शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

नेरळ ग्रामपंचायतीचे ५६ लाखांचे वीजबिल थकीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2020 23:20 IST

वीजजोडणी तोडणार; गतवर्षापासूनचे बिल थकीत; पाणीपुरवठाही होणार बंद

- कांता हाबळेनेरळ : जिल्ह्यातील आर्थिकदृष्ट्या सक्षम समजल्या जाणाऱ्या नेरळ ग्रामपंचायतीची महावितरणच्या वीजबिलापोटी तब्बल ५६ लाखांची थकबाकी आहे. त्यामुळे कोणत्याही क्षणी नेरळ ग्रामपंचायतीची वीजजोडणी तोडली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे नेरळ ग्रामपंचायतीला होणारा पाणीपुरवठा आणि गावातील पथदिवे यांची वीज कापली जाण्याची शक्यता आहे.नेरळ ग्रामपंचायतीचे वीजबिल तब्बल ५६ लाखांवर पोहोचले आहे. महिन्याला साधारण सहा लाखांचे वीजबिल नेरळ ग्रामपंचायतीला आकारण्यात येते. त्यात सार्वजनिक वीज ही पथदिवे आणि नळपाणी योजनेसाठी येणारे वीजबिल हे साधारण सहा लाखांवर जाते. फेब्रुवारी २०१९ पासून वीजबिल थकीत आहे. ग्रामपंचायतीचे मागील सदस्य मंडळ आणि डिसेंबर २०१९ मध्ये सत्तेवर आलेले सदस्य मंडळ अशा दोघांच्या कार्यकाळात झालेली वीजबिल थकबाकी आहे. त्यात नवीन सदस्य मंडळांच्या काळातील दोन महिन्यांचे १२ लाखांचे वीजबिल थकीत आहे.थकबाकी भरली जावी, यासाठी महावितरण कंपनीकडून सातत्याने नेरळ ग्रामपंचायतीकडे तगादा लावला जात आहे; परंतु ग्रामपंचायतीकडून कोणतीही हालचाल होताना दिसत नाही. त्यामुळे नेरळ ग्रामपंचायतीची वीजजोडणी तोडण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास नेरळ ग्रामपंचायतीची पाणीपुरवठा योजना बंद होऊ शकते, त्याच वेळी पथदिव्यांना होणारा वीजपुरवठा खंडित झाल्यास रस्तेही अंधारात जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. परिणामी, जिल्ह्यात आर्थिकदृष्ट्या सक्षम म्हणून ओळख असलेल्या नेरळ ग्रामपंचायतीतील नागरिकांवर वीज, पाणी आदी मूलभूत गरजांपासून वंचित राहण्याची वेळ येण्याची शक्यता आहे. नेरळ ग्रामपंचायतीचे सरपंच रावजी शिंगवा यांच्याशी या संदर्भात संपर्क साधला असता त्यांनी कोणत्याही प्रकारे प्रतिसाद दिला नाही.फेब्रुवारीपासून २०१९ पासून नेरळ ग्रामपंचायतीची वीजबिले थकीत आहेत. महावितरणने या प्रकरणी अनेकदा नोटिसा बजावल्या आहेत. मात्र, त्याकडे दुर्लक्ष केल्याने महावितरण ग्रामपंचायतीचा वीजपुरवठा खंडित करण्याच्या विचारात आहे.