शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
2
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
3
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
4
आमदार अनिल कुमार यांच्यावर दगडफेक, दगड-विटा मारत गाड्या फोडल्या; प्रचारादरम्यान घडली घटना
5
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
6
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
7
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
8
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
9
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
10
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
11
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
12
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
13
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
14
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
15
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
16
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
17
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
18
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
19
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
20
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ

महामार्गाच्या कामात अडथळा; दीड वर्ष झाले तरी दासगाव खिंडीचे काम रखडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2020 23:26 IST

वनविभागाची परवानगीत दिरंगाई

- सिकंदर अनवारेदासगाव : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम आजही जोरात सुरू आहे. २०२१ मध्ये हे काम पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. मात्र, अनेक ठिकाणी या महामार्गाच्या कामात वनखात्याच्या अडचणी असल्याने त्या ठिकाणी ठेकेदार कंपनीला काम करता येत नाही. दीड वर्ष झाले तरी दासगाव खिंडीच्या कामात वनखात्याकडून परवानगीच मिळाली नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

इंदापूर ते कोकणाच्या तळापर्यंत दुसऱ्या टप्प्याचे काम सुरू आहे. नेहमी या मार्गावर येणारे अडथळे, महामार्गावर पडणारे खड्डे आणि दुपदरी रस्ता यामुळे गेल्या दोन वर्षांपासून मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू आहे. सध्या हे काम तेजीत असून, ५० टक्के मार्गी लागले आहे. या मार्गावरच कशेडी बोगद्याचे काम सुरू आहे; परंतु आजही काही ठिकाणी या कामाच्या चौपदरीकरणात वनखात्याच्या जमिनी येत असल्याने त्या-त्या ठिकाणी वनखात्याकडून काम करण्यास परवानगी मिळालेली नाही.

दुसऱ्या टप्प्यामधील वीर ते पोलादपूर या चौपदरीकरणाचे काम एल अ‍ॅण्ड टी या कंपनीकडे आहे. याच टप्प्यातील दासगावच्या हद्दीतील खिंडीच्या ठिकाणी अद्याप महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम करण्यास वनखात्याकडून परवानगी मिळालेली नाही. या खिंडीमध्ये राखीव वन आणि संरक्षित वन अशी वनखात्याची जमीन आहे. गेल्या दीड वर्षापासून या ठिकाणी काम करण्याची परवानगी मिळावी, यासाठी महामार्ग वनविभागाकडून प्रस्ताव पाठवण्यात आले. त्याप्रमाणे रोहा वनखात्याकडून हा प्रस्ताव नागपूर वरिष्ठ कार्यालयात पाठवला. या प्रस्तावामध्ये अनेक त्रुटी काढत, पुन्हा खाली पाठवण्यात आला. पुन्हा महामार्ग विभागाकडून त्रुटी दूर करत हा प्रस्ताव पुन्हा पाठवाला. सध्या परिस्थितीत खालून वर आणि वरून खाली, असा परवानगीचा प्रस्ताव झुलत आहे. दासगाव खिंडीच्या ठिकाणी परवानगी नसल्याने ठेकेदार कंपनीला काम करता येत नाही.

दीड वर्षापूर्वी दासगाव खिंडीच्या ठिकाणचे काम करण्याचे प्रस्ताव वनखात्याकडे सादर करण्यात आले होते. नागपूर कार्यालयाकडून काही त्रुटी काढत हे प्रस्ताव पुन्हा खाली पाठवण्यात आले. त्रुटी काढून परवानगीसाठी हा प्रस्ताव पुन्हा पाठवण्यात आला आहे.- बी.जे.एम.नायडू, प्रकल्प व्यवस्थापक

राखीव आणि संरक्षित वनामुळे हा प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाकडे पाठवण्यात आला आहे. परवानगी प्राप्त न झाल्याने काम सुरू करण्यात आलेले नाही.- प्रशांत शिंदे, वनक्षेत्रपाल, महाड

मुंबई-गोवा महामार्गाच्या कामात अशा प्रकारे परवानगी मिळण्यास आणखी विलंब झाला, तर २०२१ मध्ये महामार्गाच्या कामाचे स्वप्न अपुरेच राहणार आहे.

टॅग्स :road transportरस्ते वाहतूकRaigadरायगडMaharashtraमहाराष्ट्र