शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Alert : गणपतीच्या आगमनाला पावसाचा 'ताशा'! पुढचे काही दिवस 'मुसळधार' कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना इशारा?
2
'कर्मचारी निलंबित होऊ शकतो, तर पंतप्रधान का नाही?', PM-CM विधेयकावरुन मोदींचा काँग्रेसवर निशाणा
3
आता ट्रम्प यांचा खरा थयथयाट होणार...! देत बसले टॅरिफची धमकी, इकडे भारत-रशियानं मिळवला हात, केले अनेक करार! बघा लिस्ट
4
घर खरेदीदारांसाठी मोठी बातमी! घर बांधणे आणि खरेदी करणे स्वस्त होणार? कोणाला होणार सर्वाधिक फायदा?
5
उपराष्ट्रपती निवडणूक २०२५: पवार-ठाकरेंशी फोनवर काय बोलणे झाले? CM फडणवीसांनी सगळेच सांगितले
6
नवऱ्याच्या हत्येचा कट रचला, बॉयफ्रेंडही सामील झाला; पण 'त्या' WhatsApp मेसेजमुळे पत्नीचा डाव उघड झाला!
7
"त्यांना लीड भूमिका केलेल्याच मुली हव्या असतात...", अमृता देशमुखने सांगितलं टीव्ही मालिकांचं कटू सत्य
8
श्रीलंकेचे माजी राष्ट्रपती रानिल विक्रमसिंघे यांना अटक; सरकारी निधीचा गैरवापर केल्याचा आरोप
9
“RSS बंदी असलेली संघटना आहे का?”; CM फडणवीसांचे सुनेत्रा पवारांवरील टीकेला प्रत्युत्तर
10
Dream 11 लव्हर्सचा 'गेम ओव्हर'! टीम इंडियाच्या जर्सीवरुनही 'गायब' होणार नाव? जाणून घ्या सविस्तर
11
Airtel नं आपल्या स्वस्त रिचार्ज प्लानमध्ये केला मोठा बदल; पूर्वीपेक्षा कमी मिळणार डेटा, पाहा डिटेल्स
12
Kim Jong Un: मुलांना जवळ घेतलं, सैनिकांना दिला धीर, हुकुमशाह किम जोंग उन यांचे डोळे का पाणावले?
13
'नमस्ते सदा वत्सले मातृभूमे...', विधानसभेत काँग्रेसच्या उपमुख्यमंत्र्यांनी गायले RSS चे प्रार्थना गीत
14
Shani Amavasya 2025: देवघरात शनि देवाची मूर्ति किंवा प्रतिमा न ठेवण्यामागे काय आहे कारण?
15
बापरे! रात्रभर बेडवर नागाजवळ झोपला, सकाळी डोळं उघडताच धक्का बसला, घडलं असं...
16
Hero ने फक्त १ लाख रुपयांना लॉन्च केली दमदार बाईक, जाणून घ्या फिचर्स...
17
"चावण्याचं कारण केवळ..."; नसबंदीनंतर कुत्र्यांना सोडून देण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशावर नेमकं काय म्हणाल्या मनेका गांधी?
18
आधी लोकांची फसवणूक केली, नंतर तुरुंगात जायला लागू नये म्हणून महिलेनं काय शक्कल लढवली वाचाच!
19
“फडणवीसांचा फोन आला होता, पण आम्ही रेड्डी यांना पाठिंबा दिला आहे”; संजय राऊतांनी केले स्पष्ट
20
Asia Cup 2025 : MS धोनीनं करुन दाखवलं ते सूर्याला जमणार का? रोहितही ठरलाय फेल! जाणून घ्या खास रेकॉर्ड

महाडमधील रेवतळे-नागेश्वर नदीवरील जुना पूल धोकादायक

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2019 06:56 IST

महाड तालुक्यातील रेवतळे येथील नागेश्वरी नदीवरील जुना पूल धोकादायक स्थितीत असल्याबाबतचे पत्र ग्रामपंचायतीचे सरपंच किशोर शेट यांनी प्रांताधिकारी व सार्वजनिक बांधकाम विभाग महाड यांना दिले आहे.

बिरवाडी : महाड तालुक्यातील रेवतळे येथील नागेश्वरी नदीवरील जुना पूल धोकादायक स्थितीत असल्याबाबतचे पत्र ग्रामपंचायतीचे सरपंच किशोर शेट यांनी प्रांताधिकारी व सार्वजनिक बांधकाम विभाग महाड यांना दिले आहे. ग्रामपंचायत रेवतळे सरपंच किशोर शेट यांनी दिलेल्या पत्रानुसार महाड ते रेवतळे मार्गे मंडणगड खेड व दापोली हा मुख्य वाहतुकीचा रस्ता आहे. या मार्गावर रेवतळे येथील नागेश्वरी नदीवर असणारा पूल कालबाह्य व नादुरुस्त झाला आहे. या पुलावरून दररोज शेकडो वाहनांची ये-जा चालू आहे.पुलाची उंची कमी असल्याने तो पावसाळ्याच्या दिवसात वारंवार पाण्याखाली असतो, त्यामुळे या मार्गावरील वाहनचालकांना तासन्तास थांबावे लागत असल्याने त्यांच्या कामाचा खोळंबा होतो, त्यामुळे पुढील गावाचा, तालुक्याचा व जिल्ह्याचा संपर्क तुटतो. पूल कालबाह्य व नादुरुस्त असल्याने केव्हाही कोसळण्याची शक्यता निर्माण झाली आहे, त्यामुळे मोठ्या प्रमाणात जीवितहानी व वित्तहानी होऊ शकते, अशी भीती लेखी निवेदनात व्यक्त करण्यात आली आहे.हा पूल आंबिवली येथील धरणक्षेत्राच्या पाण्याखाली जात असल्याने या पुलाला पर्याय म्हणून नवीन पूल बांधण्यात येत आहे; परंतु या नवीन पुलाचे बांधकाम रखडल्याने वाहतुकीचा पूर्ण बोजवारा उडाला आहे, त्यामुळे नवीन पुलाचे बांधकाम तातडीने पूर्ण होणे गरजेचे आहे, अशी मागणी करण्यात आली आहे. जुन्या पुलावरील वाहतूक अत्यंत धोकादायक अवस्थेत असल्याने सावित्री पूल दुर्घटनेची पुनरावृत्ती टाळण्याकरिता तातडीने नवीन पुलाचे बांधकाम पूर्ण करून सुरक्षित व सुरळीत वाहतूक सुरू करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. या निवेदनाची प्रत, माहिती व योग्य कारवाईकरिता तहसीलदार महाड उपविभागीय पोलीस अधिकारी, महाड स्थानिक आमदार भरत गोगावले यांना देण्यात आली आहे.>नवीन पुलाचे काम रखडलेनवीन पुलाचे बांधकाम रखडल्याने वाहतुकीचा पूर्ण बोजवारा उडाला आहे, त्यामुळे नवीन पुलाचे बांधकाम तातडीने पूर्ण होणे गरजेचे आहे, अशी मागणी करण्यात आली आहे. रेवतळे येथील नागेश्वरी नदीवरील जुन्या पुलावरील वाहतूक अत्यंत धोकादायक अवस्थेत असल्याने सावित्री पूल दुर्घटनेची पुनरावृत्ती टाळण्याकरिता तातडीने नवीन पुलाचे बांधकाम पूर्ण करून सुरक्षित व सुरळीत वाहतूक सुरू करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.