शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपामध्ये जाणार का? एकनाथ खडसे म्हणाले, “मी आजही RSSचा स्वयंसेवक आहे, गिरीश महाजन...”
2
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी
3
अमेरिकेच्या हल्ल्याला इराण कसे देणार प्रत्युत्तर? आताच्या घडीला खामेनी यांच्याकडे ३ पर्याय
4
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
5
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
6
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना सर्वोत्तम, पदोन्नती योग; बंपर लाभास अनुकूल काळ, शुभ तेच घडेल!
7
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
8
अमेरिकेनं इराणवर ज्या B-२ स्टिल्थ बॉम्बर्सनं हल्ला केला त्याची किंमत माहित्येय? तासाला किती खर्च येतो? जाणून थक्क व्हाल
9
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला
10
CM देवेंद्र फडणवीसांना पाठवली कायदेशीर नोटीस, असीम सरोदे यांनी दिली माहिती; नेमके प्रकरण काय?
11
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
12
अमेरिकेनं इराणवर चालवलं 'मिडनाइट हॅमर', केला ऑपरेशनच्या नावाचा खुलास; म्हणाले, ट्रम्प बोलें तो...!
13
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
14
ENG vs IND : कायद्यात राहून फायद्यात! जड्डू-साई सुदर्शन जोडीनं रिले कॅचसह लुटली मैफिल (VIDEO)
15
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
16
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
17
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
18
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
19
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
20
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र

बाळगंगा प्रकल्पगस्तांच्या पुनर्वसनासाठी मुहूर्त मिळेना, दहा वर्षांपासून काम रखडलेलेच

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2020 00:32 IST

Raigad News : तब्बल दहा वर्षांच्या कालावधी उलटून गेला तरीही बाळगंगा प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी राज्य सरकारकडून अजूनही ग्रीन सिग्नल मिळाला नाही.

पेण : तब्बल दहा वर्षांच्या कालावधी उलटून गेला तरीही बाळगंगा प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी राज्य सरकारकडून अजूनही ग्रीन सिग्नल मिळाला नाही. प्रकल्पबाधितांचे पुनर्वसन ज्या जागेवर होणार आहे. त्या वाशिवली, वरसई, गागोदे खुर्द या गावठाणातील जागांची पाहणी, घरांची झालेली मोजणी, मूल्यांकन नोंदी व बाळगंगा मध्यम धरण प्रकल्पाच्या साइटवर आजपर्यंत झालेल्या कामाचा पाहणी दौरा गतवर्षी ९ डिसेंबर २०१९ रोजी तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी भेट देऊन प्रत्यक्ष घेऊन बाधितांच्या पुर्नवसनाची कामे लवकरच करण्याचे आदेश संबंधित शासकीय अधिकारी व जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले होते. मात्र २०२० वर्षात कोरोना, नैसर्गिक आपत्तीत मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले. आता नवीन वर्षात बाळगंगा प्रकल्पबाधितांच्या पुनर्वसनासाठी हालचाली सुरू होतील का? याकडे प्रकल्पबाधितांचे लक्ष लागले आहे.पेणमधील वरसई, जावळी निफाड खोऱ्यातील बाळगंगा नदीतटावरील ९ महसुली गावे १३ वाड्यावरील ३३४० कुटुंब बाळगंगा मध्यम प्रकल्पाबाधित झाली आहेत. या विस्थापितांचे पुनवर्सन व्हावे यासाठी अनेकदा याबाबतीत पाहणी दौरे केले गेले. त्यानंतर आघाडीचे सरकार सत्तेवरून पायउतार झाले. भाजपचे सरकार सत्तेवर आले, आता महाविकास आघाडी सरकार स्थापन होऊन वर्षाचा कालावधी पूर्ण झाला आहे. बाळगंगा प्रकल्पाच्या दहा वर्षांच्या कालावधीत बाळगंगा तटावरील पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले. जमिनीला योग्य मोबदला व प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन यासाठी कायदेशीर मार्गाने आंदोलने झाली होती. शेवटच्या आंदोलनात मुंबई-गोवा महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळेस आंदोलकांवर केसेस दाखल झाल्या. मात्र, बाळगंगा प्रकल्पगस्तांची जिद्द काही कमी झाली नाही. रायगड जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी गतवर्षी सिडकोचे अधिकारी, जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांसह महसूल व पुनर्वसन अधिकारी कर्मचारी वर्गाला सोबत घेऊन बाळगंगा धरण प्रकल्पाच्या कामाची साइटवर पाहणी केली होती. त्याचबरोबरीने वाशिवली, वरसई व गागोदे खुर्द गावातील गावठाणातील जागांची पाहणी करून या ठिकाणी प्रकल्पबाधितांचे योग्य पुनर्वसन व नागरी सोयीसुविधा याबाबत पाहाणी दौऱ्या प्रसंगी चर्चा झाली होती. डॉ. विजय सूर्यवंशी यांनी पुनर्वसन कामे लवकरच करण्याचे आदेश दिल्यानंतर २०२० वर्षात प्रकल्पगस्तांच्या पुनर्वसनाला गती मिळाली नाही. 

टॅग्स :DamधरणRaigadरायगड