शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

नेरळ धरण झाले गाळमुक्त, शेकडो ट्रक माती,दगड काढले बाहेर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2019 01:41 IST

ब्रिटिशकालीन बांधकाम : शेकडो ट्रक माती,दगड काढले बाहेर

नेरळ : नेरळ ग्रामपंचायतीमध्ये असलेल्या ब्रिटिशकालीन धरणातून तब्बल दहा वर्षांनंतर गाळ काढण्यात येत आहे. आतापर्यंत किमान ९०० ट्रक मातीचा गाळ बाहेर काढण्यात आला. मोठ्या प्रमाणात दगड देखील बाहेर काढले असून धरणातील पाणीसाठा वाढण्यास मदत होणार आहे, तर दुसरीकडे धरणातील गाळ काढताना त्या परिसरात तब्बल दोन ठिकाणी उद्यान विकसित करण्यास जागा उपलब्ध झाली आहे.

नेरळ ग्रामपंचायतीच्या मालकीचे असलेले ब्रिटिशकालीन धरण हे गेल्या काही वर्षात स्वच्छ केले नसल्याने मातीने भरले होते. या वर्षी अनेक स्थानिकांनी मागणी केल्यानंतर नेरळ ग्रामपंचायतीने निधीची तरतूद करून मे महिन्यात धरणातील शिल्लक असलेले पाणी सोडून दिले होते. त्यानंतर गेली १५ दिवस धरणातील गाळ काढण्याचे काम नेरळ ग्रामपंचायतीकडून सुरू आहे. धरणात माथेरान डोंगरातून वाहून येणारे पाणी मोठ्या प्रमाणात येत असल्याने दरवर्षी पाण्याबरोबर दगड आणि माती वाहून येत असते. त्यामुळे धरणातील किमान तीन एकरचा परिसर दगड आणि मातीने व्यापला होता. त्यामुळे धरणाचा जलाशय उरलेल्या ठिकाणी माती आणि दगड काढून काही फायदा नाही तर धरणातील पाणीसाठा वाढावा असा प्रयत्न उपसरपंच अंकुश शेळके यांनी सुरू केला. आधी पाणी सोडून दिल्यानंतर धरणाच्या तिन्ही बाजूला जेसीबी मशिनच्या साह्याने जलसाठा वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू केले आणि आज त्या ठिकाणी मोहचीवाडी बाजूला एक मोठे मैदान निर्माण झाले आहे. तर धरणातील पाणी सोडल्यानंतर ज्याला हवी आहे त्याला गाळयुक्त माती नेण्याचे धोरण सरपंच जान्हवी साळुंखे यांनी जाहीर केल्याने अनेकांनी आपल्या शेतीसाठी खत होऊ शकेल अशी माती नेण्यास भर दिला. त्यामुळे धरणाच्या मुख्य जलाशयातील माती अधिक लवकर काढली गेली. तब्बल दोन पायऱ्या म्हणजे किमान १५ फूट जे मातीत अनेक वर्षे गाडून गेले होते,ते पुन्हा बाहेर येण्यात उपयोग झाला आहे. धरणातील पाणीसाठा वाढावा हा हेतू ग्रामपंचायतीने ठेवलेला नाही तर ब्रिटिशकालीन धरण अधिक मजबूत करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. त्या ठिकाणी असलेला बंधाºयाला असलेली गळती रोखण्यासाठी बांधकाम केले जात आहेत. तत्कालीन सरपंच भगवान चंचे यांनी त्या भागात निर्माण केलेले पर्यटन केंद्र यांची डागडुजी देखील नेरळ ग्रामपंचायत सध्या करीत आहे. तर धरणाच्या खाली नव्याने मातीचा भराव करून त्या ठिकाणी एक बगिचा या पावसाळ्यात फुलविला जाणार आहे, अशी माहिती सरपंच जान्हवी साळुंखे यांनी दिली. 

टॅग्स :RaigadरायगडWaterपाणी