शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
6
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
7
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
8
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
9
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
10
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
11
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
12
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
13
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
14
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
15
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
16
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
17
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
18
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
19
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
20
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा

नांदगावचे भारत संचार निगमचे कार्यालय लॉकडाऊन?, मुरुडमध्ये एकच उपअभियंता

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2020 01:07 IST

पंचक्रोशीतील शेकडो घरगुती दूरध्वनी जोडण्या व भ्रमणध्वनी असलेले भारत संचार निगमचे नांदगाव येथील कार्यालय लॉकडाऊन करण्यात आले आहे.

- गणेश चोडणेकरआगरदांडा : गेली अनेक वर्षे कार्यरत असलेले व यशवंतनगर पंचक्रोशीतील शेकडो घरगुती दूरध्वनी जोडण्या व भ्रमणध्वनी असलेले भारत संचार निगमचे नांदगाव येथील कार्यालय लॉकडाऊन करण्यात आले आहे.दोन-चार वर्षांपूर्वी एक कुशल तंत्रज्ञ, दोन मदतनीस व एक उपअभियंता असे कर्मचारी ५०० ते ६०० घरगुती ग्राहकांना ते योग्य सेवा पुरवीत होते; परंतु कालांतराने बदली व निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांच्या रिक्त झालेल्या जागा भरल्याच नाहीत. उलट कर्मचाऱ्यांना स्वेच्छानिवृत्ती घेण्यास कंपनीने भाग पाडले. त्यामुळे या कार्यालयासाठी कोणी कर्मचारीच उरला नाही.मुरुड शहरात असलेल्या तालुक्याच्या मुख्य केंद्रात केवळ एक उपअभियंताच आहे. त्यामुळे स्थानिक ग्राहकांना तक्रार करायची झाल्यास अलिबाग केंद्रात धाव घ्यावी लागते. कुशल तंत्रज्ञाअभावी येथील छोट्या-मोठ्या दुरुस्त्या अथवा बिघाडासाठी अलिबाग येथून येणाºया तंत्रज्ञावर अवलंबून राहावे लागते.निसर्ग चक्रीवादळात येथील दूरध्वनी, भ्रमणध्वनी व इंटरनेट सेवा पूर्णपणे कोलमडली असून, ही सर्व यंत्रणाच पूर्णपणे बंद पडली आहे. या कारणास्तव बहुतांशी घरगुती दूरध्वनी व शेकडो भ्रमणध्वनीधारकांनी ही सेवा बंद करून अन्य कंपन्यांची सेवा घेतली आहे. त्यामुळे भारत संचार निगमला आपला गाशाच गुंडाळावा लागणार असल्याची चिन्हे दिसत आहेत. सेवा बंद केलेल्या ग्राहकांची सुरुवातीला भरलेली अनामत रक्कम परत करण्याचे साधे सौजन्यही भारत संचार निगमने दाखविलेले नाही. वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर सेवा पूर्ववत सुरू राहावी, म्हणून नांदगाव केंद्रासाठी निगमने एक मोठा किमती जनरेटरही येथे बसविला होता; परंतु तोदेखील आता धूळखात पडला आहे. तर केंद्राच्या दरवाजाला मोठे टाळे लावण्यात आले आहे. मुरुड केंद्राचे उपअभियंता कधीतरी येथे भेट देत असल्याचे सूत्रांकडून समजले.घरगुती दूरध्वनी केवळ रहिवासी दाखल्यासाठीयशवंतनगर पंचक्रोशीतील ग्राहकांनी भारत संचार निगमची ही सेवा व त्याचे देयक हे शासकीय कामी एक रहिवासी दाखला म्हणून उपयोगी पडत असल्याने सुरू ठेवले होते.परंतु सध्या सेवा पुन्हा कधी सुरू होईल हे सांगता येत नसल्याने व आता आधार कार्डची सक्ती असल्याने, सेवेचे देयक कुचकामी ठरल्याने ग्राहकांना ही सेवा बंद करण्यास संधी मिळाली आहे.भारत संचार निगमची ही लॅण्डलाइन सेवा सतत बंद स्थितीतच राहात असल्याने व त्याचे देयक मात्र दर महिन्याला बरोबर येत असल्याने ती बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी एप्रिल महिन्यात मुरुड केंद्राकडे अर्ज केला असता, अलिबागच्या कार्यालयात जाण्याचे सांगण्यात आले आहे.- भानुदास राऊत, ग्राहक, नांदगाव

टॅग्स :BSNLबीएसएनएलRaigadरायगड