शहरं
Join us  
Trending Stories
1
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
2
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
3
२६ वर्ष पोलीस सेवेनंतरही कॉन्स्टेबलला भारत सोडण्याचे आदेश; हायकोर्टानं थांबवले, प्रकरण काय?
4
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी
5
“जातनिहाय जनगणना निर्णय फसवा, जनतेची दिशाभूल करणारा, सरकारी भूमिका दुटप्पी”: प्रकाश आंबेडकर
6
मध्यरात्री भारत-पाकिस्तानात खणखणला फोन; तणाव कमी करण्यासाठी कुणी घेतला पुढाकार?
7
शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी
8
मलायकाला अटक होणार? कोर्टात हजर न झाल्यास अजामीनपात्र वॉरंट निघणार; नक्की प्रकरण काय?
9
युट्यूबच्या माध्यमातून गुंतवणूकदारांची दिशाभूल, सेबीची मोठी कारवाई; शेअरमध्ये गुंतवणूकीचा दिलेला सल्ला
10
गुरु-राहु-केतु गोचर: ७ राशींना मे महिना दमदार, अचानक धनलाभ; पैसा राहील, धनलक्ष्मी प्रसन्न!
11
माहिरा खान ते हानिया आमिर, पाकिस्तानी कलाकारांचे इन्स्टाग्राम अकाऊंट भारताकडून 'बॅन'
12
१५ बँका बंद ते एटीएम, रेल्वे तिकीट बुकिंगपासून बँकिंग आणि गॅस सिलिंडरपर्यंत, आजपासून बदलले अनेक नियम
13
'सीमा हैदरला पाकिस्तानात पाठवू नका, ती इथे...'; उत्तर प्रदेश राज्य महिला आयोगाच्या सदस्याचे विधान
14
नियोजित वेळेपूर्वीच अजितदादा आले, उद्घाटनही केले; भाजपा खासदार नाराज झाले, नेमके काय घडले?
15
देशात होणार जातनिहाय जनगणना; केंद्रीय मंत्रिमंडळाच्या राजकीय व्यवहार समितीच्या बैठकीत ऐतिहासिक निर्णय
16
पहलगाम हल्ल्यानंतर अचानक गायब झाली पाकिस्तानी महिला; UP मध्ये केली ९ वर्ष सरकारी नोकरी
17
"तुम्हाला माहितीये आमचे सैन्य काय करू शकते, आता परिणाम भोगायला तयार रहा"; अमेरिकेचा इराणला इशारा
18
“‘सुसंस्कृत राज्य’ म्हणून महाराष्ट्राची ओळख अबाधित ठेवण्याचा दृढनिश्चय करूया”: अजित पवार
19
LPG Price 1 May 2025: एलपीजी सिलिंडर झाला स्वस्त, पाहा दिल्ली ते चेन्नईपर्यंतचे नवे दर
20
यावेळी तीन तुकडेच करा! पाकिस्तानचे शेपूटच मुरगाळले पाहिजे, तेदेखील असे की...

रायगडमध्ये ऑलिव्ह रिडले प्रजातीचे कासव नामशेष

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2020 00:27 IST

जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात रासायनिक कारखान्यांचा बेल्ट उभा करण्यात आलेला आहे. उत्पादनानंतर कारखान्यातील सांडपाणी कोणतीच प्रक्रिया न करता थेट नदी, खाडी आणि समुद्रामध्ये सोडण्याच्या घटना घडणे हे काही नवीन राहिलेले नाही.

