शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
2
अग्नितांडव! दिल्लीतील रुग्णालयाला भीषण आग; एकाचा मृत्यू, काचा फोडून रुग्णांना वाचवलं
3
ओलाची लाली उतरू लागली! ईलेक्ट्रीक मोटरसायकल आणली तरी खरेदीदार मिळेनात, जुलैची विक्री पहाल तर...
4
जगदीप धनखड बेपत्ता? उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा दिल्यापासून संपर्कात नाहीत; विरोधकांनी सरकारला घेरले
5
एका घरात दोनच 'लाडक्या बहिणी', इतरांचा होणार पत्ता कट; सरकारच्या नियमानं महिला धास्तावल्या
6
मायेची सावली! भावासाठी बहीण झाली ढाल; किडनी डोनेट करुन दिलं जीवदान, रक्षाबंधन झालं खास
7
मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीचा लग्नानंतर ६ महिन्यातच मृत्यू; प्रकरणात आला नवा ट्विस्ट
8
ऑपरेशन सिंदूरवेळी एकट्या S-400 ने पाकिस्तानची एवढी विमाने पाडली, हवाईदलप्रमुखांचा मोठा गौप्यस्फोट
9
Salim Pistol: बेकायदेशीर शस्त्रांचा पुरवठा करणाऱ्या 'सलीम पिस्तूल'ला नेपाळमधून अटक!
10
PIB Fact Check: रजिस्टर्ड पोस्ट सेवा बंद करण्यात आलीये का? पाहा व्हायरल दाव्यामागील सत्य
11
टीम इंडियाचा कॅप्टन गिल इथंही टॉपला! क्रिकेटच्या पंढरीत घातलेली जर्सी लिलावात ठरली लाख मोलाची
12
Video - २ रुपयांची राखी १०० रुपयांना; दुकानदाराने सांगितला व्यवसायामागच्या 'चालूगिरी'चा खेळ
13
Monsoon Travel : कुर्ग की मुन्नार; पावसाळी पिकनिकसाठी कोणतं ठिकाण ठरेल बेस्ट?
14
अमेरिका १, सिंगापुर २, नॉर्वे ३... ही यादी पाहून डोनाल्ड ट्रम्प डोकं पकडतील, कोणती आहे यादी? जाणून घ्या
15
मध्यमवर्गीयांना गरिबीच्या खाईत लोटतात या पाच सवयी, त्वरित न बदलल्यास होईल पश्चाताप
16
शरणूसोबत 'मस्साजोग' करायचं होतं; सोबत ट्रिमर, साडी, ब्लाऊज अन् कंडोम होतं, सत्य समजताच पोलीस चक्रावले
17
काश्मीर मुद्द्यावर पाकिस्तानचं पुन्हा रडगाणं; आता म्हणतायत "अमेरिका किंवा इतर कोणत्याही देशाची मध्यस्थी चालेल पण..."  
18
रेल्वेची राऊंड ट्रिप योजना...! तिकिटांवर २० टक्के डिस्काऊंट देणार, अटी एवढ्या की...; एवढे करून मिळाले जरी...
19
ICC नं टीम इंडियाला दिली होती वॉर्निंग; तरीही कोच गंभीर राहिला 'खंबीर', अन्... पडद्यामागची गोष्ट
20
अतूट नातं! १७ वर्षांपासून 'या' अभिनेत्याला राखी बांधतेय ऐश्वर्या राय; प्रेमाने मारते 'अशी' हाक

दरडग्रस्त गावांची संख्या वाढली, अलिबाग, मुरुड, महाड तालुक्यातील गावांचा समावेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2019 01:51 IST

रायगड जिल्ह्यामध्ये १०३ दरडग्रस्त गाव आहेत. परंतु ४ आॅगस्टपासून पडणाऱ्या पावसामुळे या यादीमध्ये आता तीन गावांचा नव्याने समावेश झाला आहे.

