शहरं
Join us  
Trending Stories
1
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
2
कबुतरखाना बंदी वाद राज ठाकरेंनी मध्यस्थी करून संपवावा; जैन मुनींनी घातली साद, म्हणाले...
3
Maharashtra Politics : एकनाथ शिंदे अन् आदित्य ठाकरे एकाच मंचावर येणार,नेमकं कारण काय?
4
एकही सामना न खेळता Rohit Sharma ला अचानक 'प्रमोशन'; पाकिस्तानच्या माजी कर्णधाराने केली मदत
5
500 KM रेंज देणारी Maruti e-Vitara किती तारखेला लॉन्च होणार? खास असतील फीचर्स, जाणूनघ्या किंमत!
6
“...तरच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात”; पुतण्याची काकांना थेट ऑफर; पण ठेवली मोठी अट
7
अमेरिका पाहत राहणार...! ऑटोमोबाईलचा किंग भारताला लढाऊ विमानांचे इंजिन देणार, मोठ्या डीलच्या दिशेने
8
ट्रम्प यांचे टॅरिफ वॉर, त्यात पाकिस्तान...; ऑपरेशन सिंदूर: भारताचे ४०० सैनिक अमेरिकेला जाणार
9
प्रियकरासोबत आक्षेपार्ह अवस्थेत पाहिले, आई बनली हैवान; पोटच्या पोराला कायमचं संपवलं
10
बाजारात आज पुन्हा तेजी! हिरो-सिप्लासह 'या' क्षेत्रात चांगली वाढ, तर अदानी-ITC ठरले फ्लॉप
11
'आमच्याकडे ब्रह्मोस आहे', शाहबाज शरीफ यांच्या विधानावर असदुद्दीन ओवैसी संतापले
12
'चंद्राबाबू नायडू राहुल गांधींच्या संपर्कात; म्हणून ते...', जगन मोहन रेड्डींचा मोठा दावा
13
लेक हुशार, डॉक्टर होण्याचं स्वप्न पाहिलं, पण वडिलांना नव्हतं मान्य! दूधातून गुंगीचं औषध दिलं अन्...
14
चीन-अमेरिका सैन्यात समुद्रात चकमक, ट्रम्पच्या धोकादायक जहाजाला क्षेत्राबाहेर हाकलून लावलं...
15
जुलैमध्ये 'या' कारचं नशीब अचाकनच 'चमकलं'; खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी; 4 महिन्यांचा विक्रम मोडला!
16
जत्रेतील आकाश पाळण्याला लटकली महिला, पाहणाऱ्यांच्या तोंडचं पळालं पाणी, अखेर...  
17
ना विद्युतीकरणाची गरज, ना पर्यावरणाची हानी; भारताचे पहिले हायड्रोजन ट्रेन इंजिन तयार, पहा फोटो
18
२२ वर्षांच्या आनंदमयी बजाजची मोठी भरारी! तब्बल २.५ अब्ज डॉलरचा व्यवसाय सांभाळणार
19
"मी बिपाशापेक्षा उत्तम...", मृणाल ठाकूरने तुलना करताच नेटकऱ्यांनी केलं ट्रोल, म्हणाले...
20
'क्रिमीलेअर'बाबत केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत; उत्पन्नाची मर्यादा बदलणार?

रायगडमध्ये ऑलिव्ह रिडले प्रजातीचे कासव नामशेष

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2020 00:27 IST

जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात रासायनिक कारखान्यांचा बेल्ट उभा करण्यात आलेला आहे. उत्पादनानंतर कारखान्यातील सांडपाणी कोणतीच प्रक्रिया न करता थेट नदी, खाडी आणि समुद्रामध्ये सोडण्याच्या घटना घडणे हे काही नवीन राहिलेले नाही.

