शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणूक: व्होटर स्लीपशिवाय मतदान नाही! सकाळी ६.३० वाजल्यापासून रांगेत असलेल्या महिलांना रोखले
2
राजा भैय्याच्या शस्त्रपूजेचा पोलिस तपास अहवाल आला; दसऱ्याला डझनभर शस्त्रांचे पूजन केले होते
3
मुलांसाठी जबरदस्त आहे 'ही' स्कीम, अनेक योजना याच्यासमोर फेल; रोज फक्त ₹८.५ रुपये वाचवून व्हाल लखपती
4
Rahul Gandhi: 'मतचोरी'च्या आरोपांत नवा ट्विस्ट! 'तो' फोटो ब्राझिलियन मॉडेलचा नाही? तर...
5
भाजपा टू भाजपा व्हाया मनसे...! महापालिका निवडणुकीपूर्वी माजी आमदार तृप्ती सावंत यांची घरवापसी
6
डिजिटल अरेस्टच्या नावाखाली तब्बल ३,००० कोटी रुपयांची फसवणूक! 'हे' लोक ठरत आहेत सायबर फ्रॉडचे बळी
7
पार्थ पवारांवर जमीन घोटाळ्याचा आरोप, CM फडणवीसांचे चौकशीचे आदेश, म्हणाले, 'अजितदादा अशा गोष्टींना...'
8
CM असताना कारपेट सोडलं नाही, आता कितीही प्रयत्न केले तरी...; फडणवीसांचा ठाकरेंवर पलटवार!
9
गर्भवती पत्नीच्या मृत्यूनं बसला धक्का; १२ तासांनी पतीनेही सोडला जीव; एकाचवेळी २ तिरडी निघणार
10
Cristiano Ronaldo: "मला माझ्या कुटुंबाला, मुलांना वेळ द्यायचा आहे" रोनाल्डो निवृत्तीच्या वाटेवर!
11
VIRAL : लग्नाच्या अगदी आधी वराची 'डिमांड लिस्ट' वाचून सासरे रडले! असं काय लिहिलं होतं?
12
लोन EMI भरतानाच कमवा व्याजाएवढा परतावा! ही 'स्मार्ट इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजी' माहीत आहे का?
13
“...तर मग पुढील महिन्यापासून माझ्या प्रत्येक बहिणीला २१०० रुपये द्या”; उद्धव ठाकरेंची मोठी मागणी
14
'बिग बॉस १९'च्या विजेत्याचं नाव लीक! रनर-अप आणि टॉप ५ची यादीही आली समोर
15
आनंद महिंद्रा RBL बँकेतील संपूर्ण हिस्सा विकणार; अवघ्या २ वर्षात कसा कमावला २७४ कोटींचा नफा
16
रशिया-युक्रेन युद्धाचा नवा केंद्रबिंदू; 'या' छोट्या शहरावर पुतिन यांचा डोळा, कारण काय?
17
हेअर फॉलला करा गुड बाय; लांब, काळ्याभोर केसांसाठी 'या' सोप्या सवयी, होईल मोठा फायदा
18
Vastu Shastra: मनी प्लांट चुकीच्या दिशेला ठेवाल, तर आयुष्यभर पश्चात्ताप कराल; पाहा योग्य दिशा!
19
घरी येत होता इलेक्ट्रिशियन, डॉक्टर पत्नी झाली फिदा; पतीला संपवण्याचा कट रचला, पण एका चुकीने...
20
बांगलादेशला कांद्याने रडवलं, भारताने निर्यात रोखली! एक किलोची किंमत ऐकून बसेल धक्का

उरणच्या वायू विद्युत केंद्रातील भीषण स्फोटात अभियंत्यानंतर एका कामगाराचाही मृत्यू; १०० मेगावॅट वीजनिर्मिती घटली 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2022 00:28 IST

दरम्यान दुसऱ्या कामगाराच्या मृत्यूची खबर मिळताच भेंडखळ, बोकडवीरा, डोंगरी,फुंण्डे या चार ग्रामपंचायतीच्या सरपंच, सदस्य आणि ग्रामस्थांनी जीटीपीएस प्रकल्पाचे मुख्य अभियंता सुनील इंगळे यांची प्रकल्पात जाऊन भेट घेतली. या भेटीत चारही ग्रामपंचायतींच्या वतीने मागण्यांचे निवेदनही देण्यात आले.