- आविष्कार देसाईअलिबाग : रायगड जिल्ह्यामध्ये वाढता विकास आणि त्या अनुषंगाने होणारे प्रदूषण पर्यावरणाच्या मुळावरच घाव घालत आहे. चार दशकांपूर्वी अलिबाग तालुक्यातील समुद्रकिनारी अंडी घालण्यासाठी येणारे आॅलिव्ह रिडले प्रजातीचे कासवच आता नामशेष झाले आहेत. त्याचप्रमाणे तेथेच आढळणारी स्पिनिफेक्स या वनस्पतीचेदेखील अस्तित्व संपुष्टात आल्याने जैवसंपदेला धोका निर्माण झाला आहे.जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात रासायनिक कारखान्यांचा बेल्ट उभा करण्यात आलेला आहे. उत्पादनानंतर कारखान्यातील सांडपाणी कोणतीच प्रक्रिया न करता थेट नदी, खाडी आणि समुद्रामध्ये सोडण्याच्या घटना घडणे हे काही नवीन राहिलेले नाही. प्रदूषणाच्या माध्यमातून सातत्याने पर्यावरणावर आघात होत असल्याने जैवविविधतेला धोका निर्माण झालेला आहे. रायगड जिल्ह्याला निसर्गाने मुक्तहस्ते उधळन केलेली आहे. त्यामुळे येथील समुद्रकिनारे अतिशय स्वच्छ असायचे. अलिबागमधील विशेषत: वरसोलीमधील समुद्रकिनारी ८० च्या दशकात आॅलिव्ह रिडले प्रजातीचे कासव सर्रास दिसून येत होते. अंडी घालण्यासाठी कासवाच्या माद्या येथे येत होत्या. कासवांच्या प्रजननासाठी हे ठिकाण अतिशय योग्य असल्याने कासवांची येथे वर्दळ पाहायला मिळायची; परंतु कालांतराने प्रदूषण वाढत गेले. त्यामुळे कासवांना पोषक असलेले वाळूचे पट्टे नाहीसे झाले, तसेच कासवांना अंडी घालण्यासाठी आवश्यक असलेली वाळूची खोलीही गायब झाली. याच कारणांनी आॅलिव्ह रिडले प्रजातीच्या कासवांचा वावर संपुष्टात आल्याने पर्यावरणप्रेमींनी चिंता व्यक्त केली आहे.आज विकासाची व्याख्या बदलली आहे. त्यामुळे मानव विकासाच्या नावाखाली एक प्रकारे निर्सगाला आव्हानच देत आहे. जैवविविधतेवर आघात करून निसर्गचक्र तुटत चालले आहे. प्रदूषण रोखून निसर्गाने दिलेल्या प्रत्येक घटकांचे जतन, संगोपन होणे गरजेचे आहे. पर्यावरण रक्षणासाठी असलेल्या विविध कायद्यांची कडक अंमलबजावणी झाली पाहीजे. संतुलन राखून विकास होण्यास काहीच हरकत नाही.- डॉ. अनिल पाटील, पर्यावरणतज्ज्ञप्रदूषण बंद झाले पाहिजे. खाडीकिनारी असणाऱ्या खारफुटी वनस्पतीत समुद्राच्या प्रंचड लाटा थोपवण्याची ताकद आहे. आज त्यांचे योग्य संवर्धन होत नसल्याने खाडीकिनारची बंदिस्ती तुटून समुद्राचे पाणी मानवी वस्तीमध्ये घुसत आहे.- राजन भगत, पर्यावरणप्रेमीनवी मुंबईतीलकिनारा फ्लेमिंगोअभयारण्य घोषित - पान/३वन्यजीवांवर विपरीत परिणामरायगडमध्ये जिल्ह्यात स्पिनिफेक्स नावाची वनस्पती समुद्रकिनारी दिसून यायची. उंच गवतासारखी वाढायची आणि त्यांना सुंदर फुले असायची, ती आता नाहीशी झाली आहे. या वनस्पतींचा नामशेष होण्याने निसर्गचक्राला फार मोठा आघात झालेला आहे.पाणथळ जागा, पाणवठच्या जागाही आता वाढत्या विकासापुढे भुईसपाट झाल्या आहेत. त्यामुळे वन्य पक्षी, जीव-जंतू याच्यावरही विपरीत परिणाम होऊन त्यांचा अधिवास नामशेष होत असल्याने हे पर्यावरणासाठी गंभीर बनत आहे.या सर्वांचा एकत्रित परिणाम महापूर, भूकंप, त्सुनामी, चक्रीवादळ अशा आपत्तीच्या माध्यमातून समस्त मानव जात अनुभवतच आली आहे. विकास निश्चितच झाला पाहिजे. मात्र, तो निसर्गाला धक्का न पोहोचवता तरच पर्यावरण आणि जीवसृष्टी टिकणार आहे.

टॅग्स :Raigadरायगड