- आविष्कार देसाईअलिबाग : रायगड जिल्ह्यामध्ये वाढता विकास आणि त्या अनुषंगाने होणारे प्रदूषण पर्यावरणाच्या मुळावरच घाव घालत आहे. चार दशकांपूर्वी अलिबाग तालुक्यातील समुद्रकिनारी अंडी घालण्यासाठी येणारे आॅलिव्ह रिडले प्रजातीचे कासवच आता नामशेष झाले आहेत. त्याचप्रमाणे तेथेच आढळणारी स्पिनिफेक्स या वनस्पतीचेदेखील अस्तित्व संपुष्टात आल्याने जैवसंपदेला धोका निर्माण झाला आहे.जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात रासायनिक कारखान्यांचा बेल्ट उभा करण्यात आलेला आहे. उत्पादनानंतर कारखान्यातील सांडपाणी कोणतीच प्रक्रिया न करता थेट नदी, खाडी आणि समुद्रामध्ये सोडण्याच्या घटना घडणे हे काही नवीन राहिलेले नाही. प्रदूषणाच्या माध्यमातून सातत्याने पर्यावरणावर आघात होत असल्याने जैवविविधतेला धोका निर्माण झालेला आहे. रायगड जिल्ह्याला निसर्गाने मुक्तहस्ते उधळन केलेली आहे. त्यामुळे येथील समुद्रकिनारे अतिशय स्वच्छ असायचे. अलिबागमधील विशेषत: वरसोलीमधील समुद्रकिनारी ८० च्या दशकात आॅलिव्ह रिडले प्रजातीचे कासव सर्रास दिसून येत होते. अंडी घालण्यासाठी कासवाच्या माद्या येथे येत होत्या. कासवांच्या प्रजननासाठी हे ठिकाण अतिशय योग्य असल्याने कासवांची येथे वर्दळ पाहायला मिळायची; परंतु कालांतराने प्रदूषण वाढत गेले. त्यामुळे कासवांना पोषक असलेले वाळूचे पट्टे नाहीसे झाले, तसेच कासवांना अंडी घालण्यासाठी आवश्यक असलेली वाळूची खोलीही गायब झाली. याच कारणांनी आॅलिव्ह रिडले प्रजातीच्या कासवांचा वावर संपुष्टात आल्याने पर्यावरणप्रेमींनी चिंता व्यक्त केली आहे.आज विकासाची व्याख्या बदलली आहे. त्यामुळे मानव विकासाच्या नावाखाली एक प्रकारे निर्सगाला आव्हानच देत आहे. जैवविविधतेवर आघात करून निसर्गचक्र तुटत चालले आहे. प्रदूषण रोखून निसर्गाने दिलेल्या प्रत्येक घटकांचे जतन, संगोपन होणे गरजेचे आहे. पर्यावरण रक्षणासाठी असलेल्या विविध कायद्यांची कडक अंमलबजावणी झाली पाहीजे. संतुलन राखून विकास होण्यास काहीच हरकत नाही.- डॉ. अनिल पाटील, पर्यावरणतज्ज्ञप्रदूषण बंद झाले पाहिजे. खाडीकिनारी असणाऱ्या खारफुटी वनस्पतीत समुद्राच्या प्रंचड लाटा थोपवण्याची ताकद आहे. आज त्यांचे योग्य संवर्धन होत नसल्याने खाडीकिनारची बंदिस्ती तुटून समुद्राचे पाणी मानवी वस्तीमध्ये घुसत आहे.- राजन भगत, पर्यावरणप्रेमीनवी मुंबईतीलकिनारा फ्लेमिंगोअभयारण्य घोषित - पान/३वन्यजीवांवर विपरीत परिणामरायगडमध्ये जिल्ह्यात स्पिनिफेक्स नावाची वनस्पती समुद्रकिनारी दिसून यायची. उंच गवतासारखी वाढायची आणि त्यांना सुंदर फुले असायची, ती आता नाहीशी झाली आहे. या वनस्पतींचा नामशेष होण्याने निसर्गचक्राला फार मोठा आघात झालेला आहे.पाणथळ जागा, पाणवठच्या जागाही आता वाढत्या विकासापुढे भुईसपाट झाल्या आहेत. त्यामुळे वन्य पक्षी, जीव-जंतू याच्यावरही विपरीत परिणाम होऊन त्यांचा अधिवास नामशेष होत असल्याने हे पर्यावरणासाठी गंभीर बनत आहे.या सर्वांचा एकत्रित परिणाम महापूर, भूकंप, त्सुनामी, चक्रीवादळ अशा आपत्तीच्या माध्यमातून समस्त मानव जात अनुभवतच आली आहे. विकास निश्चितच झाला पाहिजे. मात्र, तो निसर्गाला धक्का न पोहोचवता तरच पर्यावरण आणि जीवसृष्टी टिकणार आहे.

टॅग्स :Raigadरायगड