शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
2
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
3
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
4
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
7
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
8
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
9
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
10
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
11
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
12
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
13
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
14
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
15
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
16
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
17
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
18
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
19
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
20
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...

विधानसभेचा सामना एकतर्फी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2019 23:43 IST

देवेंद्र फडणवीस। पेणमधील पाणीप्रश्न सोडविणार असल्याची दिली ग्वाही #MaharashshtraElection2019

लोकमत न्यूज नेटवर्कपेण : राज्यातील विधानसभेचा सामना एकतर्फी होणार, यात दुमत नाही. राजकीय मैदानात तगडे विरोधक नसल्याने मज्जाच येत नाही. निवडणुकीनंतर पेणच्या सर्वांगीण विकासासाठी एमएमआरडीएचा खजिनाच रिता करणार असून, पेण-वाशी, खारेपाटातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावणार असल्याचा विश्वास राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पेणमध्ये व्यक्त केला.१९१ पेण विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार रवि पाटील यांच्या प्रचारसभेत शुक्रवारी मुख्यमंत्री मार्गदर्शन करीत होते. एमएमआरडीए अंतर्गत नियमांचे उल्लंघन करून वाशी-खारेपाटासाठी ३८ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे; परंतु शेकापसारखे पक्ष त्याचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न करीत असल्याचे त्यांनी नमूद केले.कार्यक्रमात व्यासपीठावर आरपीआयचे राष्टÑीय अध्यक्ष व केंद्रीय मंत्री रामदास आठवले, रायगडचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण, संघटनमंत्री सतीश धोंडे, भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, म्हाडा सभापती बाळासाहेब पाटील, माजी आमदार अनिल तटकरे, आमदार अवधूत तटकरे, नगराध्यक्षा प्रीतम पाटील, गटनेते अनिरुद्ध पाटील, युवानेते वैकुंठ पाटील, आरपीआयचे जिल्हाध्यक्ष जगदीश गायकवाड, शिवसेना जिल्हाप्रमुख महेंद्र दळवी, शिवसेनेचे जि. प. सदस्य किशोर जैन आदी उपस्थित होते.पेण शहर व संपूर्ण तालुका एमएमआरडीए अंतर्गत आल्याने पेणसाठी भरघोस निधी उपलब्ध करून देणार आहे. रायगड जिल्ह्यात मोठमोठे उद्योग येऊन हा जिल्हा रोजगारनिर्मितीचे केंद्र बनेल; परंतु याचबरोबर येथील पर्यावरणाला थोडाही धक्का न लावता पर्यटन व उद्योगातून होणाऱ्या रोजगारनिर्मितीचा समन्वय साधून पुढील पाच वर्षांत विकासाचा अजेंडा राबवायचा असल्याचा उल्लेख या वेळी मुख्यमंत्र्यांनी केला.सामान्य माणसाला केंद्रस्थानी ठेवून विविध योजना, शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी योजना, त्यांच्या खात्यावर थेट अनुदान, शेतमालाला हमीभाव, बचतगटांना एक लाखाचे बिनव्याजी कर्ज, विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना, मराठा आरक्षण, धनगरांसाठी आरक्षण, आरोग्य विमा योजना, मच्छीमारांसाठी वेगळे मंत्रालय, त्यातून फिशिंग जेटी, अवजारांसाठी कर्ज, ओबीसींसाठी तीन हजार कोटींचे स्वतंत्र मंत्रालय स्थापन करणार असल्याचे त्यांनी या वेळी सांगितले.पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी, पाच वर्षांत विकासाच्या विविध योजना राबवून सरकारने सामान्य जनतेची मने जिंकली आहेत. पेण तालुक्यात अंतर्गत रस्त्यांची कामे रवि पाटील यांच्याच माध्यमातून झाली असल्याचे त्यांनी सांगितले. केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी, रवि पाटील यांच्यावर कविता केली. आरपीआयचे जिल्हाध्यक्ष जगदीश गायकवाड, शिवसेनेचे अविनाश म्हात्रे, नरेश गावंड, भाजपचे गंगाधर पाटील, अ‍ॅड. महेश मोहिते यांचीही भाषणे झाली.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपाalibag-acअलिबाग