शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या मुंबईतील बैठकीला भाजप कार्यकर्त्यालाच पाठविले? फोटो समोर आल्याने उडाली खळबळ...
2
पाकिस्तानला मोठा झटका देण्याच्या तयारीत अफगाणिस्तान, करणार तगडा प्रहार; भारतही देणार साथ!
3
दरमहा लाखोंची कमाई; तरीही महिन्याच्या शेवटी खर्चाला पैसे उरत नाही? आर्थिक तज्ञांनी सांगितलं खरं कारण
4
लिव्ह-इन पार्टनरच्या सांगण्यावरून रुग्णालयातून बाळ चोरलं, पण परत येताना रस्ताच विसरली! आणखी एक चूक केली अन्...
5
"रोहित आर्यने जो मार्ग स्वीकारला तो चुकीचा, पण..." काँग्रेसचे उपस्थित केले गंभीर प्रश्न
6
"मी मालिकेत येईन पण...", शिल्पा शिंदे 'भाभीजी घर पर है'मध्ये कमबॅक करणार? दिली प्रतिक्रिया
7
Mumbai Local Train Update: वांगणी-शेलू स्थानकादरम्यान मालगाडीच्या इंजिनात बिघाड; CSMT कडे जाणारी लोकलसेवा ठप्प
8
World Cup FINAL: टीम इंडियाला नडू शकते आफ्रिकन कर्णधार लॉरा वोल्वार्ड, जाणून घ्या रेकॉर्ड
9
भयानक! 'तो' वाद टोकाला गेला! बायकोने फेसबुक वापरल्याने नवरा संतापला, थेट जीवच घेतला
10
५ वर्षांसाठी ₹१० लाखांचं कार लोन घेतल्यास कोणत्या बँकेत किती पडेल EMI? पाहा संपूर्ण गणित
11
७-८ नव्हे तर 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' सिनेमा बनवण्यासाठी लागले तब्बल 'इतके' कोटी; महेश मांजरेकर म्हणाले- "बजेट वाढलं कारण..."
12
पृथ्वीच्या 'महाविनाशा'चा धोका टळला? शास्त्रज्ञांचा नवीन अभ्यास समोर आला...
13
सोने महागले! मागणी १६% ने घटली; लोक आता ज्वेलरीपेक्षा 'या' फॉर्ममध्ये करतायेत मोठी गुंतवणूक
14
जेमिमा रॉड्रीग्ज, गौतम गंभीर अन् माखलेली जर्सी... १४ वर्षांपूर्वीचा भारताचा 'विजयी' योगायोग
15
नोव्हेंबरमध्ये जन्मलेल्या व्यक्ती म्हणजे प्रेमाचा सागर, पण पोटात ज्वालामुखी; वाचा गुण दोष!
16
Rakhi Sawant : "मी दोन्ही किडन्या विकल्या, सलमानसाठी सोन्याची अंगठी घेतली"; राखी सावंतचा धक्कादायक दावा
17
सौदी अरेबियाने घेतला मोठा निर्णय! लाखों भारतीय मुस्लिमांवर होणार थेट परिणाम; नेमकं प्रकरण काय?
18
ट्रम्पना ठेंगा! भारतात परत येतेय 'ही' ऑटो कंपनी; ४ वर्षांपूर्वी बंद केलेली फॅक्ट्री परत होणार सुरू
19
वेगाची राणी...! महाराष्ट्राची लेक, डायना पंडोले इतिहास रचणार; फेरारी क्लब चॅलेंजमध्ये भाग घेणारी पहिली भारतीय महिला रेसर
20
Prabodhini Ekadashi 2025: विष्णूंची योगनिद्रा संपताच सलग २१ दिवस करा ही 'प्रभावी उपासना

नांदगावचे भारत संचार निगमचे कार्यालय लॉकडाऊन?, मुरुडमध्ये एकच उपअभियंता

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2020 01:07 IST

पंचक्रोशीतील शेकडो घरगुती दूरध्वनी जोडण्या व भ्रमणध्वनी असलेले भारत संचार निगमचे नांदगाव येथील कार्यालय लॉकडाऊन करण्यात आले आहे.

