शहरं
Join us  
Trending Stories
1
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
2
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
3
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
4
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
5
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
6
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
7
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
8
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
9
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
10
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
11
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला
12
दिवसभर खुर्चीवर बसून वाढतंय वजन? ३०-३०-३० नियमाची जादू, लठ्ठपणाला कराल बाय-बाय
13
अ‍ॅमेझॉनवर १६ जूनला अवघ्या १६ रुपयांना स्मार्टवॉच वाटली जाणार; कुपन कोड अन् वेळ लक्षात ठेवा...
14
"जर इस्त्रायलची साथ दिली तर..."; संतापलेल्या इराणचा पाश्चात्य देशांना मोठा इशारा
15
ऐन पेरणीत शेतकरी कुटुंबांवर संकट! वीज कोसळून दोन सख्ख्या भावांसह चार शेतकऱ्यांचा मृत्यू
16
अहमदाबाद प्लेन क्रॅशसंदर्भात बाबा रामदेव यांना वेगळाच संशय, स्पष्टच बोलले! केली मोठी मागणी
17
Maharashtra Rain Alert: कोकणाला रेड अलर्ट! मुंबई-ठाण्यासह 'या' जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा
18
Tarot Card: कष्ट करावे लागतील, तडकाफडकी कोणतेही निर्णय घेऊ नका; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!
19
Ahmedabad Plane Crash : कॅन्सरने आईला हिरावून नेलं, अपघातामुळे वडिलांचं छत्र हरपलं; १८ दिवसांत २ चिमुकल्या अनाथ
20
काव्या मारन विवाहबंधनात अडकणार? हा प्रसिद्ध संगीतकार करतोय डेट, रजनीकांत बोलणी करायला... 

विधानसभेचा सामना एकतर्फी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2019 23:43 IST

देवेंद्र फडणवीस। पेणमधील पाणीप्रश्न सोडविणार असल्याची दिली ग्वाही #MaharashshtraElection2019

लोकमत न्यूज नेटवर्कपेण : राज्यातील विधानसभेचा सामना एकतर्फी होणार, यात दुमत नाही. राजकीय मैदानात तगडे विरोधक नसल्याने मज्जाच येत नाही. निवडणुकीनंतर पेणच्या सर्वांगीण विकासासाठी एमएमआरडीएचा खजिनाच रिता करणार असून, पेण-वाशी, खारेपाटातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावणार असल्याचा विश्वास राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पेणमध्ये व्यक्त केला.१९१ पेण विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार रवि पाटील यांच्या प्रचारसभेत शुक्रवारी मुख्यमंत्री मार्गदर्शन करीत होते. एमएमआरडीए अंतर्गत नियमांचे उल्लंघन करून वाशी-खारेपाटासाठी ३८ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे; परंतु शेकापसारखे पक्ष त्याचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न करीत असल्याचे त्यांनी नमूद केले.कार्यक्रमात व्यासपीठावर आरपीआयचे राष्टÑीय अध्यक्ष व केंद्रीय मंत्री रामदास आठवले, रायगडचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण, संघटनमंत्री सतीश धोंडे, भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, म्हाडा सभापती बाळासाहेब पाटील, माजी आमदार अनिल तटकरे, आमदार अवधूत तटकरे, नगराध्यक्षा प्रीतम पाटील, गटनेते अनिरुद्ध पाटील, युवानेते वैकुंठ पाटील, आरपीआयचे जिल्हाध्यक्ष जगदीश गायकवाड, शिवसेना जिल्हाप्रमुख महेंद्र दळवी, शिवसेनेचे जि. प. सदस्य किशोर जैन आदी उपस्थित होते.पेण शहर व संपूर्ण तालुका एमएमआरडीए अंतर्गत आल्याने पेणसाठी भरघोस निधी उपलब्ध करून देणार आहे. रायगड जिल्ह्यात मोठमोठे उद्योग येऊन हा जिल्हा रोजगारनिर्मितीचे केंद्र बनेल; परंतु याचबरोबर येथील पर्यावरणाला थोडाही धक्का न लावता पर्यटन व उद्योगातून होणाऱ्या रोजगारनिर्मितीचा समन्वय साधून पुढील पाच वर्षांत विकासाचा अजेंडा राबवायचा असल्याचा उल्लेख या वेळी मुख्यमंत्र्यांनी केला.सामान्य माणसाला केंद्रस्थानी ठेवून विविध योजना, शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी योजना, त्यांच्या खात्यावर थेट अनुदान, शेतमालाला हमीभाव, बचतगटांना एक लाखाचे बिनव्याजी कर्ज, विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना, मराठा आरक्षण, धनगरांसाठी आरक्षण, आरोग्य विमा योजना, मच्छीमारांसाठी वेगळे मंत्रालय, त्यातून फिशिंग जेटी, अवजारांसाठी कर्ज, ओबीसींसाठी तीन हजार कोटींचे स्वतंत्र मंत्रालय स्थापन करणार असल्याचे त्यांनी या वेळी सांगितले.पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी, पाच वर्षांत विकासाच्या विविध योजना राबवून सरकारने सामान्य जनतेची मने जिंकली आहेत. पेण तालुक्यात अंतर्गत रस्त्यांची कामे रवि पाटील यांच्याच माध्यमातून झाली असल्याचे त्यांनी सांगितले. केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी, रवि पाटील यांच्यावर कविता केली. आरपीआयचे जिल्हाध्यक्ष जगदीश गायकवाड, शिवसेनेचे अविनाश म्हात्रे, नरेश गावंड, भाजपचे गंगाधर पाटील, अ‍ॅड. महेश मोहिते यांचीही भाषणे झाली.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपाalibag-acअलिबाग