शहरं
Join us  
Trending Stories
1
ICC Womens World Cup 2025 : टीम इंडियाची विजयी सलामी! दीप्ती-अमनजोतसह राणाचा अष्टपैलू बाणा
2
"हमासकडे शेवटचे ३-४ दिवस शिल्लक, जर त्यांनी ऐकलं नाही तर..."; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट धमकी
3
वर्ल्ड कपच्या पहिल्याच सामन्यात दीप्ती शर्मानं रचला इतिहास; अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय
4
धनगर आरक्षणासाठी तरूणाने स्वतःची कार जाळून केला सरकारचा तीव्र निषेध; जालना तालुक्यातील घटना
5
World Cup की सौंदर्य स्पर्धा... 'या' ८ महिला क्रिकेटर्सना बघून म्हणाल- हिरोईन दिसते हिरोईन!
6
शिर्डीत ५६ भिक्षेकरी पोलिसांच्या ताब्यात; महाराष्ट्रासह ७ राज्यांतील भिक्षेकऱ्यांचा समावेश
7
आमची ट्रॉफी, मेडल्स आम्हाला परत द्या... BCCI चा मोहसीन नक्वी यांना इशारा, ACC बैठकीत राडा
8
ग्राहक न्यायालयाच्या लाचखाेर लिपिकास एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा; ठाण्यातील प्रकरण
9
कापूस खरेदीस ‘पणन’ला परवानगी; लवकरच सीसीआयसोबत करार; आर्थिक मदतीची मागणी
10
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
11
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
12
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
13
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
14
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
15
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
16
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
17
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
18
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
19
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
20
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?

अवघ्या पाच गुंठ्यांत भेंडीचे घेतले भरघोस उत्पन्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 00:50 IST

उद्धर येथील शेतकरी तुषार केळकर यांचा प्रयोग

विनोद भोईर

पाली : सुधागड तालुक्यातील उद्धर येथील तरुण प्रयोगशील शेतकरी तुषार केळकर यांनी सेंद्रिय व रासायनिक पद्धतीचा प्रयोग यशस्वी केला आहे. अवघ्या पाच गुंठ्यांतून ते भेंडीचे बंपर उत्पादन मिळवीत आहेत. सध्या दिवसाला ३० किलो भेंडी निघत आहे.

केळकर यांनी आपल्या शेतातील साधारण पाच गुंठे जमिनीची मशागत केली. जमीन नांगरली, बेडणी केली, मातीची भर घातली. त्यामध्ये शेणखत, अमृतपाणी, कोंबडीची विष्ठा, नत्र, पोटॅश, फॉस्फेट, आदी सेंद्रिय व रासायनिक घटकांचा (खतांचा) योग्य मेळ घातला. त्यातही पोटॅश व फॉस्फेट अगदी कमी प्रमाणात वापरला असल्याचे तुषारने सांगितले आणि भेंडीच्या २०० रोपांची लागवड केली. साधारण ४५ दिवसांनी भेंडी येण्यास सुरुवात झाली. सुरुवातीचे ४-५ दिवस उत्पादन कमी मिळाले; पण मागील ४ दिवसांपासून रोज किमान २५ ते ३० किलो भेंडी रोज मिळत आहे. ही भेंडी पाली बाजारात भाजीवाल्यांना २५ ते ३० रुपये होलसेल दराने विकली जाते, तर तुषार व त्यांची पत्नी शेजारील गावांमध्ये जाऊन भेंडीची किरकोळ विक्रीदेखील करतात.

रोज मिळते ३५ किलो भेंडी 

सध्या दर दिवशी ३५ किलो भेंडी निघते. काही दिवसांत उत्पादन वाढेल. तेव्हा दिवसाला ५० किलो उत्पादन मिळण्याची शक्यता आहे. अजून दीड महिने उत्पन्न मिळणार आहे. त्यानंतरही दुसऱ्या जागेवर भेंडी लावली जाणार आहे.

शेतीत नवनवीन प्रयोग करणे, चांगली मशागत, योग्य नियोजन व मेहनत यामुळे हे शक्य झाले आहे. स्थानिक शेतकऱ्यांनी देखील अशा प्रकारे शेती केल्यास भरघोस उत्पादनाबरोबरच चांगले उत्पन्न देखील मिळेल.- तुषार केळकर, तरुण प्रयोगशील शेतकरी

टॅग्स :FarmerशेतकरीRaigadरायगड