शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
3
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
4
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
5
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
6
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
7
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
8
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
9
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
10
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
11
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
12
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
13
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
14
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
15
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
16
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
17
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
18
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
19
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
20
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले

नवगाव ग्रामस्थांचा निवडणुकीवर बहिष्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2019 00:37 IST

एकीकडे निवडणुकीच्या प्रचाराला चांगलीच रंगत आली आहे,

अलिबाग : एकीकडे निवडणुकीच्या प्रचाराला चांगलीच रंगत आली आहे, तर दुसरीकडे अलिबाग तालुक्यातील साडेचार हजार लोकसंख्या असलेल्या नवेदर-नवगाव ग्रामपंचायतीमधील ग्रामस्थांनी लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकला आहे. २३ एप्रिल रोजी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत मतदान करणार नसल्याबाबतचे निवेदन त्यांनी जिल्हा प्रशासनाला दिले आहे. याआधी नागरिकांनी सलग दोन वेळा ग्रामपंचायतीमध्ये मतदान केलेले नाही. सध्या ग्रामपंचायतीवर गेली नऊ वर्षे प्रशासकामार्फतच कारभार केला जात आहे. कोळी समाजाच्या या निर्णयाचा फटका निवडणुकीत उभ्या असलेल्या उमेदवारांना बसणारआहे.नवेदर-नवगाव ग्रामपंचायतीमध्ये कोळी समाज मोठ्या संख्येने आहे. २००७ साली झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये ११ पैकी आठ सदस्य कोळी समाजाचे निवडून आले होते; परंतु निवडून आलेल्या उमेदवारांकडे अनुसूचित जमातीचे दाखले नाहीत. त्यामुळे त्यांचे सदस्यत्व रद्द झाले होते. त्यानंतर २०१२ आणि २०१७ साली झालेल्या निवडणुकीवर ग्रामस्थांनीच बहिष्कार टाकला होता. त्यानंतर १ जानेवारी २०१२ रोजी अलिबाग तहसीलदार यांनी ग्रामस्थांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला होता. ग्रामपंचायतीमध्ये हिंदू महादेव कोळी या जातीच्या समुदायाची संख्या अधिक आहे. त्या अनुषंगाने अनुसूचित जातीचे आरक्षण ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी आहे. हिंदू महादेव कोळी या जातीच्या दाखल्यांना जात समितीकडून वैधता प्रमाणपत्र दिले जात नाही. १९५० पूर्वीच्या कुटुंबातील व्यक्ती हयात नाहीत ज्या हयाच आहेत. त्या अशिक्षित असल्यामुळे ५० वर्षांपूर्वीचे पुरावे त्यांना सादर करता येत नाहीत, असे ग्रामस्थ फिडी कटोर यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.कोळी समाजाला सरकारकडून ठोस निर्णय मिळणार नाही तोपर्यंत पुढील सर्व लोकसभा, विधानसभा, जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायतींच्या निवडणुकीवर कायम बहिष्कार राहणार आहे. या निर्णयाचा फटका शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांना बसणार आहे.दरम्यान, या आधी म्हसळा तालुक्यातील वाघाव बौद्धजन हितवर्धक मंडळाने निवडणुकीवर बहिष्कार टाकला आहे.>जातीचे दाखले ग्राह्य धरण्याची मागणीहिंदू महादेव कोळी समाज येथे मोठ्या संख्येने असल्याने अनुसूचित जमातीचे आरक्षण काढण्यात येते; परंतु कोळी समाजापुढे जातीच्या दाखल्यांबाबत मोठी समस्या आहे. सर्वच लाकेप्रतिनिधी आणि प्रशासन केवळ आश्वासनच देत आहे, असेही कटोर यांनी स्पष्ट केले. कोळी समाजाला जात वैधता प्रमाणपत्र दिल्यास सर्वच समस्या सुटणार आहेत. त्याचप्रमाणे गावाचा विकासही होण्यास मदत मिळणार असल्याकडे ग्रामस्थ धनंजय कोळी यांनी लक्ष वेधले.कोळी समाजाकडे असलेले जातीचे दाखले, पुरावे ग्राह्य धरून जात पडताळणी समितीकडून जात वैधता प्रमाणपत्र आणि सरकारने आम्हाला जातीचे प्रमाणपत्र द्यावीत, अशी मागणी केली.

टॅग्स :Maharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019raigad-pcरायगड