शहरं
Join us  
Trending Stories
1
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
2
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
3
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
4
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
5
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
6
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
7
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!
8
India’s Squad vs SA Test : पंत इज बॅक! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीसाठी कुणाला मिळाली संधी?
9
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
10
IND A vs SA A : रोहित-विराट दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 'या' वनडे मालिकेपासून दूरच
11
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
12
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
13
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
14
UP: बेकायदेशीर औषधाविरुद्ध योगी सरकारची कडक कारवाई; ४ दिवसांत १६ गुन्हे दाखल, २५ दुकानांवर बंदी!
15
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!
16
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाखमोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
17
मोदी सरकारचा मोठा निर्णय; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानात गेले 2100 भारतीय, कारण काय?
18
भाजी विक्रेत्याने जिंकली तब्बल ११ कोटींची लॉटरी; टॅक्स भरून हातात किती पैसे येणार?
19
चेज मास्टर विराट कोहलीचे व्यवसायिक साम्राज्य माहितीये का? क्रिकेटपेक्षा इथून करतो सर्वाधिक कमाई
20
गुगल क्रोम वापरणाऱ्यांना मोठा धोका; हॅकर्सचं लक्ष तुमच्यावरच! सुरक्षित राहण्यासाठी 'ही' गोष्ट आताच करा

नेरळ धरण झाले गाळमुक्त, शेकडो ट्रक माती,दगड काढले बाहेर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2019 01:41 IST

ब्रिटिशकालीन बांधकाम : शेकडो ट्रक माती,दगड काढले बाहेर

नेरळ : नेरळ ग्रामपंचायतीमध्ये असलेल्या ब्रिटिशकालीन धरणातून तब्बल दहा वर्षांनंतर गाळ काढण्यात येत आहे. आतापर्यंत किमान ९०० ट्रक मातीचा गाळ बाहेर काढण्यात आला. मोठ्या प्रमाणात दगड देखील बाहेर काढले असून धरणातील पाणीसाठा वाढण्यास मदत होणार आहे, तर दुसरीकडे धरणातील गाळ काढताना त्या परिसरात तब्बल दोन ठिकाणी उद्यान विकसित करण्यास जागा उपलब्ध झाली आहे.

नेरळ ग्रामपंचायतीच्या मालकीचे असलेले ब्रिटिशकालीन धरण हे गेल्या काही वर्षात स्वच्छ केले नसल्याने मातीने भरले होते. या वर्षी अनेक स्थानिकांनी मागणी केल्यानंतर नेरळ ग्रामपंचायतीने निधीची तरतूद करून मे महिन्यात धरणातील शिल्लक असलेले पाणी सोडून दिले होते. त्यानंतर गेली १५ दिवस धरणातील गाळ काढण्याचे काम नेरळ ग्रामपंचायतीकडून सुरू आहे. धरणात माथेरान डोंगरातून वाहून येणारे पाणी मोठ्या प्रमाणात येत असल्याने दरवर्षी पाण्याबरोबर दगड आणि माती वाहून येत असते. त्यामुळे धरणातील किमान तीन एकरचा परिसर दगड आणि मातीने व्यापला होता. त्यामुळे धरणाचा जलाशय उरलेल्या ठिकाणी माती आणि दगड काढून काही फायदा नाही तर धरणातील पाणीसाठा वाढावा असा प्रयत्न उपसरपंच अंकुश शेळके यांनी सुरू केला. आधी पाणी सोडून दिल्यानंतर धरणाच्या तिन्ही बाजूला जेसीबी मशिनच्या साह्याने जलसाठा वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू केले आणि आज त्या ठिकाणी मोहचीवाडी बाजूला एक मोठे मैदान निर्माण झाले आहे. तर धरणातील पाणी सोडल्यानंतर ज्याला हवी आहे त्याला गाळयुक्त माती नेण्याचे धोरण सरपंच जान्हवी साळुंखे यांनी जाहीर केल्याने अनेकांनी आपल्या शेतीसाठी खत होऊ शकेल अशी माती नेण्यास भर दिला. त्यामुळे धरणाच्या मुख्य जलाशयातील माती अधिक लवकर काढली गेली. तब्बल दोन पायऱ्या म्हणजे किमान १५ फूट जे मातीत अनेक वर्षे गाडून गेले होते,ते पुन्हा बाहेर येण्यात उपयोग झाला आहे. धरणातील पाणीसाठा वाढावा हा हेतू ग्रामपंचायतीने ठेवलेला नाही तर ब्रिटिशकालीन धरण अधिक मजबूत करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. त्या ठिकाणी असलेला बंधाºयाला असलेली गळती रोखण्यासाठी बांधकाम केले जात आहेत. तत्कालीन सरपंच भगवान चंचे यांनी त्या भागात निर्माण केलेले पर्यटन केंद्र यांची डागडुजी देखील नेरळ ग्रामपंचायत सध्या करीत आहे. तर धरणाच्या खाली नव्याने मातीचा भराव करून त्या ठिकाणी एक बगिचा या पावसाळ्यात फुलविला जाणार आहे, अशी माहिती सरपंच जान्हवी साळुंखे यांनी दिली. 

टॅग्स :RaigadरायगडWaterपाणी