शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प प्रशासनाचा नवा नियम! नवीन व्हिसा ऑर्डरनुसार, लठ्ठपणा किंवा मधुमेहामुळे अमेरिकेत प्रवेश मिळणार नाही; इतर आजारांचाही उल्लेख
2
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
3
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
4
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
5
Women's World Cup : भारताच्या लेकींसह प्रेक्षकांनीही रचला इतिहास; ते पाहून ICC चा ऐतिहासिक निर्णय!
6
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
7
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
8
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
9
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
10
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
11
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
12
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
13
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
14
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
15
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
16
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
17
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
18
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
19
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट
20
Aadhaar: आधार कार्डावरील एका चुकीमुळे मोफत राशन आणि पीएफचे पैसे मिळणार नाहीत!

माथेरानसाठी ई-रिक्षाच फायदेशीर; टिसचा अहवाल; दळणवळण व पर्यावरणाचा प्रश्न निघणार निकाली

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2023 10:01 IST

माथेरान पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील असल्याने येथे आतापर्यंत कोणतेही वाहतुकीचे साधन नव्हते

माथेरान : तीन महिन्यांच्या पायलट प्रकल्पानंतर बंद असलेली माथेरानमधील ई-रिक्षांची कायमस्वरूपी सेवा सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. टाटा सामाजिक संस्थेचा (टिस) अहवाल रिक्षा संघटनेला माहिती अधिकारात मिळाला आहे. यात ई-रिक्षाच येथील दळणवळण व पर्यावरणाचा ऱ्हास या समस्येवर एकमेव तोडगा आहे. त्यामुळे घोड्यांच्या वाढणाऱ्या संख्येवर अंकुश येऊ शकतो, असे अहवालात म्हटले आहे.

माथेरान पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील असल्याने येथे आतापर्यंत कोणतेही वाहतुकीचे साधन नव्हते. हातरिक्षा हा एकमेव पर्याय होता. मात्र या हातरिक्षा चालकांची अमानवीय प्रथेतून मुक्तता व्हावी यासाठी श्रमिक रिक्षा संघटनेचे सचिव सुनील शिंदे यांनी याचिका  दाखल केली होती. या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने २०२२ मध्ये निकाल देत पर्यावरणपूरक ई-रिक्षांच्या वाहतूक सेवेला तात्पुरती मंजुरी दिली होती. पायलट प्रकल्प राबवून परिणामांचा अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते.  त्यानुसार राज्य सरकारने माथेरान नगर परिषदेच्या माध्यमातून ई-रिक्षांचा पायलट प्रकल्प राबवला.  

प्रा. सुहास भस्मे व प्रा. चैतन्य तलरेजा यांच्या नेतृत्वाखाली इतर सदस्यांनी २५ जानेवारी ते २८ फेब्रुवारी दरम्यान अभ्यास केला. यात ७६ अश्वपालक, ३६ हातरिक्षा चालक, ७४ हमाल, १०१ गृहिणी आणि ७९ प्रवाशांशी चर्चा करीत अहवाल दिला. टिसने ई-रिक्षा सुरू होण्यापूर्वी १५ विविध घटकांवर होणारे परिणाम व ई-रिक्षा सुरू झाल्यानंतरचा बदल नोंदविला आहे.

पीडित घटकांना आर्थिक साहाय्य देण्याची सूचना ई-रिक्षाची ऊर्जा खर्च करण्याची क्षमता ही ५३.७६ केजे इतकी आहे. ती इतर वाहनांपेक्षा सर्वात कमी असल्याचे निरीक्षण नोंदवत ई-रिक्षा कायमस्वरूपी सुरू करण्यापूर्वी टप्प्याटप्प्याने व गरजेनुसार संख्या वाढवावी. ई-रिक्षा सुरू झाल्यानंतर ज्या घटकांवर आर्थिक परिणाम होऊ शकतो अशा व्यक्तींसोबत सरकारने संवाद साधून त्यांना आर्थिक साहाय्य द्यावे, अशी महत्त्वपूर्ण सूचनाही टिसने केली आहे.

काही अश्वपालकांनाही ई-रिक्षा हवी ई-रिक्षा सुरू झाल्यास अश्वपालकांच्या व्यवसायावर परिणाम होऊ शकतो, अशी भीती व्यक्त केली जात आहे. मात्र काही अश्वपालकांनी ई-रिक्षा ज्येष्ठ नागरिक व महिलांना फायदेशीर ठरू शकते. त्यामुळे पर्यटन मोठ्या प्रमाणात वाढू शकते. याचा फायदा आम्हालाही होऊ शकतो, असा विश्वास व्यक्त केला आहे.

टॅग्स :environmentपर्यावरण