शहरं
Join us  
Trending Stories
1
ब्लॅकमेल करणाऱ्या प्रेयसीचा खून, मृतदेह दौलताबाद घाटात फेकून प्रियकर पोलिस ठाण्यात हजर
2
"आम्ही ओबीसींच्या हिताचं रक्षण करू शकलो नाही", राहुल गांधींनी चूक मान्य केली; आता दिलं मोठं आश्वासन
3
चालत गेली अन् शाळेच्या चौथ्या मजल्यावरून मारली उडी; दहावीतील विद्यार्थिनीचा व्हिडीओ आला समोर
4
गिलनं ज्याला वेटिंगवर ठेवलं तोच कामी आला! ओली पोप पाठोपाठ ब्रूकही वॉशिंग्टनच्या 'सुंदर' चेंडूवर फसला
5
दोन रुग्णवाहिका घेऊन सासरी पोहोचला जावई, २०-२५ जण उतरले, मारहाण, तुफान राडा, कारण काय?
6
Mhada Lottery 2025: म्हाडाच्या लॉटरीत लागलेले घर भाड्याने देऊ शकतो का? जाणून घ्या नियम!
7
Sarzameen Movie Review: देशभक्तीच्या पार्श्वभूमीवरील पिता-पुत्राची भावनिक कथा 'सरजमीं'
8
"नरेंद्र मोदी मोठी समस्या नाहीत, त्यांच्यात ..."; विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांचा मोठा हल्ला!
9
मुंबई लोकलमध्ये ६२ कोटी रुपयांचे मोबाईल चोरीला; किती लोकांना परत मिळाले? 
10
चीनचा Bajaj ला मोठा धक्का; ऑगस्टपासून बंद होऊ शकते EV चे उत्पादन, कारण काय..?
11
‘५६ लाख घुसखोर आले कसे? तुम्ही राजीनामाच द्या’, महुआ मोईत्रांनी अमित शाहांना सुनावले  
12
Bank Job 2025: बँक ऑफ बडोदामध्ये मॅनेजर, सिनियर मॅनेजर पदांसाठी भरती; संधी सोडू नका!
13
'एक नंबर'! 'लोकमत डॉट कॉम'सोबत वाचकांची 'महायुती'; ६,२१,५३,००० 'लोकमतां'सह घेतली 'महाआघाडी'
14
फहाद फासिलनं सांगितले त्याचे आवडते '५' चित्रपट, तुम्ही पाहिलेत का?
15
पक्ष देईल ती जबाबदारी स्वीकारायला तयार; मंत्रि‍पदाच्या चर्चांवर राहुल नार्वेकरांचे सूचक विधान
16
एक दोन नाही तर २५००० कर्मचाऱ्यांची कपात होणार, एप्रिलनंतर आता पुन्हा एकदा Intel च्या कर्मचाऱ्यांवर संकट
17
"...हे विरोधी पक्ष ठरवू शकत नाही"; लोकसभेत प्रचंड गोंधळ, कोणत्या मुद्द्यावर केंद्रीय मंत्री भडकले?
18
'माझ्या मनावर ओझं पण...' ९००० कर्मचाऱ्यांना काढल्यानंतर सत्या नाडेला यांनी अखेर मौन सोडले; म्हणाले...
19
सरकार आता आमची गेलेली मुलं परत आणून देऊ शकतं का? शाळा दुर्घटनेनंतर पालकांचा आक्रोश
20
31 जुलैपासून सुरू होणार 'या' कंपनीचा कार प्लांट, दर वर्षी बाहेर पडणार 1.50 लाख इलेक्ट्रिक कार!

आता लग्नाची परवानगी म्हणजे अग्निदिव्यच; यजमानांना करावी लागतेय कसरत

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2020 06:47 IST

सध्या काेराेनामुळे लग्नकार्यामध्ये प्रशासकीय परवानगी काढणे बंधनकारक केले आहे.  त्यामुळे परवानग्या प्राप्त करताना दाेन्ही बाजूंची चांगलीच दमछाक हाेत आहे.

