शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
2
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
3
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
4
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
7
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
8
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
9
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
10
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
11
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
12
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
13
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
14
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
15
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
16
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
17
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
18
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
19
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
20
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...

उरणच्या वायू विद्युत केंद्रातील भीषण स्फोटात अभियंत्यानंतर एका कामगाराचाही मृत्यू; १०० मेगावॅट वीजनिर्मिती घटली 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2022 00:28 IST

दरम्यान दुसऱ्या कामगाराच्या मृत्यूची खबर मिळताच भेंडखळ, बोकडवीरा, डोंगरी,फुंण्डे या चार ग्रामपंचायतीच्या सरपंच, सदस्य आणि ग्रामस्थांनी जीटीपीएस प्रकल्पाचे मुख्य अभियंता सुनील इंगळे यांची प्रकल्पात जाऊन भेट घेतली. या भेटीत चारही ग्रामपंचायतींच्या वतीने मागण्यांचे निवेदनही देण्यात आले.

मधुकर ठाकूर -

उरण - बोकडवीरा-उरण येथील महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीच्या वायु विद्युत केंद्रातील (जीटीपीएस) वीज निर्मितीच्या ए-२ युनिटमधील स्टीम बॉयलरमध्ये रविवारी भीषण स्फोट झाला. यामुळे युनिट दुरुस्ती होईपर्यंत बंद राहणार आहे. या बंद पडलेल्या युनिटमुळे वीजनिर्मिती केंद्राची दररोजची क्षमता १०० मेगावॉटने घटली आहे. दरम्यान अभियंत्याच्या मृत्यूनंतर सोमवारी (१०) कंत्राटी कामगार विष्णू पाटील यांचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर गंभीररित्या होरपळलेल्या टेक्निशियन कुंदन पाटील यांच्यावर बर्न्स इस्पीतळात उपचार सुरू असल्याची माहिती जीटीपीएसचे पीआरओ महेश आफळे यांनी दिली.

  दरम्यान दुसऱ्या कामगाराच्या मृत्यूची खबर मिळताच भेंडखळ, बोकडवीरा, डोंगरी,फुंण्डे या चार ग्रामपंचायतीच्या सरपंच, सदस्य आणि ग्रामस्थांनी जीटीपीएस प्रकल्पाचे मुख्य अभियंता सुनील इंगळे यांची प्रकल्पात जाऊन भेट घेतली. या भेटीत चारही ग्रामपंचायतींच्या वतीने मागण्यांचे निवेदनही देण्यात आले. या प्रसंगी झालेल्या चर्चेत मृतांच्या वारसांना कायम स्वरुपी नोकरी, ५० लाखांची आर्थिक नुकसान भरपाई व भविष्यात अशा अप्रिय घटना घडणार नाहीत याची काळजी घेण्याची मागणी करण्यात आली. तसेच निर्णय घेण्यात दिरंगाई केल्यास कामगाराचा मृतदेहच प्रवेशद्वारावर ठेवण्यात येईल असा गंभीर इशारा देण्यात आला आहे.

चार ग्रामपंचायती व ग्रामस्थांच्या मागण्यांवर सोमवारी (१०) सकाळपासूनच जीटीपीएस प्रकल्पाचे वरिष्ठ अधिकारी, पोलिस, महसूल विभागाचे अधिकारी आणि ग्रामस्थ यांच्यात आठ तास मॅरेथॉन बैठक सुरू होती.मागण्या निर्माण बसत नसल्याने त्यांची पुर्तता अशक्य असल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले.मात्र ग्रामस्थांनी सकारात्मक प्रतिसाद दिला नसल्याने मागण्यांचा तिढा कायम असल्याचे न्हावा शेवा बंदर विभागाचे एसीपी धनाजी क्षीरसागर यांनी सांगितले.

तरीही ग्रामस्थ मात्र अद्यापही प्रकल्पाच्या प्रवेशद्वारावर गर्दी करुन आहेत.मागण्यांबाबत निर्णय घेण्याचे सर्वस्वी अधिकार शासनालाच आहेत. वरिष्ठांना प्रस्ताव पाठविण्यात आला असल्याची माहिती उरण जीटीपीएस प्रकल्पाचे मुख्य अभियंता सुनील इंगळे यांनी दिली.

    दरम्यान उरणमधील वायु विद्युत केंद्रातील बॉयलरमध्ये रविवारी (९) झालेल्या स्फोटानंतर वीज निर्मितीच्या संचाचे काम बंद पडले आहे.बंद पडलेल्या संचाची तांत्रिक तपासणी, दुरुस्ती नंतरच वीजनिर्मितीचे काम पुन्हा सुरू करण्यात येणार आहे.

या दरम्यान दररोजच्या वीजनिर्मितीचे काम बंद राहणार आहे.त्यामुळे दररोज १०० मेगावॉट वीजनिर्मिती कमी होणार आहे. सध्या उरणच्या या वायु विद्युत केंद्रात ३५० मेगावॉट वीजनिर्मिती केली जात असल्याची माहिती जीटीपीएसचे पीआरओ महेश आफळे यांनी दिली.

टॅग्स :electricityवीजRaigadरायगड