शहरं
Join us  
Trending Stories
1
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
2
प्रभू श्रीराम आणि शिव शंकरांवरील खर्गेंचं 'ते' वक्तव्य, पंतप्रधान मोदी म्हणाले अत्यंत 'खतरनाक'; योगीही भडकले
3
India's T20 World Cup Squad Press Conference - शिवम दुबेची निवड का केली? रोहित शर्माने कारण सांगितलं, पण प्लेइंग इलेव्हनबाबत मोठं विधान 
4
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
5
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
6
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
7
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
8
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य
9
Amit Shah : "भारत जोडो यात्रेचा समारोप 4 जूनला काँग्रेस 'ढूंढो' यात्रेने होईल"; अमित शाह यांचा घणाघात
10
ब्रिजभूषण यांचा पत्ता कट; BJP ने त्यांच्या मुलाला दिले तिकीट, रायबरेलीचाही उमेदवार जाहीर
11
रस्त्यावर पाणीच पाणी, वीजपुरवठाही खंडित… मुसळधार पाऊस, वादळी वाऱ्याचा UAEला तडाखा!
12
Champions Trophy 2025 मध्ये भारतीय संघाचे सर्व सामने 'लाहोर'मध्ये; PCB ने ICC ला सोपवला ड्राफ्ट
13
चेन्नईतील श्रीदेवीचं आलिशान घर! जिथे जान्हवीचं गेलं बालपण, आता राहता येणार रेन्टवर
14
“उत्तर मुंबईकरांचा मिळणारा प्रतिसाद महायुतीच्या महाविजयाची नांदी”; पीयूष गोयल यांना विश्वास
15
लॉटरी खेळण्याच्या व्यसनापायी 'त्याने' ऑफिसच्या पैशांवरच मारला डल्ला; असा झाला पर्दाफाश
16
मोबाईलचोरामागे पोलीस धावला... टोळीने घेरलं... पाठीत इंजेक्शन टोचलं... उपचारादरम्यान मृत्यू
17
“शिवसेना-मनसेचा डीएनए एकच, विरोधकांकडे मुद्दे नाहीत म्हणून केवळ टीका सुरु”: श्रीकांत शिंदे
18
शरद पवार करतात ती स्ट्रॅटेजी आम्ही केली की गद्दारी? फोडाफोडीवरून अजित पवारांचा सवाल
19
Sunita Kejriwal : "...तर काय 10 वर्षे जेलमध्ये ठेवणार का?, ही हुकूमशाही"; सुनीता केजरीवाल यांचा संतप्त सवाल
20
जोरदार शक्तिप्रदर्शन, श्रीकांत शिंदेंचा उमेदवारी अर्ज दाखल; महायुतीच्या विकास रथावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री

नेरूळ-उरण रेल्वे, प्रवासी-कंटेनर वाहतुकीस उपयुक्त ठरणारा जासई उड्डाणपूल कार्यान्वित होणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2022 6:34 PM

वाहतूक कोंडीची समस्या दूर होण्यास मदत होणार

मधुकर ठाकूर, उरण: भू-संपादनासाठी प्रकल्पग्रस्तांचा विरोध, कोरोना महामारी आणि इतर काही समस्यांमुळे मागील चार वर्षांपासून कासवगतीने सुरू असलेला रेल्वे, प्रवासी आणि  वाहतूकीसाठी अत्यंत उपयुक्त ठरणारा जासई उड्डाण पुलाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे.१.२ किमी लांबीचा उड्डाणपूल मार्च अखेर वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार असल्याने या मार्गावरील वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटण्यास मदत होणार असल्याची माहिती राष्ट्रीय रस्ते प्राधिकरण विभागाचे मुख्य अभियंता यशवंत घोटकर यांनी दिली.

जेएनपीटी -मुंबई रोड कंपनी व राष्ट्रीय रस्ते प्राधिकरण विभागाच्या माध्यमातून जेएनपीए -आम्रमार्ग या मार्गावर चार टप्प्यापैकी तिसऱ्या टप्प्यातील जासई उड्डाण पुल उभारण्याच्या कामाला सुरुवात केली आहे.१.२ मीटर लांब व २६ मीटर रुंदीचा उड्डाणपूल ५२ पिल्लवर उभारण्यात येत आहे.उड्डाणपुलाच्या कामाला २०१९ साली सुरुवात करण्यात आली होती.मात्र उड्डाणपूलाच्या उभारण्यासाठी शेतकऱ्यांच्या जागा  भू-संपादन करण्यासाठी प्रकल्पग्रस्तांचा झालेला विरोध, कोरोना महामारीमुळे कामात आलेले विविध अडथळे आणि इतर समस्यांमुळे मागील चार वर्षांपासून जासई उड्डाण पुलाचे काम अडखळत कासवगतीने सुरू होते.मात्र यातील अनेक अडथळे दूर झाल्यानंतर जासई उड्डाण पुलाच्या कामाने वेग घेतला आहे.वेगाने प्रगतीपथावर असलेल्या उड्डाणपुलाचे काम आणखी कोणत्याही समस्या उद्भभवल्या नाहीत तर येत्या मार्च २०२३ अखेरपर्यंत पुर्णत्वास जाऊन वाहतूकीसाठी खुला करण्यात येणार असल्याचा ठाम विश्वास राष्ट्रीय रस्ते प्राधिकरण विभागाचे मुख्य अभियंता यशवंत घोटकर यांनी व्यक्त केला आहे.

उरण- नेरूळ रेल्वे मार्गावरील व उरण- पनवेल- नवी मुंबई यांना जोडणारा जासई उड्डाण पुल महत्वाचा दुवा आहे.याच उड्डाणपूलाच्या खालुन उरण- नेरूळ रेल्वे धावणार आहे. या मार्गावर दररोज मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत आहे. मात्र मार्च २०२३ अखेरीस जासई उड्डाण पुल कार्यान्वित झाल्यानंतर  उरण, जेएनपीए, नवी मुंबई परिसरातील नागरिक, प्रवासी व वाहतूकदारांना सातत्याने सतावणारी वाहतूक कोंडीची समस्या बहुतांशी दूर होण्यास मदत होईल अशी अपेक्षाही राष्ट्रीय रस्ते प्राधिकरण विभागाचे मुख्य अभियंता यशवंत घोटकर यांनी व्यक्त केली आहे. रायगड, मुंबईतील हजारो मच्छीमारांसाठी वरदान ठरणारा एक हजार मच्छीमार बोटी क्षमतेचे करंजा मच्छीमार बंदर, उरणकरांना मागील ५० वर्षांपासून प्रतिक्षा लागुन असलेला महत्वाकांक्षी २७ किमी लांबीचा  नेरुळ-उरण रेल्वे मार्ग, शिवडी-न्हावा सि-लिंक आणि इतर जासई उड्डाण पुल या महत्त्वाचे प्रकल्प येत्या २०२३ मध्येच कार्यान्वित होणार आहेत. यामुळे उरणकरांना मोठा दिलासा मिळणार असल्याचे सांगितले जात आहे.

टॅग्स :uran-acउरणRaigadरायगड