रायगड : शादी का लड्डू खाये ताे पछताये, जाे न खाये वाे भी पछताये, अशी हिंदीमध्ये म्हण आहे. परंतु लग्नबंधनामध्ये अडकणाऱ्या दाेन कुटुंबांना सध्या विलक्षण अनुभव घ्यावा लागत आहे. सध्या काेराेनामुळे लग्नकार्यामध्ये प्रशासकीय परवानगी काढणे बंधनकारक केले आहे.  त्यामुळे परवानग्या प्राप्त करताना दाेन्ही बाजूंची चांगलीच दमछाक हाेत आहे.लग्नामुळे फक्त नवरा-बायकाेच नव्हे, तर दाेन्ही कुटुंबे जाेडली जातात. त्यामुळे दाेन्हीकडे आनंद आणि उत्साहाचे वातावरण असते. काेराेनामुळे सर्वांचेच जीवनमान बदलले आहे. काेराेनाचा प्रादुर्भाव राेखता यावा म्हणून सरकारने लग्नसराईसाठी विविध नियम लागू केले आहेत. नियमांचे पालन करताना सरकारी परवानग्या काढाव्या लागत आहेत. परवानग्या काढताना वधू आणि वर पक्षाच्या नाकीनऊ येत आहेत. परवानग्या काढताना धावपळ हाेत असल्याने सर्वांनाच मनस्ताप सहन करावा लागत आहे. परवानगी काढणे गरजेचे आहे हे मान्य, परंतु एका परवानगीसाठी किमान आठ दिवस लागत आहेत. त्यामुळे अन्य कामांकडे लक्ष द्यायचे की परवानग्या काढायच्या, असा प्रश्न निर्माण झाला आहे. यामुळे वरपिता आणि वधुपिता  हैराण झाले आहेत.लग्नासाठी नियमावलीकोरोनामुळे हळद, लग्न समारंभ अथवा तत्सम कार्यक्रमास ५० पेक्षा अधिक माणसे बोलवण्यास बंदी आहे. त्यापेक्षा जास्त नागरिक जमा झाल्यास आणि त्यांच्या तोंडावर मास्क नसल्यास प्रती वऱ्हाडी २०० रुपयांचा दंड वसूल केला जाणार आहे. त्याचप्रमाणे सामाजिक अंतर राखणे, सॅनिटायझरचा वापर करणे अशी बंधने घालण्यात आली आहेत.सरकारने काेराेनाला राेखण्यासाठी नियमावली दिली आहे. हे चांगले आहे, मात्र परवानगीसाठी खूपच दमछाक हाेते. वेळेवर कर्मचारी, अधिकारी उपस्थित नसल्याने सारख्या चकरा माराव्या लागतात. वेळ तर जाताेच शिवाय मनस्ताप सहन करावा लागताे ताे वेगळाच.- रामचंद्र पाटील, वरपितापरवानगीसाठी माेठी कसरतलग्नकार्यासाठी सभागृहामध्ये बुकिंग केले असल्याचे पत्र तसेच परवानगीसाठी ग्रामपंचायत अथवा पालिका कार्यालयात अर्ज करावा लागताे. वधू आणि वराचे आधारकार्ड, जन्माचा दाखला टीसी, रहिवाशी दाखला हे पुरावे लागतात. सदरचा अर्ज पाेलिसांकडे द्यावा लागताे. त्यानंतर परवानगी मिळते. या कालावधीत एकाही यंत्रणेचा अधिकारी अथवा कर्मचारी कार्यालयामध्ये उपस्थित नसला तर प्रक्रियेला वेळ लागताे. त्यासाठी कार्यालयात सारखे हेलपाटे मारावे लागतात.परवानग्या काढणे ही चांगलीच डाेकेदुखी झाली आहे. आधीच मुलीच्या लग्नाचे टेंशन त्यातच सर्व परवानग्या काढायच्या. लग्नासाठी माणसांचे बंधनही आहे, पण ठरावीक नातेवाइकांना लग्नासाठी बाेलावल्यास अन्य नातेवाईक रुसण्याची शक्यता आहे. आम्ही नियम पाळूच, पण परवानग्या काढताना दमछाक हाेते.- जयंत पाटील, वधुपिता

टॅग्स :marriageलग्न