शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis on Raj Thackeray Uddhav Thackeray Vijayi Melava : राज ठाकरेंचे आभार, बाळासाहेबांचे आशीर्वाद आज मलाच मिळत असतील- देवेंद्र फडणवीस
2
PNB घोटाळ्यातील फरार आरोपी नीरव मोदीचा भाऊ नेहल मोदी अटकेत, अमेरिकेत आवळळ्या मुसक्या   
3
Raj Thackeray Uddhav Thackeray Vijayi Melava Marathi : "अडवाणी ख्रिश्चन मिशनरी स्कूलमध्ये शिकले, त्यांच्या हिंदुत्वावर शंका घेऊ का?"; राज ठाकरेंनी यादीच वाचली...
4
धक्कादायक! दुधात थुंकायचा आणि तेच लोकांना द्यायचा; किळसवाणा प्रकार CCTV मध्ये कैद
5
इंग्लंडनं २४ चेंडूत गमावल्या ९ विकेट्स! टीम इंडियानं अखेरच्या षटकात हातात आलेली मॅच घालवली
6
Post Office ची जबरदस्त स्कीम, केवळ व्याजातूनच होईल ₹८२,००० ची कमाई; एकरकमी गुंतवणूक करावी लागणार
7
"हिंदुत्व ही कोणत्याही भाषेची मक्तेदारी नाही, आम्ही मराठी बोलणारे तुमच्यापेक्षा…’’, उद्धव ठाकरेंनी भाजपाला सुनावले
8
Ashadhi Ekadashi 2025: आषाढीला करा तुळशीचे 'हे' उपाय आणि पूजन, ते ठरेल इच्छापूर्तीचे साधन!
9
राज ठाकरेंचं कौतुक, उद्धव ठाकरेंवर टीका, विजय सभेवर शिंदे गटाची प्रतिक्रिया, केलं असं भाकित
10
Raj Thackeray Udddhav Thackeray Family Photo : संपूर्ण ठाकरे कुटुंब एकाच व्यासपीठावर एकत्र... खास पोज देत काढला 'फॅमिली फोटो'
11
Viral Video : धबधब्यावर करत होते धमाल, अवघ्या ५ सेकंदात निसर्गानं दाखवली कमाल! व्हिडीओ व्हायरल
12
रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला; एकाचा मृत्यू, २६ जण जखमी
13
"मुंबईत सत्तेत असताना मराठी माणसाला हद्दपार केलं आणि आता सत्ता मिळवण्यासाठी पुन्हा..."
14
भारताच्या शत्रूसोबत अजरबैजानची १७ हजार कोटींची डील, काय आहे त्यांचा प्लान?
15
"आमच्यासारख्या गावठीवर त्याने...", अखेर शरद उपाध्ये-निलेश साबळे वादावर CHYDचा कलाकार बोलला, काय म्हणाला?
16
राज ठाकरेंजवळ आदित्य, उद्धव ठाकरेंजवळ अमित, सुप्रिया सुळेंनी एकत्र आणलं; पाहा Video
17
Ashadhi Ekadashi 2025: एकादशी व्रताचे पालन म्हणजे थेट विष्णुकृपा; आषाढीपासून होते सुरुवात!
18
Uddhav Thackeray pats Raj Thackeray Video : कौतुकाची थाप..!! राज ठाकरे यांच्या भाषणानंतर उद्धव ठाकरे यांच्या कृतीने मराठी माणूस सुखावला...
19
"निवडणुकीत हरणार म्हणून कुटुंब "तहात" जिंकण्याचा प्रयत्न"; भाजपाचा पलटवार
20
"३० वर्ष झाली तरी मराठी माणसासारखी..."; सुशील केडियांनी राज ठाकरेंची जाहीर माफी मागितली

महाडमधील रेवतळे-नागेश्वर नदीवरील जुना पूल धोकादायक

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2019 06:56 IST

महाड तालुक्यातील रेवतळे येथील नागेश्वरी नदीवरील जुना पूल धोकादायक स्थितीत असल्याबाबतचे पत्र ग्रामपंचायतीचे सरपंच किशोर शेट यांनी प्रांताधिकारी व सार्वजनिक बांधकाम विभाग महाड यांना दिले आहे.

बिरवाडी : महाड तालुक्यातील रेवतळे येथील नागेश्वरी नदीवरील जुना पूल धोकादायक स्थितीत असल्याबाबतचे पत्र ग्रामपंचायतीचे सरपंच किशोर शेट यांनी प्रांताधिकारी व सार्वजनिक बांधकाम विभाग महाड यांना दिले आहे. ग्रामपंचायत रेवतळे सरपंच किशोर शेट यांनी दिलेल्या पत्रानुसार महाड ते रेवतळे मार्गे मंडणगड खेड व दापोली हा मुख्य वाहतुकीचा रस्ता आहे. या मार्गावर रेवतळे येथील नागेश्वरी नदीवर असणारा पूल कालबाह्य व नादुरुस्त झाला आहे. या पुलावरून दररोज शेकडो वाहनांची ये-जा चालू आहे.पुलाची उंची कमी असल्याने तो पावसाळ्याच्या दिवसात वारंवार पाण्याखाली असतो, त्यामुळे या मार्गावरील वाहनचालकांना तासन्तास थांबावे लागत असल्याने त्यांच्या कामाचा खोळंबा होतो, त्यामुळे पुढील गावाचा, तालुक्याचा व जिल्ह्याचा संपर्क तुटतो. पूल कालबाह्य व नादुरुस्त असल्याने केव्हाही कोसळण्याची शक्यता निर्माण झाली आहे, त्यामुळे मोठ्या प्रमाणात जीवितहानी व वित्तहानी होऊ शकते, अशी भीती लेखी निवेदनात व्यक्त करण्यात आली आहे.हा पूल आंबिवली येथील धरणक्षेत्राच्या पाण्याखाली जात असल्याने या पुलाला पर्याय म्हणून नवीन पूल बांधण्यात येत आहे; परंतु या नवीन पुलाचे बांधकाम रखडल्याने वाहतुकीचा पूर्ण बोजवारा उडाला आहे, त्यामुळे नवीन पुलाचे बांधकाम तातडीने पूर्ण होणे गरजेचे आहे, अशी मागणी करण्यात आली आहे. जुन्या पुलावरील वाहतूक अत्यंत धोकादायक अवस्थेत असल्याने सावित्री पूल दुर्घटनेची पुनरावृत्ती टाळण्याकरिता तातडीने नवीन पुलाचे बांधकाम पूर्ण करून सुरक्षित व सुरळीत वाहतूक सुरू करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. या निवेदनाची प्रत, माहिती व योग्य कारवाईकरिता तहसीलदार महाड उपविभागीय पोलीस अधिकारी, महाड स्थानिक आमदार भरत गोगावले यांना देण्यात आली आहे.>नवीन पुलाचे काम रखडलेनवीन पुलाचे बांधकाम रखडल्याने वाहतुकीचा पूर्ण बोजवारा उडाला आहे, त्यामुळे नवीन पुलाचे बांधकाम तातडीने पूर्ण होणे गरजेचे आहे, अशी मागणी करण्यात आली आहे. रेवतळे येथील नागेश्वरी नदीवरील जुन्या पुलावरील वाहतूक अत्यंत धोकादायक अवस्थेत असल्याने सावित्री पूल दुर्घटनेची पुनरावृत्ती टाळण्याकरिता तातडीने नवीन पुलाचे बांधकाम पूर्ण करून सुरक्षित व सुरळीत वाहतूक सुरू करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.