शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

पदवीधर तरुणांचा नवा आदर्श; आधुनिक पद्धतीने शेती

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2019 23:43 IST

नोकरीसाठी शहरात स्थलांतर न करता गावातच मिळवितात उत्पन्न

- सिकंदर अनवारे दासगाव : महाड तालुक्यातील दुर्गम अशा आदिस्ते गावातील तीन तरूणांनी एकत्रीत येत परंपारिक शेतीला बगल देत आधुनिक शेतीकडे पावले टाकली आहेत. विशेष म्हणजे हे तिनही तरूण पदवीधर असून त्यांनी शहराचा रस्ता न धरता गावातच उत्पन्नाचे साधन तयार केले आहे. दररोज लागणारा भाजीपाला पीक काढून त्याची विक्री याच परिसरात केली जात आहे. गाव सोडून स्थलांतरित होणाऱ्या तरूणांपुढे हा एक नवा आदर्शच आहे.खाडीपट्टा विभागात दूषित पाण्याने शेती नापीक झाल्याच्या चर्चा कायम होत असतात. शिवाय या परिसरात असलेल्या खैरे धरण प्रकल्पातील पाण्याचा वापर आता शेतीसाठी होत नाही तर केवळ पिण्याच्या पाण्यासाठी होत आहे. शिवाय शेतीमध्ये उत्पन्न नसल्याने तरूणांचा कल मोठ्या शहरांमध्ये नोकरीकडे आहे. याला बगल देत आदीस्ते गावातील तीन सुशिक्षीत तरूण मात्र शेतीकडे वळले आहेत. एवढेच नव्हे तर दररोज लागणाºया भाज्या पिकवून याठिकाणीच विक्री करून उत्पन्नाचे नवे साधन त्यांनी तयार केले आहे. आदिस्ते गावातील सुनिल साळवी, अंकुश मौले, सुरज दवंडे या तिघांनी हा प्रयत्न केला आहे. गेल्या दोन वषार्पासून ते आपल्या दिड एकर परिसरात केवळ पालेभाजी आणि फळभाजी पीक घेत आहेत. सामूहिक शेतीच्या माध्यमातून हे तिघेही एकत्रीत आले आणि त्यांनी परिसरातच उत्पन्नाचे साधन तयार केले.यातील सूरज दवंडे याच्या वडिलांनी या शेतीला सुरवात केली होती. उन्हाळयात धरणाच्या पाण्यावर शेती करण्यास सुरवात केली. त्यांचा वारसा पुढे नेत सूरज दवंडे, सुनील साळवी, अंकुश मौले या तीन तरूणांनी महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करत शेती करण्यास सुरवात केली. सूरज याने शेती विषयातील अभ्यासक्रम पूर्ण केला आहे. यामुळे परंपारिक भातशेतीबरोबर फळभाजी आणि पालेभाजी घेणे फायदेशीर असल्याचे लक्षात येताच या तीन तरूणांनी एक होत हा प्रयोग यशस्वी केला. भेंडी, गवार, चवळी, टोमॅटो, वांगी अशी विविध पिके वेगवेगळया हंगामात घेतली जात आहेत. दिड एकरात ते ही शेती करत आहेत. या पावसाळयात त्यांना भेंडीचे उत्पादन चांगल्या प्रकारे मिळाले. येणाºया पिकाला या परिसरातच बाजारपेठ उपलब्ध होत असल्याने शहरात पाठवण्याचा संबध येत नाही. आदिस्ते, वलंग, रोहन ही तीन मोठी गावे असल्याने दुकानांतून किंवा घरातून विक्री होते.उन्हाळ्यात होतो धरणाच्या पाण्याचा उपयोगशेजारीच खैरे धरण प्रकल्प आहे. हा प्रकल्प केवळ सिंचनाकरिता तयार करण्यात आला होता. यातील पाणी शेतकरी आता केवळ पिण्याकरिता वापरतात, तर नदीकिनारील शेती दूषित पाण्यामुळे करणे अनेकांनी सोडून दिले आहे.या नदीतील पाणी दूषित असले, तरी धरणाचे पाणी शेतीसाठी वापरणे शक्य असले, तरी त्याचा वापर होत नाही. मात्र, हे तरुण उन्हाळ्यात याच धरणातील पाण्याचा वापर करून शेती करत आहेत.शिक्षण घेऊन शहरात नोकरी न करता शेतीतून गावातच उत्पन्नाचे साधन तयार केलेल्या या तरुणांचा परिसरातील तरुणांपुढे एक नवा आदर्शच निर्माण झाला आहे. शिवाय दूषित पाण्याचे कारण पुढे करत, जे उन्हाळ्यात शेती करत नाहीत, त्यांच्यापुढेदेखील या तरुणांची शेती प्रेरणा देणारी ठरणार आहे.आमच्या गावाच्या शेजारीच धरण आहे. या पाण्याचा वापर केवळ पिण्यासाठी होत असतो. मात्र, शिक्षित तरुणांनी अशा प्रकारे धरणाच्या पाण्यावर शेती अथवा अन्य शेतीपूरक व्यवसाय उभा केल्यास शहरांकडे जाण्याची पाळी येणार नाही. सध्या आम्ही केवळ भाजी पिकवितो आणि याच परिसरात विक्री करतो.- सुनिल साळवी, तरूण शेतकरी

टॅग्स :Farmerशेतकरी