शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

नेरळ-कळंब रस्ता अर्धवट, ठेकेदार गेला पळून

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2019 00:04 IST

माथेरान-नेरळ-पोही या राज्यमार्ग रस्त्यावर डांबरीकरण आणि काँक्रीटीकरण काम मंजूर होते.

- कांता हाबळे नेरळ : माथेरान-नेरळ-पोही या राज्यमार्ग रस्त्यावर डांबरीकरण आणि काँक्रीटीकरण काम मंजूर होते. त्यातील डांबरीकरण काम पूर्ण करून ठेकेदाराने काम सोडून पळ काढला आहे, त्यामुळे वाहनचालकांचे हाल सुरू असून प्रचंड खड्ड्यांमुळे नेरळ रेल्वे गेटपासून साई मंदिरपर्यंतच्या रस्त्याचे अंतर पार करायला जीवघेणी कसरत करावी लागत आहे. या रस्त्याची सार्वजनिक बांधकाम विभागाचे उप अभियंता अजयकुमार सर्वगोड यांनी शनिवारी पाहणी केली असून लवकरच या रस्त्यावर खड्डे भरण्याची आशा निर्माण झाली आहे.माथेरान-नेरळ-पोही पुढे मुरबाडकडे जाणाऱ्या रस्त्याचे नेरळ भागातील रुंदीकरण तसेच रुंदीकरण केलेल्या भागात डांबरीकरण आणि साईमंदिर भागात काँक्रीटीकरण हे काम ठेकेदाराने सुरूच केले नाही. या रस्त्यावरील धामोतेपासून पोहीपर्यंत असलेली डांबरीकरण कामे मार्चमध्येच पूर्ण करून ठेकेदार कंपनी कामे अर्धवट टाकून निघून गेली आहे. या रस्त्याच्या कामासाठी २०१८ च्या अर्थसंकल्पात सव्वातीन कोटी रुपयांची तरतूद होती. त्यात पोहीपासून धामोतेपर्यंत डांबरीकरण त्यात काही भागात खडीकरण करून डांबरीकरण ही कामे अंतर्भूत होती. त्यानंतर नेरळ साईमंदिर परिसरात असलेली दुकाने लक्षात घेऊन तेथील रस्त्याचा २०० मीटरचा भाग काँक्रीटीकरण काम अंतर्भूत होते. त्याशिवाय गणेश स्वीटपासून नेरळ रेल्वे गेट या भागात रस्त्याचे रुंदीकरण आणि त्यानंतर डांबरीकरण ही कामे अंतर्भूत होती.मात्र, ठेकेदार कंपनीने पोहीपासून धोमोतेपर्यंत डांबरीकरण पूर्ण झाल्यानंतर पुढील दोन्ही कामे केली नाहीत, त्यातील रेल्वे गेटपासून पुढे रस्त्याची रुंदी कमी असल्याने त्या ठिकाणी साइडपट्टी वाढवून त्यानंतर डांबरीकरण केले जाणार होते, त्यासाठी उन्हाळ्यात तीन महिन्यांचा कालावधी असतानाही ठेकेदार कंपनीने फक्त गंमत बघण्याचे काम केले आहे. त्याच काळात रेल्वे गेटच्या पलीकडे नेरळ ग्रामपंचायतीमधील रस्त्याच्या काँक्रीटीकरणाचे काम करण्यासाठी पूर्ण रस्ता तब्बल सव्वा महिना बंद होता.या काळात ठेकेदाराला रुंदीकरण आणि डांबरीकरण ही दोन्ही कामे सहज करता आली असती. मात्र, ठेकेदाराने वाहनचालकांना त्रास देण्यासाठी ती कामे केली नाहीत. त्याच वेळी सिमेंट काँक्रीटच्या कामाकडेही कानाडोळा करून कामे सुरूच केली नाहीत.>नेरळ भागात रस्त्याचे रुंदीकरण आणि काँक्रीटीकरण कामे करावीत यासाठी ठेकेदार कंपनीला पत्र देऊन सूचित केले होते. त्याच वेळी वरिष्ठांनाही सूचित केले होते. मात्र, ठेकेदार कंपनीने ऐकले नसल्याने आता लोकांचे बोल आम्हाला ऐकावे लागत आहेत, त्यामुळे कामे अर्धवट ठेवणाºया ठेकेदारावर कारवाईची प्रक्रिया आम्ही सुरू करणार आहोत.- अजयकुमार सर्वगोड, उपअभियंता, बांधकाम विभाग>डांबरीकरण होऊनही रस्ता सपाट झालेला नाही, तर मुख्य खड्डे ज्या भागात आहेत तेथील कामेदेखील सुरू करण्यात आली नाहीत. त्यामुळे आम्हाला रिक्षा चालविणेही कठीण होऊन गेले असून कामे अर्धवट ठेवून लोकांचे हाल करणाºया ठेकेदाराला शासनाने काळ्या यादीत टाकावे.- श्रावण जाधव, अध्यक्ष, जय भवानी रिक्षा संघटना>वाहनचालकांची कसरतरस्त्याचे सव्वातीन कोटींचे काम मिळविणारा ठेकेदार याचा कामचुकारपणा आणि त्यावर गप्प बसणारे सार्वजनिक बांधकाम विभाग यामुळे जनतेचे हाल सुरू आहेत. रस्त्यावर नेरळ रेल्वे गेटपासून साईमंदिर या भागात रस्त्यावर पडलेले खड्डे चुकविताना वाहनचालकांची कसरत सुरू आहे.त्यातच रस्त्याच्या एका बाजूला साचून राहत असलेले पाणी बाहेर पडत नसल्याने ते पाणी रस्त्यावर जाम होत असताना पूर्वीच्या पाइप, मोºया यांना मोकळी वाट करून देण्याची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभाग पार पाडत नाही.त्यामुळे रस्त्यावरील खड्ड्यांच्या समस्येत दररोज वाढ होत असून रस्त्यावरील पाणी, बाजूला असलेले पाणी गटारात वाहून जात नाही. मात्र, त्याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाने कामाचा ठेका घेणाºया सिद्धिविनायक कन्स्ट्रक्शन या कंपनीला नोटिसा बजावल्या आहेत.मात्र, ठेका घेणारे ठेकेदार हे सार्वजनिक बांधकाम विभागाला जुमानत नाहीत, त्यामुळे लोकांना खड्ड्यांतून जावे लागत असून या खड्ड्यांतील पाणी लोकांच्या अंगावर उडत असून मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे या रस्त्यावरील खड्डे लवकरात लवकर भरावे, अशी मागणी केली जात आहे.