मधुकर ठाकूर -

उरण - बोकडवीरा-उरण येथील महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीच्या वायु विद्युत केंद्रातील (जीटीपीएस) वीज निर्मितीच्या ए-२ युनिटमधील स्टीम बॉयलरमध्ये रविवारी भीषण स्फोट झाला. यामुळे युनिट दुरुस्ती होईपर्यंत बंद राहणार आहे. या बंद पडलेल्या युनिटमुळे वीजनिर्मिती केंद्राची दररोजची क्षमता १०० मेगावॉटने घटली आहे. दरम्यान अभियंत्याच्या मृत्यूनंतर सोमवारी (१०) कंत्राटी कामगार विष्णू पाटील यांचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर गंभीररित्या होरपळलेल्या टेक्निशियन कुंदन पाटील यांच्यावर बर्न्स इस्पीतळात उपचार सुरू असल्याची माहिती जीटीपीएसचे पीआरओ महेश आफळे यांनी दिली.

  दरम्यान दुसऱ्या कामगाराच्या मृत्यूची खबर मिळताच भेंडखळ, बोकडवीरा, डोंगरी,फुंण्डे या चार ग्रामपंचायतीच्या सरपंच, सदस्य आणि ग्रामस्थांनी जीटीपीएस प्रकल्पाचे मुख्य अभियंता सुनील इंगळे यांची प्रकल्पात जाऊन भेट घेतली. या भेटीत चारही ग्रामपंचायतींच्या वतीने मागण्यांचे निवेदनही देण्यात आले. या प्रसंगी झालेल्या चर्चेत मृतांच्या वारसांना कायम स्वरुपी नोकरी, ५० लाखांची आर्थिक नुकसान भरपाई व भविष्यात अशा अप्रिय घटना घडणार नाहीत याची काळजी घेण्याची मागणी करण्यात आली. तसेच निर्णय घेण्यात दिरंगाई केल्यास कामगाराचा मृतदेहच प्रवेशद्वारावर ठेवण्यात येईल असा गंभीर इशारा देण्यात आला आहे.

चार ग्रामपंचायती व ग्रामस्थांच्या मागण्यांवर सोमवारी (१०) सकाळपासूनच जीटीपीएस प्रकल्पाचे वरिष्ठ अधिकारी, पोलिस, महसूल विभागाचे अधिकारी आणि ग्रामस्थ यांच्यात आठ तास मॅरेथॉन बैठक सुरू होती.मागण्या निर्माण बसत नसल्याने त्यांची पुर्तता अशक्य असल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले.मात्र ग्रामस्थांनी सकारात्मक प्रतिसाद दिला नसल्याने मागण्यांचा तिढा कायम असल्याचे न्हावा शेवा बंदर विभागाचे एसीपी धनाजी क्षीरसागर यांनी सांगितले.

तरीही ग्रामस्थ मात्र अद्यापही प्रकल्पाच्या प्रवेशद्वारावर गर्दी करुन आहेत.मागण्यांबाबत निर्णय घेण्याचे सर्वस्वी अधिकार शासनालाच आहेत. वरिष्ठांना प्रस्ताव पाठविण्यात आला असल्याची माहिती उरण जीटीपीएस प्रकल्पाचे मुख्य अभियंता सुनील इंगळे यांनी दिली.

    दरम्यान उरणमधील वायु विद्युत केंद्रातील बॉयलरमध्ये रविवारी (९) झालेल्या स्फोटानंतर वीज निर्मितीच्या संचाचे काम बंद पडले आहे.बंद पडलेल्या संचाची तांत्रिक तपासणी, दुरुस्ती नंतरच वीजनिर्मितीचे काम पुन्हा सुरू करण्यात येणार आहे.

या दरम्यान दररोजच्या वीजनिर्मितीचे काम बंद राहणार आहे.त्यामुळे दररोज १०० मेगावॉट वीजनिर्मिती कमी होणार आहे. सध्या उरणच्या या वायु विद्युत केंद्रात ३५० मेगावॉट वीजनिर्मिती केली जात असल्याची माहिती जीटीपीएसचे पीआरओ महेश आफळे यांनी दिली.

टॅग्स :electricityवीजRaigadरायगड