शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींना मिळाला त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी सन्मान; म्हणाले, "आपल्या नात्यात क्रिकेटचा रोमांच अन्..."
2
ENG vs IND 2nd Test Day 3 : 'त्या' दोघांनी दमवलं; तिसऱ्या दिवसाअखेर टीम इंडियानं १ विकेटही गमावली, पण...
3
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
4
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा
5
छोट्याखानी खेळीसह यशस्वी जैस्वालचा मोठा धमाका! द्रविड,सेहवाग अन् गंभीरच्या विक्रमाशी बरोबरी
6
कोंढवा बलात्कार प्रकरणात मोठा ट्विस्ट; ‘तो’ कुरिअर बॉय नसून तरुणीचा मित्र, अनेक धक्कादायक बाबी समोर
7
DSP सिराजचा 'सिक्सर' अन् आकाश दीपचा 'चौकार'! इंग्लंडचा संघ ४०७ धावांवर All Out
8
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
9
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
10
"देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र
11
देशाच्या आरोग्याचे बजेट ३७ हजार कोटींवरून १ लाख कोटींवर नेण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले - अमित शाह
12
“नोंदणीचा ‘एक टक्का’ निधी थेट स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्याचा विचार”: चंद्रशेखर बावनकुळे
13
'पंत तूने क्या किया!' कॅच नव्हे त्यानं टीम इंडियाला टेन्शन फ्री करण्याची संधी सोडली
14
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
15
नीचभंग दशांक योग: ८ राशींना पद-पैसा-लाभ, ४ ग्रहांची साथ; विठ्ठलाचे वरदान, शुभ-कल्याणच होईल!
16
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
17
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस
18
स्लिपमध्ये कॅच घेताना अंदाज चुकला! ब्रूकनं मारलेला चेंडू थेट शुबमन गिलच्या डोक्याला लागला (VIDEO)
19
सोमनाथ सूर्यवंशी कोठडीतील मृत्यू प्रकरण; पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश
20
'देशांतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करू नका', भारताने दलाई लामांना पाठिंबा दिल्याने चीन संतापला

रायगडमध्ये मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलची गरज

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2019 05:37 IST

रायगड जिल्ह्यामध्ये मोठ्या संख्येने कारखाने उभे राहिले आहेत. त्यामध्ये केमिकल कंपन्यांचाही अधिक भरणा आहे.

