शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत महायुतीचे १२ उमेदवार अर्ज माघार घेणार?; आठवलेंच्या नाराजीनाट्यानंतर मोठी घडामोड
2
पाकिस्तानचा 'माज' कमी होईना... पहलगाम हल्ल्याच्या मास्टरमाईंडची भारताला धमकी, काय म्हणाला?
3
पत्नी करेल पतीविरुद्ध प्रचार ! पतीच्या बंडखोरीमुळे भाजपच्या माजी महापौर गेल्या माहेरी; तिकीटवाटपाचा वाद थेट घरात
4
’नातेवाईकच माझा २०० रुपयांत सौदा करायचे, घरी ग्राहक यायचे’, पीडित तरुणीने दिली हादरवणारी माहिती  
5
'ऑपरेशन सिंदूर'नंतर पहिल्यांदा पाकिस्तानी नेत्याला भेटले भारताचे परराष्ट्र मंत्री, कारण काय?
6
Sanjay Raut: "आज मध्यरात्री १२ वाजता बॉम्बस्फोट होणार!" राऊतांच्या बंगल्याबाहेरील कारवर खळबळजनक मजकूर
7
छ. संभाजीनगरात भाजपनंतर शिंदेसेनेतही 'निष्ठावंतांचा' आक्रोश; मंत्री शिरसाटांच्या घरासमोर ठिय्या!
8
छ. संभाजीनगर भाजपत अराजकता! वाद शांत करण्यास गेलेल्या कार्यकर्त्यास महिलांनी झोडपले
9
केंद्राकडून महाराष्ट्राला गिफ्ट! नववर्षाच्या पूर्वसंध्येला केंद्रीय कॅबिनेट बैठकीत मोठा निर्णय
10
रुग्णालयातून बाहेर येताच माणिकराव कोकाटेंची थेट कोर्टात हजेरी, मंत्रिपद आणि शिक्षेबाबत म्हणाले…
11
Video: बॉडीबिल्डर्सनी आधी सफाई कामगाराची उडवली खिल्ली, मग पठ्ठ्याने जे केलं ते पाहून...
12
Viral Video: ई- रिक्षा शोरूमबाहेर नेली अन् पेट्रोल टाकून पेटवून दिली; तरुणानं असं का केलं?
13
IND vs NZ : रिषभ पंतची डाळ शिजणं 'मुश्किल'च; चार संधी मिळाल्या, पण प्रत्येक वेळी अपयशाचा पाढा
14
Municipal election 2026: "कुछ कह गए, कुछ..."; निष्ठावतांच्या आक्रोशानंतर भाजपा खासदार मेधा कुलकर्णींचा संताप
15
NIA प्रमुख सदानंद दाते आता महाराष्ट्राचे नवे पोलिस महासंचालक, ३ जानेवारीला स्वीकारणार पदभार
16
Video: गळफास घेतलेल्या तरुणाला जीवनदान; पोलिस अधिकाऱ्याने CPR देऊन वाचवले प्राण
17
VHT 2025-26 : पांड्याचं 'तांडव'! वनडेत ठोकली टी-२० स्टाईल सेंच्युरी; संघाने जिंकली ४०० पारची लढाई
18
Hello 2026! न्यूझीलंडमध्ये नववर्षाचे जंगी स्वागत; ऑकलंडच्या स्काय टॉवरवर फटाक्यांची आतषबाजी
19
साबणापासून फेस पॅकपर्यंत... गाढविणीच्या दुधामुळे पालटलं नशीब, आता करतेय लाखोंची कमाई
20
गुंतवणूकदारांची 'चांदी'! वर्षाच्या शेवटच्या दिवशी ४ लाख कोटींची कमाई; मेटल आणि रिलायन्स शेअर्समध्ये धूम
Daily Top 2Weekly Top 5

महाडमधील रेवतळे-नागेश्वर नदीवरील जुना पूल धोकादायक

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2019 06:56 IST

महाड तालुक्यातील रेवतळे येथील नागेश्वरी नदीवरील जुना पूल धोकादायक स्थितीत असल्याबाबतचे पत्र ग्रामपंचायतीचे सरपंच किशोर शेट यांनी प्रांताधिकारी व सार्वजनिक बांधकाम विभाग महाड यांना दिले आहे.

बिरवाडी : महाड तालुक्यातील रेवतळे येथील नागेश्वरी नदीवरील जुना पूल धोकादायक स्थितीत असल्याबाबतचे पत्र ग्रामपंचायतीचे सरपंच किशोर शेट यांनी प्रांताधिकारी व सार्वजनिक बांधकाम विभाग महाड यांना दिले आहे. ग्रामपंचायत रेवतळे सरपंच किशोर शेट यांनी दिलेल्या पत्रानुसार महाड ते रेवतळे मार्गे मंडणगड खेड व दापोली हा मुख्य वाहतुकीचा रस्ता आहे. या मार्गावर रेवतळे येथील नागेश्वरी नदीवर असणारा पूल कालबाह्य व नादुरुस्त झाला आहे. या पुलावरून दररोज शेकडो वाहनांची ये-जा चालू आहे.पुलाची उंची कमी असल्याने तो पावसाळ्याच्या दिवसात वारंवार पाण्याखाली असतो, त्यामुळे या मार्गावरील वाहनचालकांना तासन्तास थांबावे लागत असल्याने त्यांच्या कामाचा खोळंबा होतो, त्यामुळे पुढील गावाचा, तालुक्याचा व जिल्ह्याचा संपर्क तुटतो. पूल कालबाह्य व नादुरुस्त असल्याने केव्हाही कोसळण्याची शक्यता निर्माण झाली आहे, त्यामुळे मोठ्या प्रमाणात जीवितहानी व वित्तहानी होऊ शकते, अशी भीती लेखी निवेदनात व्यक्त करण्यात आली आहे.हा पूल आंबिवली येथील धरणक्षेत्राच्या पाण्याखाली जात असल्याने या पुलाला पर्याय म्हणून नवीन पूल बांधण्यात येत आहे; परंतु या नवीन पुलाचे बांधकाम रखडल्याने वाहतुकीचा पूर्ण बोजवारा उडाला आहे, त्यामुळे नवीन पुलाचे बांधकाम तातडीने पूर्ण होणे गरजेचे आहे, अशी मागणी करण्यात आली आहे. जुन्या पुलावरील वाहतूक अत्यंत धोकादायक अवस्थेत असल्याने सावित्री पूल दुर्घटनेची पुनरावृत्ती टाळण्याकरिता तातडीने नवीन पुलाचे बांधकाम पूर्ण करून सुरक्षित व सुरळीत वाहतूक सुरू करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. या निवेदनाची प्रत, माहिती व योग्य कारवाईकरिता तहसीलदार महाड उपविभागीय पोलीस अधिकारी, महाड स्थानिक आमदार भरत गोगावले यांना देण्यात आली आहे.>नवीन पुलाचे काम रखडलेनवीन पुलाचे बांधकाम रखडल्याने वाहतुकीचा पूर्ण बोजवारा उडाला आहे, त्यामुळे नवीन पुलाचे बांधकाम तातडीने पूर्ण होणे गरजेचे आहे, अशी मागणी करण्यात आली आहे. रेवतळे येथील नागेश्वरी नदीवरील जुन्या पुलावरील वाहतूक अत्यंत धोकादायक अवस्थेत असल्याने सावित्री पूल दुर्घटनेची पुनरावृत्ती टाळण्याकरिता तातडीने नवीन पुलाचे बांधकाम पूर्ण करून सुरक्षित व सुरळीत वाहतूक सुरू करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.