शहरं
Join us  
Trending Stories
1
आमची ट्रॉफी, मेडल्स आम्हाला परत द्या... BCCI चा मोहसीन नक्वी यांना इशारा, ACC बैठकीत राडा
2
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
3
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
4
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
5
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
6
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
7
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
8
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
9
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
10
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
11
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
12
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?
13
भरधाव कारचा भीषण अपघातात! अनेक वेळा उलटल्यानं चुराडा, तरुणीही दूर फेकली गेली; बघा VIDEO
14
Omega Seiki: जगातील पहिली ड्रायव्हरलेस रिक्षा भारतात लॉन्च, एका चार्जवर १२० किमी धावणार!
15
महात्मा गांधींना शरण जाणे हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा वैचारिक पराभव; काँग्रेसचा खोचक टोला
16
पाकिस्तानात गेलं की ISI एजंट बनतं का? सोनम वांगचुक यांच्या पत्नीने हिंसाचारासाठी CRPF ला धरलं जबाबदार
17
गावात वास्तव्य, सायकलवरून प्रवास आणि..., असं आहे Arattaiचे संस्थापक श्रीधर वेंबू यांचं साधं राहणीमान
18
"आजकाल मुलांना वाढवणं कठीण...", मृण्मयी देशपांडेने व्यक्त केलं मत, पालकांबद्दल म्हणाली...
19
मोठी बातमी! दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत पोहचणार; पुढच्या आठवड्यात घोषणा करू - CM देवेंद्र फडणवीस
20
Colab Platforms Stock Price: ७३ दिवसांपासून शेअरला लागतंय अपर सर्किट, वर्षभरात ८४२% ची वाढ; गुंतवणूकदार मालामाल

रायगडमध्ये ऑलिव्ह रिडले प्रजातीचे कासव नामशेष

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2020 00:27 IST

जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात रासायनिक कारखान्यांचा बेल्ट उभा करण्यात आलेला आहे. उत्पादनानंतर कारखान्यातील सांडपाणी कोणतीच प्रक्रिया न करता थेट नदी, खाडी आणि समुद्रामध्ये सोडण्याच्या घटना घडणे हे काही नवीन राहिलेले नाही.

- आविष्कार देसाईअलिबाग : रायगड जिल्ह्यामध्ये वाढता विकास आणि त्या अनुषंगाने होणारे प्रदूषण पर्यावरणाच्या मुळावरच घाव घालत आहे. चार दशकांपूर्वी अलिबाग तालुक्यातील समुद्रकिनारी अंडी घालण्यासाठी येणारे आॅलिव्ह रिडले प्रजातीचे कासवच आता नामशेष झाले आहेत. त्याचप्रमाणे तेथेच आढळणारी स्पिनिफेक्स या वनस्पतीचेदेखील अस्तित्व संपुष्टात आल्याने जैवसंपदेला धोका निर्माण झाला आहे.जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात रासायनिक कारखान्यांचा बेल्ट उभा करण्यात आलेला आहे. उत्पादनानंतर कारखान्यातील सांडपाणी कोणतीच प्रक्रिया न करता थेट नदी, खाडी आणि समुद्रामध्ये सोडण्याच्या घटना घडणे हे काही नवीन राहिलेले नाही. प्रदूषणाच्या माध्यमातून सातत्याने पर्यावरणावर आघात होत असल्याने जैवविविधतेला धोका निर्माण झालेला आहे. रायगड जिल्ह्याला निसर्गाने मुक्तहस्ते उधळन केलेली आहे. त्यामुळे येथील समुद्रकिनारे अतिशय स्वच्छ असायचे. अलिबागमधील विशेषत: वरसोलीमधील समुद्रकिनारी ८० च्या दशकात आॅलिव्ह रिडले प्रजातीचे कासव सर्रास दिसून येत होते. अंडी घालण्यासाठी कासवाच्या माद्या येथे येत होत्या. कासवांच्या प्रजननासाठी हे ठिकाण अतिशय योग्य असल्याने कासवांची येथे वर्दळ पाहायला मिळायची; परंतु कालांतराने प्रदूषण वाढत गेले. त्यामुळे कासवांना पोषक असलेले वाळूचे पट्टे नाहीसे झाले, तसेच कासवांना अंडी घालण्यासाठी आवश्यक असलेली वाळूची खोलीही गायब झाली. याच कारणांनी आॅलिव्ह रिडले प्रजातीच्या कासवांचा वावर संपुष्टात आल्याने पर्यावरणप्रेमींनी चिंता व्यक्त केली आहे.आज विकासाची व्याख्या बदलली आहे. त्यामुळे मानव विकासाच्या नावाखाली एक प्रकारे निर्सगाला आव्हानच देत आहे. जैवविविधतेवर आघात करून निसर्गचक्र तुटत चालले आहे. प्रदूषण रोखून निसर्गाने दिलेल्या प्रत्येक घटकांचे जतन, संगोपन होणे गरजेचे आहे. पर्यावरण रक्षणासाठी असलेल्या विविध कायद्यांची कडक अंमलबजावणी झाली पाहीजे. संतुलन राखून विकास होण्यास काहीच हरकत नाही.- डॉ. अनिल पाटील, पर्यावरणतज्ज्ञप्रदूषण बंद झाले पाहिजे. खाडीकिनारी असणाऱ्या खारफुटी वनस्पतीत समुद्राच्या प्रंचड लाटा थोपवण्याची ताकद आहे. आज त्यांचे योग्य संवर्धन होत नसल्याने खाडीकिनारची बंदिस्ती तुटून समुद्राचे पाणी मानवी वस्तीमध्ये घुसत आहे.- राजन भगत, पर्यावरणप्रेमीनवी मुंबईतीलकिनारा फ्लेमिंगोअभयारण्य घोषित - पान/३वन्यजीवांवर विपरीत परिणामरायगडमध्ये जिल्ह्यात स्पिनिफेक्स नावाची वनस्पती समुद्रकिनारी दिसून यायची. उंच गवतासारखी वाढायची आणि त्यांना सुंदर फुले असायची, ती आता नाहीशी झाली आहे. या वनस्पतींचा नामशेष होण्याने निसर्गचक्राला फार मोठा आघात झालेला आहे.पाणथळ जागा, पाणवठच्या जागाही आता वाढत्या विकासापुढे भुईसपाट झाल्या आहेत. त्यामुळे वन्य पक्षी, जीव-जंतू याच्यावरही विपरीत परिणाम होऊन त्यांचा अधिवास नामशेष होत असल्याने हे पर्यावरणासाठी गंभीर बनत आहे.या सर्वांचा एकत्रित परिणाम महापूर, भूकंप, त्सुनामी, चक्रीवादळ अशा आपत्तीच्या माध्यमातून समस्त मानव जात अनुभवतच आली आहे. विकास निश्चितच झाला पाहिजे. मात्र, तो निसर्गाला धक्का न पोहोचवता तरच पर्यावरण आणि जीवसृष्टी टिकणार आहे.

टॅग्स :Raigadरायगड