शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
5
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
6
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
7
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
8
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
9
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
10
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
11
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
12
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
13
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
14
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
15
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
16
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
17
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
18
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
19
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
20
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य

नवगाव ग्रामस्थांचा निवडणुकीवर बहिष्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2019 00:37 IST

एकीकडे निवडणुकीच्या प्रचाराला चांगलीच रंगत आली आहे,

अलिबाग : एकीकडे निवडणुकीच्या प्रचाराला चांगलीच रंगत आली आहे, तर दुसरीकडे अलिबाग तालुक्यातील साडेचार हजार लोकसंख्या असलेल्या नवेदर-नवगाव ग्रामपंचायतीमधील ग्रामस्थांनी लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकला आहे. २३ एप्रिल रोजी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत मतदान करणार नसल्याबाबतचे निवेदन त्यांनी जिल्हा प्रशासनाला दिले आहे. याआधी नागरिकांनी सलग दोन वेळा ग्रामपंचायतीमध्ये मतदान केलेले नाही. सध्या ग्रामपंचायतीवर गेली नऊ वर्षे प्रशासकामार्फतच कारभार केला जात आहे. कोळी समाजाच्या या निर्णयाचा फटका निवडणुकीत उभ्या असलेल्या उमेदवारांना बसणारआहे.नवेदर-नवगाव ग्रामपंचायतीमध्ये कोळी समाज मोठ्या संख्येने आहे. २००७ साली झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये ११ पैकी आठ सदस्य कोळी समाजाचे निवडून आले होते; परंतु निवडून आलेल्या उमेदवारांकडे अनुसूचित जमातीचे दाखले नाहीत. त्यामुळे त्यांचे सदस्यत्व रद्द झाले होते. त्यानंतर २०१२ आणि २०१७ साली झालेल्या निवडणुकीवर ग्रामस्थांनीच बहिष्कार टाकला होता. त्यानंतर १ जानेवारी २०१२ रोजी अलिबाग तहसीलदार यांनी ग्रामस्थांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला होता. ग्रामपंचायतीमध्ये हिंदू महादेव कोळी या जातीच्या समुदायाची संख्या अधिक आहे. त्या अनुषंगाने अनुसूचित जातीचे आरक्षण ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी आहे. हिंदू महादेव कोळी या जातीच्या दाखल्यांना जात समितीकडून वैधता प्रमाणपत्र दिले जात नाही. १९५० पूर्वीच्या कुटुंबातील व्यक्ती हयात नाहीत ज्या हयाच आहेत. त्या अशिक्षित असल्यामुळे ५० वर्षांपूर्वीचे पुरावे त्यांना सादर करता येत नाहीत, असे ग्रामस्थ फिडी कटोर यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.कोळी समाजाला सरकारकडून ठोस निर्णय मिळणार नाही तोपर्यंत पुढील सर्व लोकसभा, विधानसभा, जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायतींच्या निवडणुकीवर कायम बहिष्कार राहणार आहे. या निर्णयाचा फटका शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांना बसणार आहे.दरम्यान, या आधी म्हसळा तालुक्यातील वाघाव बौद्धजन हितवर्धक मंडळाने निवडणुकीवर बहिष्कार टाकला आहे.>जातीचे दाखले ग्राह्य धरण्याची मागणीहिंदू महादेव कोळी समाज येथे मोठ्या संख्येने असल्याने अनुसूचित जमातीचे आरक्षण काढण्यात येते; परंतु कोळी समाजापुढे जातीच्या दाखल्यांबाबत मोठी समस्या आहे. सर्वच लाकेप्रतिनिधी आणि प्रशासन केवळ आश्वासनच देत आहे, असेही कटोर यांनी स्पष्ट केले. कोळी समाजाला जात वैधता प्रमाणपत्र दिल्यास सर्वच समस्या सुटणार आहेत. त्याचप्रमाणे गावाचा विकासही होण्यास मदत मिळणार असल्याकडे ग्रामस्थ धनंजय कोळी यांनी लक्ष वेधले.कोळी समाजाकडे असलेले जातीचे दाखले, पुरावे ग्राह्य धरून जात पडताळणी समितीकडून जात वैधता प्रमाणपत्र आणि सरकारने आम्हाला जातीचे प्रमाणपत्र द्यावीत, अशी मागणी केली.

टॅग्स :Maharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019raigad-pcरायगड