- आविष्कार देसाईअलिबाग : रायगड जिल्ह्यामध्ये १०३ दरडग्रस्त गाव आहेत. परंतु ४ आॅगस्टपासून पडणाऱ्या पावसामुळे या यादीमध्ये आता तीन गावांचा नव्याने समावेश झाला आहे. त्यामुळे सर्वच पातळीवर चिंता व्यक्त केली जात आहे. पुण्यातील भारतीय भूवैज्ञानिक सर्व्हेक्षण संस्थेने याबाबतचा सर्व्हे केला आहे. त्यातून ही बाब उघड झाली आहे. स्थलांतरीत करण्यात आलेल्यांना कायमस्वरुपी सुरक्षीत ठिकाणी घरे देण्याबाबत सरकार आणि प्रशासकीय पातळीवर विचार सुरु झाल्याने ग्रामस्थांसाठी आनंदाची बाब आहे.गेल्या काही दिवसांपासून पावसाने चांगलेच बरसून जिल्ह्यातील अलिबाग, पेण, महाड, माणगाव, पोलादपूर आणि तळा तालुक्यातील जनजीवन प्रभावित केले आहे. अतिवृष्टीमुळे अलिबाग तालुक्यातील खानाव-वेलटवाडी, मुरुड तालुक्यातील मिठेखार या गावीतील डोंगरांना भेगा पडल्या होत्या आणि महाड तालुक्यातील काळीज येथे तर जमिनीतून आवाज येत असल्याने नागरिक भयभीत झाले होते.डोंगराळ भागात मोठ्या प्रमाणात ठिकठीकाणी खोलवर भेगा पडल्या आहेत. त्यामुळे तेथील भाग कोसळण्याची शक्यता निर्माण झाली होती. जिल्हा प्रशासनाने याची दखल घेत तेथील ग्रामस्थांना तातडीने या आधीच स्थलांतरीत केले आहे. सध्या त्यांची तात्पुरती राहण्याची व्यवस्था समाज मंदिर, शाळा, ग्रामपंचायत कार्यालय येथे करण्यात आली आहे.पुण्यातील भूवैज्ञानिक सर्व्हेक्षण संस्थेचे डॉ.गजभिये आणि डॉ. रॉय यांनी काहीच दिवसांपूर्वी यातील मुरुड तालुक्यातील मिठेखार गावातील सर्व्हेक्षणाचे काम पूर्ण केले आहे. अलिबाग-वेलटवाडी आणि महाड तालुक्यातील काळीज गावाचेही लवकरच सर्व्हेक्षण पूर्ण होऊन प्रशासनाला अहवाल प्राप्त होणार आहे. अहवाल आल्यानंतर या गावातील नागिरकांना डोंगराच्या खाली सुरक्षीत ठिकाणी सरकारी जमीन देण्यात येणार आहे. त्याच ठिकाणी त्यांना प्रधानमंत्री आवास योजनेतून घरे देण्याबाबत सरकारला प्रस्ताव सादर करण्यात येणार असल्याचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी स्पष्ट केले होते.गाव सोडून खाली घरे दिली तर तुम्हाला चालतील का? असे जिल्हाधिकारी विजय सूर्यवंशी यांनी नागरिकांना विचारले होते. त्यावेळी त्यांनी गाव सोडण्यास कोणतीच हरकत नसल्याचे सांगितले होते. त्यामुळे या नागरिकांना कायम स्वरुपी खाली घरे देण्याबाबत प्रस्ताव तयार करण्यात येत आहे असे सांगून तशी शनिवारी पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्यासोबत चर्चा होऊन एकमतही झाल्याचे त्यांनी सांगितले.106 गावे दरडग्रस्तरायगड जिल्ह्यात दरडग्रस्त गावांच्या संख्येत झाली वाढत १९८४, १९८९ आणि २००५ साली अतिवृष्टीमुळे आलेल्या आपत्तीमुळे दरडग्रस्त भागाच्या संख्येत वाढ झाली आहे.२०१९ साली आलेल्या अतिवृष्टीपर्यंत दरडग्रस्त गावांची संख्या ही १०३ होती मात्र आता हाच आकडा १०६ पर्यंत पोचला आहे.भूवैज्ञानिक सर्वेक्षण संस्थेमार्फत सर्वेक्षणअलिबाग, महाड आणि मुरुड तालुक्यातील गावातील डोंगरांमध्ये भेगा पडल्याने मोठी दुर्घटना होण्याची शक्यता होती. त्यामुळे तेथील नागरिकांना तातडीने स्थलांतरीत करणे गरजेचे होेते. अलिबाग तालुक्यातील वेलटवाडी आदिवासी वाडीवर भीषण परिस्थिती आहे.त्या ठिकाणी आपत्ती ओढवली तर अख्खी वाडी खाली येऊन शेकडो नागरिकांचा जीव जाऊ शकतो. भविष्यात अशी कोणतीच अप्रिय घटना घडू नये म्हणून वेळीच पावले उचलणे गरजेचे असल्याने येथेही भूवैज्ञानिक सर्व्हेक्षण संस्थेमार्फत सर्व्हेक्षण करण्यात येत आहे, असे जिल्हाधिकारी विजय सूर्यवंशी यांनी स्पष्ट केले. 

टॅग्स :Raigadरायगडlandslidesभूस्खलन