शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain Alert: रेड अलर्ट! महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा
2
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
3
आमदार, खासदार विकत घ्यायला पैसे आहेत पूल बांधायला नाही? मावळ दुर्घटनेवरुन राऊतांचा सवाल
4
Post Office च्या 'या' स्कीममध्ये हवी तितकी खाती उघडू शकता, हमी परताव्यासह मिळेल Tax मध्येही सूट
5
इंग्लंडविरूद्धच्या टेस्टसाठी शार्दुल ठाकूरला 'प्लेइंग ११'मध्ये संधीची शक्यता, 'या' खेळाडूला डच्चू?
6
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
7
Israel-Iran War : भारताला अडकवण्याचा प्रयत्न करणारा चीनच स्वत:च अडकला, इस्रायलच्या इराणवरील हल्ल्यानं ड्रॅगनलाही फटका
8
"आई कुठे काय करते मला सोडायची नव्हती पण...", संजनाची भूमिका साकारलेल्या दिपाली पानसरेने सांगितलं नेमकं कारण
9
"मंत्रालयातून उडी मारावी लागेल अशी वेळ.."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याची बिकट अवस्था, म्हणाला- "वय झाल्यामुळे.."
10
तुमचा पैसा तयार ठेवा! 'या' आठवड्यात ६ नवे IPO बाजारात, बंपर कमाईची संधी?
11
Navi Mumbai Suicide: १२ हजार रुपयांत संपूर्ण कुटुंबाचा खर्च चालवायचा कसा? तरुणीने संपवले जीवन
12
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
13
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
14
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
15
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
16
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
17
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
18
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
19
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
20
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण

नवगाव ग्रामस्थांचा निवडणुकीवर बहिष्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2019 00:37 IST

एकीकडे निवडणुकीच्या प्रचाराला चांगलीच रंगत आली आहे,

अलिबाग : एकीकडे निवडणुकीच्या प्रचाराला चांगलीच रंगत आली आहे, तर दुसरीकडे अलिबाग तालुक्यातील साडेचार हजार लोकसंख्या असलेल्या नवेदर-नवगाव ग्रामपंचायतीमधील ग्रामस्थांनी लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकला आहे. २३ एप्रिल रोजी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत मतदान करणार नसल्याबाबतचे निवेदन त्यांनी जिल्हा प्रशासनाला दिले आहे. याआधी नागरिकांनी सलग दोन वेळा ग्रामपंचायतीमध्ये मतदान केलेले नाही. सध्या ग्रामपंचायतीवर गेली नऊ वर्षे प्रशासकामार्फतच कारभार केला जात आहे. कोळी समाजाच्या या निर्णयाचा फटका निवडणुकीत उभ्या असलेल्या उमेदवारांना बसणारआहे.नवेदर-नवगाव ग्रामपंचायतीमध्ये कोळी समाज मोठ्या संख्येने आहे. २००७ साली झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये ११ पैकी आठ सदस्य कोळी समाजाचे निवडून आले होते; परंतु निवडून आलेल्या उमेदवारांकडे अनुसूचित जमातीचे दाखले नाहीत. त्यामुळे त्यांचे सदस्यत्व रद्द झाले होते. त्यानंतर २०१२ आणि २०१७ साली झालेल्या निवडणुकीवर ग्रामस्थांनीच बहिष्कार टाकला होता. त्यानंतर १ जानेवारी २०१२ रोजी अलिबाग तहसीलदार यांनी ग्रामस्थांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला होता. ग्रामपंचायतीमध्ये हिंदू महादेव कोळी या जातीच्या समुदायाची संख्या अधिक आहे. त्या अनुषंगाने अनुसूचित जातीचे आरक्षण ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी आहे. हिंदू महादेव कोळी या जातीच्या दाखल्यांना जात समितीकडून वैधता प्रमाणपत्र दिले जात नाही. १९५० पूर्वीच्या कुटुंबातील व्यक्ती हयात नाहीत ज्या हयाच आहेत. त्या अशिक्षित असल्यामुळे ५० वर्षांपूर्वीचे पुरावे त्यांना सादर करता येत नाहीत, असे ग्रामस्थ फिडी कटोर यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.कोळी समाजाला सरकारकडून ठोस निर्णय मिळणार नाही तोपर्यंत पुढील सर्व लोकसभा, विधानसभा, जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायतींच्या निवडणुकीवर कायम बहिष्कार राहणार आहे. या निर्णयाचा फटका शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांना बसणार आहे.दरम्यान, या आधी म्हसळा तालुक्यातील वाघाव बौद्धजन हितवर्धक मंडळाने निवडणुकीवर बहिष्कार टाकला आहे.>जातीचे दाखले ग्राह्य धरण्याची मागणीहिंदू महादेव कोळी समाज येथे मोठ्या संख्येने असल्याने अनुसूचित जमातीचे आरक्षण काढण्यात येते; परंतु कोळी समाजापुढे जातीच्या दाखल्यांबाबत मोठी समस्या आहे. सर्वच लाकेप्रतिनिधी आणि प्रशासन केवळ आश्वासनच देत आहे, असेही कटोर यांनी स्पष्ट केले. कोळी समाजाला जात वैधता प्रमाणपत्र दिल्यास सर्वच समस्या सुटणार आहेत. त्याचप्रमाणे गावाचा विकासही होण्यास मदत मिळणार असल्याकडे ग्रामस्थ धनंजय कोळी यांनी लक्ष वेधले.कोळी समाजाकडे असलेले जातीचे दाखले, पुरावे ग्राह्य धरून जात पडताळणी समितीकडून जात वैधता प्रमाणपत्र आणि सरकारने आम्हाला जातीचे प्रमाणपत्र द्यावीत, अशी मागणी केली.

टॅग्स :Maharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019raigad-pcरायगड