- गणेश चोडणेकरआगरदांडा : गेली अनेक वर्षे कार्यरत असलेले व यशवंतनगर पंचक्रोशीतील शेकडो घरगुती दूरध्वनी जोडण्या व भ्रमणध्वनी असलेले भारत संचार निगमचे नांदगाव येथील कार्यालय लॉकडाऊन करण्यात आले आहे.दोन-चार वर्षांपूर्वी एक कुशल तंत्रज्ञ, दोन मदतनीस व एक उपअभियंता असे कर्मचारी ५०० ते ६०० घरगुती ग्राहकांना ते योग्य सेवा पुरवीत होते; परंतु कालांतराने बदली व निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांच्या रिक्त झालेल्या जागा भरल्याच नाहीत. उलट कर्मचाऱ्यांना स्वेच्छानिवृत्ती घेण्यास कंपनीने भाग पाडले. त्यामुळे या कार्यालयासाठी कोणी कर्मचारीच उरला नाही.मुरुड शहरात असलेल्या तालुक्याच्या मुख्य केंद्रात केवळ एक उपअभियंताच आहे. त्यामुळे स्थानिक ग्राहकांना तक्रार करायची झाल्यास अलिबाग केंद्रात धाव घ्यावी लागते. कुशल तंत्रज्ञाअभावी येथील छोट्या-मोठ्या दुरुस्त्या अथवा बिघाडासाठी अलिबाग येथून येणाºया तंत्रज्ञावर अवलंबून राहावे लागते.निसर्ग चक्रीवादळात येथील दूरध्वनी, भ्रमणध्वनी व इंटरनेट सेवा पूर्णपणे कोलमडली असून, ही सर्व यंत्रणाच पूर्णपणे बंद पडली आहे. या कारणास्तव बहुतांशी घरगुती दूरध्वनी व शेकडो भ्रमणध्वनीधारकांनी ही सेवा बंद करून अन्य कंपन्यांची सेवा घेतली आहे. त्यामुळे भारत संचार निगमला आपला गाशाच गुंडाळावा लागणार असल्याची चिन्हे दिसत आहेत. सेवा बंद केलेल्या ग्राहकांची सुरुवातीला भरलेली अनामत रक्कम परत करण्याचे साधे सौजन्यही भारत संचार निगमने दाखविलेले नाही. वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर सेवा पूर्ववत सुरू राहावी, म्हणून नांदगाव केंद्रासाठी निगमने एक मोठा किमती जनरेटरही येथे बसविला होता; परंतु तोदेखील आता धूळखात पडला आहे. तर केंद्राच्या दरवाजाला मोठे टाळे लावण्यात आले आहे. मुरुड केंद्राचे उपअभियंता कधीतरी येथे भेट देत असल्याचे सूत्रांकडून समजले.घरगुती दूरध्वनी केवळ रहिवासी दाखल्यासाठीयशवंतनगर पंचक्रोशीतील ग्राहकांनी भारत संचार निगमची ही सेवा व त्याचे देयक हे शासकीय कामी एक रहिवासी दाखला म्हणून उपयोगी पडत असल्याने सुरू ठेवले होते.परंतु सध्या सेवा पुन्हा कधी सुरू होईल हे सांगता येत नसल्याने व आता आधार कार्डची सक्ती असल्याने, सेवेचे देयक कुचकामी ठरल्याने ग्राहकांना ही सेवा बंद करण्यास संधी मिळाली आहे.भारत संचार निगमची ही लॅण्डलाइन सेवा सतत बंद स्थितीतच राहात असल्याने व त्याचे देयक मात्र दर महिन्याला बरोबर येत असल्याने ती बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी एप्रिल महिन्यात मुरुड केंद्राकडे अर्ज केला असता, अलिबागच्या कार्यालयात जाण्याचे सांगण्यात आले आहे.- भानुदास राऊत, ग्राहक, नांदगाव

टॅग्स :BSNLबीएसएनएलRaigadरायगड