शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
2
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
3
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
4
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
5
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
6
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
7
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
8
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
9
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
10
एसबीआयमध्ये मॅनेजर असल्याचं सांगून तरुणीला जाळ्यात ओढलं; भेटायला बोलावलं अन् लुटून झाला पसार!
11
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
12
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
13
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
14
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
15
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
16
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
17
बुलढाण्यातील संतापजनक घटना! सासरच्यांनी इतकं छळलं की, २१ वर्षाच्या गर्भवती नवविवाहितेने...; पोलिसांना पतीला कुठे पकडले?
18
राज्यातील ‘या’ वंदे भारत ट्रेनची वेळ बदलली! वेग वाढवला, लवकर पोहोचणार; प्रवाशांना मोठा लाभ
19
महाप्रलय टळला! स्वतःला अवतार म्हणणाऱ्या एबो नोहाचा नवा खळबळजनक दावा
20
एक चुकीची क्लिक अन् आयुष्यभराची कमाई स्वाहा! सायबर हॅकर्सचा नवा 'ConsentFix' अटॅक काय आहे?
Daily Top 2Weekly Top 5

पनवेलमध्ये बेवारस मृतदेहांची होतेय अवहेलना, एकाच चितेवर चार मृतदेह जाळले

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2019 02:42 IST

पनवेल महानगरपालिकेकडून बेवारस मृतदेहांची अवहेलना सुरू असल्याचा प्रकार बुधवारी निदर्शनास आला आहे. एकाच चितेवर चार मृतदेह जाळण्यात आले.

- अरुणकुमार मेहत्रेकळंबोली  - पनवेल महानगरपालिकेकडून बेवारस मृतदेहांची अवहेलना सुरू असल्याचा प्रकार बुधवारी निदर्शनास आला आहे. एकाच चितेवर चार मृतदेह जाळण्यात आले. या प्रकारामुळे नागरिकांनी नाराजी व्यक्त केली असून याला जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.पनवेल परिसरातून मुंबई-गोवा, पुणे, एनएच ४ बी, द्रुतगती त्याचबरोबर पनवेल-सायन महामार्ग जातात. तसेच इतर राज्य महामार्गाचाही समावेश होतो.पनवेलजवळून उपनगरीय तसेच इतरही रेल्वे मार्ग जातात. यामुळे अपघाताचे प्रमाण मोठ्या प्रमाणात असून दररोज शवविच्छेदनासाठी मृतदेह ग्रामीण रुग्णालयात येतात. बºयाचदा काही मृतदेहाची ओळख पटत नाही. अपघातात मृतदेह छिन्नविछिन्न झाल्याने ओळख पटवणेही अवघड होते. काहींचे वारस सापडत नाहीत. त्यामुळे काही मृतदेह तसेच शवागृहात पडून राहतात. पनवेल येथे शवागृह नसल्यामुळे ते वाशी येथे ठेवले जातात. तेथे मृतदेहाच्या नातेवाइकांची दोन महिने वाट पाहिली जाते. त्यानंतर महापालिका या मृतदेहाची विल्हेवाट लावते. या अगोदर नगरपालिका असताना देखील गुजराती स्मशानभूमीत खड्डे करून पुरले जात असत.महानगरपालिका झाल्यापासून अमरधाम स्मशानभूमीत वायू प्रज्वलित शववाहिनीत बेवारस मृतदेहांची विल्हेवाट लावली जात असत. यासाठी एका मृतदेहास दोन हजार रु पये महापालिका रोटरी क्लब यांना देत असे; परंतु गेल्या दोन वर्षांपासून सुमारे साडेतीन लाख रु पयांचे बिल थकले आहे. ते बिल महापालिका आयुक्तांकडे पाठवले; पण अद्याप बिल मिळाले नसल्याने बेवारस मृतदेह जाळण्यास नकार दिल्याचे समजते.सद्यस्थितीमध्ये महापालिका बेवारस मृतदेह गुजराती स्मशानभूमी येथे जाळले जातात. एका वेळी एकाच मृतदेहावर अंत्यविधी करणे गरजेचे असताना एकावर एक चार मृतदेह ठेवून चिता पेटवली जात आहे. बुधवारी पनवेल येथील आठ, खारघरमधील दोन तर रेल्वे पनवेलकडून दोन असे १२ मृतदेहावर एकावर एक असे चार ठेवून अंत्यविधी करण्यात आला. महापालिका मरणानंतरही यातना देत आहे. महानगरपालिकेच्या या गलथान कारभाराविषयी नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.अशा प्रकारचे प्रकार पुन्हा होणार नाहीत याची काळजी घ्यावी व बुधवारी झालेल्या प्रकाराला जबाबदार असणाऱ्यांवरही कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.मृतदेह अवहेलनेच्या घटनेची पुनरावृत्तीपनवेल नगरपालिका असतानाही एकाच खड्ड्यात बारा बेवारस मृतदेह पुरण्यात आल्याची घटना २0 नोव्हेंबर २0१४ रोजी उघडकीस आली होती.नगरपालिकेचे तेच कर्मचारी महापालिकेत काम करतात. आताही परिस्थिती वेगळी नाही. अधिकारी याकडे दुर्लक्ष करतात. सोन्या मारुतीवर जबाबदारी ढकलून मोकळे होतात.बुधवारी एकावर एक चार बेवारस मृतदेह जाळल्याने आणखी किती दिवस महापालिका अवहेलना करणार आहे, असा पनवेलकरांनी प्रश्न उपस्थित केला आहे.एका वेळी एकच मृतदेह आम्ही चितेवर जाळत असतो; परंतु सोन्या मारुती यांनी एकाच वेळी अनेक मृतदेह आणल्याने जाळण्याबाबत समस्या येत आहेत. यापुढे एका वेळी एकाच मृतदेहावर अंत्यविधी केला जाईल. रोटरी क्लब यांचे बिल थकले आहे ही वस्तुस्थिती आहे. लवकरच बिल त्यांना अदा केले जाणार आहे.- शैलेश गायकवाड,आरोग्य निरीक्षक, पनवेल महापालिका

टॅग्स :Raigadरायगडpanvelपनवेल