शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
2
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
3
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
4
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
5
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
6
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
7
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
8
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
9
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
10
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
11
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
12
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
13
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
14
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
15
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
16
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
17
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
18
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
19
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
20
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'

माथेरानसाठी ई-रिक्षाच फायदेशीर; टिसचा अहवाल; दळणवळण व पर्यावरणाचा प्रश्न निघणार निकाली

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2023 10:01 IST

माथेरान पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील असल्याने येथे आतापर्यंत कोणतेही वाहतुकीचे साधन नव्हते

माथेरान : तीन महिन्यांच्या पायलट प्रकल्पानंतर बंद असलेली माथेरानमधील ई-रिक्षांची कायमस्वरूपी सेवा सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. टाटा सामाजिक संस्थेचा (टिस) अहवाल रिक्षा संघटनेला माहिती अधिकारात मिळाला आहे. यात ई-रिक्षाच येथील दळणवळण व पर्यावरणाचा ऱ्हास या समस्येवर एकमेव तोडगा आहे. त्यामुळे घोड्यांच्या वाढणाऱ्या संख्येवर अंकुश येऊ शकतो, असे अहवालात म्हटले आहे.

माथेरान पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील असल्याने येथे आतापर्यंत कोणतेही वाहतुकीचे साधन नव्हते. हातरिक्षा हा एकमेव पर्याय होता. मात्र या हातरिक्षा चालकांची अमानवीय प्रथेतून मुक्तता व्हावी यासाठी श्रमिक रिक्षा संघटनेचे सचिव सुनील शिंदे यांनी याचिका  दाखल केली होती. या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने २०२२ मध्ये निकाल देत पर्यावरणपूरक ई-रिक्षांच्या वाहतूक सेवेला तात्पुरती मंजुरी दिली होती. पायलट प्रकल्प राबवून परिणामांचा अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते.  त्यानुसार राज्य सरकारने माथेरान नगर परिषदेच्या माध्यमातून ई-रिक्षांचा पायलट प्रकल्प राबवला.  

प्रा. सुहास भस्मे व प्रा. चैतन्य तलरेजा यांच्या नेतृत्वाखाली इतर सदस्यांनी २५ जानेवारी ते २८ फेब्रुवारी दरम्यान अभ्यास केला. यात ७६ अश्वपालक, ३६ हातरिक्षा चालक, ७४ हमाल, १०१ गृहिणी आणि ७९ प्रवाशांशी चर्चा करीत अहवाल दिला. टिसने ई-रिक्षा सुरू होण्यापूर्वी १५ विविध घटकांवर होणारे परिणाम व ई-रिक्षा सुरू झाल्यानंतरचा बदल नोंदविला आहे.

पीडित घटकांना आर्थिक साहाय्य देण्याची सूचना ई-रिक्षाची ऊर्जा खर्च करण्याची क्षमता ही ५३.७६ केजे इतकी आहे. ती इतर वाहनांपेक्षा सर्वात कमी असल्याचे निरीक्षण नोंदवत ई-रिक्षा कायमस्वरूपी सुरू करण्यापूर्वी टप्प्याटप्प्याने व गरजेनुसार संख्या वाढवावी. ई-रिक्षा सुरू झाल्यानंतर ज्या घटकांवर आर्थिक परिणाम होऊ शकतो अशा व्यक्तींसोबत सरकारने संवाद साधून त्यांना आर्थिक साहाय्य द्यावे, अशी महत्त्वपूर्ण सूचनाही टिसने केली आहे.

काही अश्वपालकांनाही ई-रिक्षा हवी ई-रिक्षा सुरू झाल्यास अश्वपालकांच्या व्यवसायावर परिणाम होऊ शकतो, अशी भीती व्यक्त केली जात आहे. मात्र काही अश्वपालकांनी ई-रिक्षा ज्येष्ठ नागरिक व महिलांना फायदेशीर ठरू शकते. त्यामुळे पर्यटन मोठ्या प्रमाणात वाढू शकते. याचा फायदा आम्हालाही होऊ शकतो, असा विश्वास व्यक्त केला आहे.

टॅग्स :environmentपर्यावरण