शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

पाणी योजना नावाला, पाणी नाही नळाला...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2020 02:28 IST

पाणी योजना दहिवली ग्रामपंचायतीमध्ये असलेल्या वंजारपाडा गावासाठी तयार करण्यात आली होती. मात्र, ही पाणी योजना नावापुरती ठरल्याने नळ कोरडे पडले आहेत.

- कांता हाबळेनेरळ : कर्जत तालुक्यातून बारमाही वाहणारी उल्हास नदी तालुक्यासाठी वरदान आहे. या नदीवर अनेक पाणीयोजना कार्यन्वित असून, अनेक गावांची तहान ही नदी भागवते. अशीच पाणी योजना दहिवली ग्रामपंचायतीमध्ये असलेल्या वंजारपाडा गावासाठी तयार करण्यात आली होती. मात्र, ही पाणी योजना नावापुरती ठरल्याने नळ कोरडे पडले आहेत. त्यामुळे पाण्यासाठी वंजारपाड्यातील ग्रामस्थांची तारांबळ उडत असून, महिलांना रात्र विहिरीवर जागून काढावी लागत आहे. दरम्यान, पाणीयोजनेच्या चौकशीसाठी ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे थेट जिल्ह्यधिकाऱ्यांना साकडे घातले आहे.कर्जत तालुक्यातील दहिवलीतर्फे वरेडी ग्रामपंचायत हद्दीतील वंजारपाडा, शेंडेवाडी या गावांसाठी २०१३-१४ मध्ये राष्ट्रीय पेयजल योजनेअंतर्गत पाणी योजना तयार करण्यात आली होती. एका वर्षाच्या आत योजना पूर्ण करून कार्यान्वित करण्यात आली.उल्हास नदीवरून साधारण दीड कि.मी. अंतरावरून पाणी गावात आणले गेले. गावात घरोघरी नळही बसवले गेले, नळाला पाणी आले. मात्र, आता ही पाणी योजना नावापुरती उरली आहे. पाणी योजना कार्यान्वित झाल्यानंतर पाणीपुरवठा समितीने ग्रामपंचायतीकडे ही योजना हस्तांतर केलीच नाही आणि नळाला आलेल्या पाण्याचे कोणाला बिलही आले नाही. परिणामी, योजना आता नावापुरती उरली आहे. ४९ लाख रुपये एवढा निधी खर्च करून बनवलेल्या या पाणी योजनेची जलवाहिनी प्लास्टिकची आहे, त्यामुळे ती सतत कुठेतरी फुटते. विजेचे बिल थकीत आहे, तर मोटार चोरीला जाण्याच्या आणि त्या व्यवस्थित न हाताळल्यामुळे जळण्याच्या घटना अनेकदा घडल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. परिणामी, पाण्यासाठी महिलांना वणवण भटकावे लागत आहे.गावातील एकमेव विहिरीवर महिलांची गर्दी होत आहे. मात्र, विहिरीलाही पाणी मर्यादित असल्याने पाण्यासाठी महिलांना रात्री विहिरीवर मुक्काम करावा लागत आहे. अनेकदा बैठकी घेऊन पाणीपुरवठा समितीकडे याबाबत विचारणाही करण्यात आली आहे. मात्र, समाधानकारक उत्तर मिळत नसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.गावातील या पाणीबाणीमुळे ग्रामस्थांनी आता आक्रमक पवित्रा घेतला असून, योजनेच्या चौकशीसाठी थेट जिल्हाधिकारी रायगड यांना तक्रारी अर्ज सादर केला आहे.पाणी योजना सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, वीजपुरवठा कमी-जास्त प्रमाणात होत असल्याने मोटार जळाली होती, ती दुरुस्त करून लवकरात लवकर गावात पाणीपुरवठा सुरू होईल.- बाबूराव माळी,सचिव, पाणीपुरवठा समितीवयामुळे डोक्यावरून हंडे भरून आणणे आता शक्य होत नाही आणि आणलेले पाणी पुरतही नाही. पाणी विकत घेण्यासाठी पैसे नसल्याने आम्ही करायचे काय? पाण्याविना मरण पत्करावे का?- मनुताई धुळे,वयोवृद्ध महिला ग्रामस्थबायकांना घरातली कामे आणि पाणी दोघांचा मेळ बसवावा लागतो; पण तो न बसल्याने आमची तारांबळ उडते. एवढी पाणी योजना गावात येऊन तिचा आम्हाला काय फायदा झाला?- मंदाबाई आगे,महिला ग्रामस्थ

टॅग्स :RaigadरायगडWaterपाणी