आविष्कार देसाई अलिबाग : रायगड जिल्ह्यामध्ये मोठ्या संख्येने कारखाने उभे राहिले आहेत. त्यामध्ये केमिकल कंपन्यांचाही अधिक भरणा आहे. येथील औद्योगिक वसाहतींमध्ये अधून-मधून स्फोट होऊन त्यामध्ये आतापर्यंत शेकडो निष्पाप कामगारांना आपला प्राण गमवावा लागला आहे. सातत्याने असे अपघात होत असल्याने जखमींवर उपचार करण्यासाठी जिल्ह्यामध्ये मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल उपलब्ध नाही. त्यामुळे मुंबईमध्ये उपचारासाठी जाण्यावाचून कोणताच पर्याय नसल्याने लवकरच अशी सुविधा उपलब्ध करावी, अशी मागणी जोर धरत आहे.माणगाव तालुक्यातील क्रिप्टझो कंपनीमध्ये शुक्रवारी झालेल्या भीषण स्फोटामध्ये १८ कामगार जखमी झाले आहेत. त्यांच्यावर माणगाव येथील उपजिल्हा रुग्णालयामध्ये उपचार सुरु करण्यात आले होते. त्यापैकी आठ जणांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना एमजीएम आणि जेजे रुग्णालयात अधिक उपचारासाठी पाठवण्यात आले आहे. माणगाव ते नवीमुंबई असा प्रवास या गंभीर रुग्णांना करावा लागला आहे.जिल्ह्यातीलरस्त्यांची आधीच दैना उडाली आहे. त्यामुळे त्याचा प्रवास किती वेदनादायक असेल याचा विचारच न केलेला बरा.जिल्ह्यामध्ये जिल्हा सरकारी रुग्णालय आहे. मात्र, त्यामध्ये पुरेशा सोयी-सुविधांचा अभाव आहे. तसेच डॉक्टरांचीही कमतरता असल्याने या ठिकाणी उपचार घेता येत नाहीत. जिल्ह्यामध्ये मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल उभारावे, अशी बऱ्याच वर्षांपासूनची मागणी आहे. मात्र, त्याकडे प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि सरकार सोयीस्करपणे दुर्लक्ष करत असल्याने रायगडकरांची ही मागणी अद्याप पूर्ण होऊ शकलेली नाही. महाड येथे ट्रामा केअर सेंटर उभारण्यात आलेले आहे. मात्र, तेथेही पुरेसे तज्ज्ञ, मनुष्यबळ आणि सुविधांअभावी ते बंद पडलेले आहे. रोहा, माणगाव आणि महाड विभागामध्ये कंपन्याचे जाळेपसरलेले असल्याने कंपन्यांमध्ये अपघात होतच असतात. तसेच महामार्गावर होणाºया जखमींवर तातडीने उपचार मिळावेत, त्यासाठी महाड तालुक्यामध्ये ट्रामा केअर सेंटर उभारण्यात आले होते. तेही बंद असल्याने शुक्रवारी झालेल्या स्फोटामध्ये जखमी झालेल्यांना मुंबई आणि नवी मुंबईला अधिक उपचारासाठी हलवण्याची वेळ आली आहे.जिल्ह्यामध्ये कंपन्या मोठ्या प्रमाणात असल्याने त्यांच्या सीएसआर फंडातून सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल का उभारले जात नाही, असाही प्रश्न आहे. कारण येथीलच जमिनी घेऊन कंपन्या उभारण्यात आल्या आहेत. कंपन्यांचे उत्तरदायित्व म्हणून जिल्हाधिकारी यांनी यामध्ये पुढाकार घेऊन, असे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल उभारण्यासाठी पुढाकार घेणे गरजेचे आहे.>अचानक झाला स्फोटमाणगावमध्ये असलेली क्रिप्टझो ही कंपनी आग विझवण्यासाठी आवश्यक असलेली उपकरणे तयार करते. ती गॅसच्या साहाय्याने तयार केली जातात. शुक्रवारी दुपारी सुमारे ४.३० वाजता या कंपनीमध्ये या सिस्टीमचा डेमो करीत असताना अचानक स्फोट झाला, आग वाढून ती डेमो केलेल्या खोलीच्या बाहेर आली आणि बाहेर उभे असलेले कामगार भाजले गेले.>मांडवा ते मुंबई मार्गावर बोट रूग्णवाहिका सुरू करणारमाणगावमधील कंपनीमध्ये झालेला अपघात भीषण आहे. त्यातील जखमींना अधिक उपचारासाठी मुंबई, नवी मुंबई येथे हलवावे लागत आहे. वास्तविकपणे जिल्ह्यामध्ये सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल होणे गरजेचे आहे. नागोठणे येथे जागेची पाहणी करण्यात आली आहे. मात्र, त्याला पाहिजे तशी गती मिळालेली नाही, असे जिल्हाधिकारी विजय सूर्यवंशी यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. रस्त्यावरील प्रवास खडतर आणि अधिक वेळ घेणारा असल्याने मांडवा ते मुंबई या मार्गावर बोट रुग्णवाहिका सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी पाच कोटी रुपयांचा खर्च आहे. कंपन्यांच्या सीएसआर फंडातून तो उभारण्यावर भर देण्यात येत आहे. त्याचप्रमाणे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलसाठी सरकारकडील निधी आणि कंपन्यांच्या सीएसआर फंडातून निधी उपलब्ध करण्याबाबतची चांगली सूचना आहे. लवकरच याबाबत कंपन्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेऊन यावर तोडगा काढण्यात येईल, असेही सूर्यवंशी यांनी स्पष्ट केले.>एकूण १८ कामगार जखमी आहेत, आठ जण गंभीररीत्या भाजले आहेत. त्यांना मुंबई आणिनवी मुंबई येथील रुग्णालयात अधिक उपचारासाठी पाठवण्यात आले आहे, तर उर्वरित जखमींवर माणगाव रुग्णालयात उपचार सुरू आहेत.- अनिल पारस्कर,जिल्हा पोलीस अधीक्षकरायगड जिल्ह्यातील एमआयडीसीमध्ये स्वतंत्र कार्यालय नाही, तसेच प्रदूषण महामंडळाचे कार्यालयही नाही. तसेच आग विझविण्यासाठी सुरक्षेच्या दृष्टीने अग्निशमन यंत्रणा नाही, साधे प्राथमिक आरोग्य केंद्रही प्राथमिक उपचारासाठी येथे नाही. आजची ही घटना घडली तेव्हा येथून जवळच असणाºया उपजिल्हा रुग्णालयातही रुग्णवाहिका उपलब्ध नाही. येथील मशनरीही बंद अवस्थेत आहेत.- जनार्दन मानकर, सामाजिक कार्यकर्ते, निजामपूर