क्षेत्र पुनर्वसू व पुष्य नक्षत्रामध्ये पूर्णपणे लागवडीखाली आल्याने १३ हजार १०० हेक्टर क्षेत्रावर लागवडीचे उद्दिष्ट साध्य झाले. यावर्षी खते, बी-बियाणे, कीडनाशक, औषधांची वेळेवर मात्रा मिळाल्याने शासन व शेतकरी यांच्यामध्ये योग्य प्रकारे कम्युनिकेशन झाले. पाऊस लागवडीयोग्य असाच पडल्याने शेतीच्या लागवडीची कामे हवामान वेळेवर पूर्ण करता आली.या वर्षी कृषी उत्पादन भात बियाणे कंपन्यांची सुधारित व संकरीत प्रजातीच्या वाणांची पेरणी झाली असून, नर्सरी भाताच्या रोपांची सतत पडणारा पाऊस व थंड हवामान, अशी अनुकूल वातावरण निर्मिती झाल्यामुळे लागवड झालेल्या रोपांना वेळेत खतांची मात्रा मिळाल्याने शिवारात पिकांनी चांगलेच बाळसं धरले आहे. जुलै महिन्याच्या अखेरच पावसाची दमदार एन्ट्री होऊन सरासरी ७५ टक्के पाऊस झाल्याने येणाºया आॅगस्ट व सप्टेंबर महिन्यांत हीच रोपे फुटवा करून सशक्तपणे जोमदार होऊन कीडरोगाला बळी न पडता, उत्तम प्रकारे गर्भधारणेस तयार होऊन शिवारात आशादायक चित्र निपजेल. त्यातून उन्नत शेती व समृद्धीचे शिवार पाहावयास मिळेल, अशी शेतकरी बांधवांची आशा- आकांक्षा आहे. सध्या तालुका कृषी विभाग कीड रोग प्रतिबंधक उपाययोजनांची माहिती शेतकरी बांधवांना देत आहे. यासाठी कृषी सहायक गावोगावच्या शिवारात निरीक्षण करीत असल्याचे पेण कृषी अधिकारी ए. आर. रोकडे यांनी सांगितले.

टॅग्स :Raigadरायगड