शहरं
Join us  
Trending Stories
1
'अमेरिकेसोबत काही मुद्दे सोडवायला हवेत', ट्रेड डील आणि टॅरिफबाबत जयशंकर यांचे मोठे विधान
2
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
3
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
4
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
5
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
6
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
7
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 
8
सयाजी शिंदेंचा मोठा निर्णय, 'सखाराम बाईंडर'च्या १० प्रयोगांचे मानधन पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार
9
“धर्म-भाषा काहीही असो, आपण सर्व हिंदू आहोत; ब्रिटिशांनी आपल्यात फूट पाडली”- मोहन भागवत
10
"...तोपर्यंत मी तुरुंगात राहण्यास तयार आहे"; सोनम वांगचुक यांनी जोधपूरहून भावाकडे पाठवला मेसेज
11
INDW vs PAKW: अचानक मैदानात पसरला पांढरा धूर: भारत-पाक सामन्यात नेमकं काय घडलं?
12
IND W vs PAK W : पुरुष असो वा महिला, नो हँडशेक फॉर्म्युला! हरमनप्रीतनं पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ
13
‘’२०२७ चा वर्ल्डकप खेळायला मिळाला तर…’’, बोलता बोलता रोहित झाला होता भावूक, तो व्हिडीओ होतोय व्हायरल  
14
बिहारमध्ये केव्हा होणार विधानसभा निवडणूक? CEC ज्ञानेश कुमार यांची घोषणा; SIR संदर्भातही मोठं विधान
15
गुजरातमधून आणलेला सिंह तामिळनाडूच्या प्राणीसंग्रहालयातून पळाला; स्थानिकांमध्ये घबराट...
16
EMI थकवला तर फोन, लॅपटॉप होणार लॉक! RBI चा नवा नियम; कर्ज वसुलीसाठी बँकांना मिळणार 'हे' अधिकार
17
अनिल परबांचे आरोप, ज्योती रामदास कदम पहिल्यांदाच मीडियासमोर आल्या; आगीची घटना कशी घडली?
18
"केस ओढले, इस्रायलच्या ध्वजाला किस करायला लावलं"; ग्रेटा थनबर्गला अमानुष वागणुकीचा आरोप, प्रकरण काय?
19
अनर्थ टळला! लँडिंगपूर्वी एअर इंडिया विमानाचं RAT एक्टिव्ह; बर्मिघम रनवेवर विमान सुरक्षित उतरवलं
20
देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी खिशात किती कॅश ठेवतात? स्वतःच केला खुलासा

बाळगंगा प्रकल्पगस्तांच्या पुनर्वसनासाठी मुहूर्त मिळेना, दहा वर्षांपासून काम रखडलेलेच

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2020 00:32 IST

Raigad News : तब्बल दहा वर्षांच्या कालावधी उलटून गेला तरीही बाळगंगा प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी राज्य सरकारकडून अजूनही ग्रीन सिग्नल मिळाला नाही.

पेण : तब्बल दहा वर्षांच्या कालावधी उलटून गेला तरीही बाळगंगा प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी राज्य सरकारकडून अजूनही ग्रीन सिग्नल मिळाला नाही. प्रकल्पबाधितांचे पुनर्वसन ज्या जागेवर होणार आहे. त्या वाशिवली, वरसई, गागोदे खुर्द या गावठाणातील जागांची पाहणी, घरांची झालेली मोजणी, मूल्यांकन नोंदी व बाळगंगा मध्यम धरण प्रकल्पाच्या साइटवर आजपर्यंत झालेल्या कामाचा पाहणी दौरा गतवर्षी ९ डिसेंबर २०१९ रोजी तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी भेट देऊन प्रत्यक्ष घेऊन बाधितांच्या पुर्नवसनाची कामे लवकरच करण्याचे आदेश संबंधित शासकीय अधिकारी व जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले होते. मात्र २०२० वर्षात कोरोना, नैसर्गिक आपत्तीत मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले. आता नवीन वर्षात बाळगंगा प्रकल्पबाधितांच्या पुनर्वसनासाठी हालचाली सुरू होतील का? याकडे प्रकल्पबाधितांचे लक्ष लागले आहे.पेणमधील वरसई, जावळी निफाड खोऱ्यातील बाळगंगा नदीतटावरील ९ महसुली गावे १३ वाड्यावरील ३३४० कुटुंब बाळगंगा मध्यम प्रकल्पाबाधित झाली आहेत. या विस्थापितांचे पुनवर्सन व्हावे यासाठी अनेकदा याबाबतीत पाहणी दौरे केले गेले. त्यानंतर आघाडीचे सरकार सत्तेवरून पायउतार झाले. भाजपचे सरकार सत्तेवर आले, आता महाविकास आघाडी सरकार स्थापन होऊन वर्षाचा कालावधी पूर्ण झाला आहे. बाळगंगा प्रकल्पाच्या दहा वर्षांच्या कालावधीत बाळगंगा तटावरील पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले. जमिनीला योग्य मोबदला व प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन यासाठी कायदेशीर मार्गाने आंदोलने झाली होती. शेवटच्या आंदोलनात मुंबई-गोवा महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळेस आंदोलकांवर केसेस दाखल झाल्या. मात्र, बाळगंगा प्रकल्पगस्तांची जिद्द काही कमी झाली नाही. रायगड जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी गतवर्षी सिडकोचे अधिकारी, जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांसह महसूल व पुनर्वसन अधिकारी कर्मचारी वर्गाला सोबत घेऊन बाळगंगा धरण प्रकल्पाच्या कामाची साइटवर पाहणी केली होती. त्याचबरोबरीने वाशिवली, वरसई व गागोदे खुर्द गावातील गावठाणातील जागांची पाहणी करून या ठिकाणी प्रकल्पबाधितांचे योग्य पुनर्वसन व नागरी सोयीसुविधा याबाबत पाहाणी दौऱ्या प्रसंगी चर्चा झाली होती. डॉ. विजय सूर्यवंशी यांनी पुनर्वसन कामे लवकरच करण्याचे आदेश दिल्यानंतर २०२० वर्षात प्रकल्पगस्तांच्या पुनर्वसनाला गती मिळाली नाही. 

टॅग्स :DamधरणRaigadरायगड