शहरं
Join us  
Trending Stories
1
विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो समोर आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना 
2
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती
3
Ahmedabad Plane Crash: अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर्सची यादी आली समोर; दोन मराठी नावांचा समावेश
4
अहमदाबाद विमान अपघात : मृतांच्या कुटुंबियांना किती पैसे मिळतील? जाणून घ्या कायदा काय सांगतो!
5
Plane Crash Incident: पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
6
Air India Plane Crash: विमानातून प्रवास करणारे कोण? भारतीय आणि परदेशी नागरिक किती होते?
7
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
8
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?
9
Ahmedabad Plane Crash: विमान दुर्घटनेमुळे सलमान खानने घेतला मोठा निर्णय, म्हणाला-
10
Ahmedabad Plane Crash: ११ वर्षे जुने बोईंग विमान, ७००० किमी प्रवास करणार होते; अपघातग्रस्त विमानाबद्दल सर्व काही जाणून घ्या
11
सेन्सेक्स-निफ्टी आपटले! टाटा ग्रुपला सर्वात मोठा धक्का; 'या' कारणांमुळे बाजार गडगडला
12
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
13
पुढे की मागे...? कुठे असतो विमानाचा इंधन टँक? क्रॅश झाल्यास या ठिकाणी बसलेल्या लोकांना पोहोचू शकतो सर्वाधिक धोका
14
मोठी अपडेट! एअर इंडियाचे विमान डॉक्टरांच्या हॉस्टेलवर कोसळले; पूर्ण इमारत जळून खाक
15
Ahmedabad Plane Crash: गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
16
एअर इंडियाचं विमान कोसळलं! लंडनच्या प्रवासाचं तिकीट किती होतं? आकडा वाचून धक्का बसेल
17
अहमदाबाद विमान अपघात: प्रवाशांची यादी आली, गुजरातचे माजी CM विजय रुपाणी यांचेही नाव
18
Sonam Raghuvanshi : "मी थकले आहे, राजाला मार, नाहीतर मी मरेन..."; बॉयफ्रेंड राजनेच केली सोनमची पोलखोल
19
Aeroplane Black Box : विमान अपघातानंतर सर्वात आधी शोधला जातो 'ब्लॅक बॉक्स'; नेमकं काय असतं याचं काम?
20
Plane Crash: टेकऑफनंतर अवघ्या २ मिनिटांनी Air India चं विमान क्रॅश; नेमका कसा झाला अपघात?

नांदगावचे भारत संचार निगमचे कार्यालय लॉकडाऊन?, मुरुडमध्ये एकच उपअभियंता

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2020 01:07 IST

पंचक्रोशीतील शेकडो घरगुती दूरध्वनी जोडण्या व भ्रमणध्वनी असलेले भारत संचार निगमचे नांदगाव येथील कार्यालय लॉकडाऊन करण्यात आले आहे.

- गणेश चोडणेकरआगरदांडा : गेली अनेक वर्षे कार्यरत असलेले व यशवंतनगर पंचक्रोशीतील शेकडो घरगुती दूरध्वनी जोडण्या व भ्रमणध्वनी असलेले भारत संचार निगमचे नांदगाव येथील कार्यालय लॉकडाऊन करण्यात आले आहे.दोन-चार वर्षांपूर्वी एक कुशल तंत्रज्ञ, दोन मदतनीस व एक उपअभियंता असे कर्मचारी ५०० ते ६०० घरगुती ग्राहकांना ते योग्य सेवा पुरवीत होते; परंतु कालांतराने बदली व निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांच्या रिक्त झालेल्या जागा भरल्याच नाहीत. उलट कर्मचाऱ्यांना स्वेच्छानिवृत्ती घेण्यास कंपनीने भाग पाडले. त्यामुळे या कार्यालयासाठी कोणी कर्मचारीच उरला नाही.मुरुड शहरात असलेल्या तालुक्याच्या मुख्य केंद्रात केवळ एक उपअभियंताच आहे. त्यामुळे स्थानिक ग्राहकांना तक्रार करायची झाल्यास अलिबाग केंद्रात धाव घ्यावी लागते. कुशल तंत्रज्ञाअभावी येथील छोट्या-मोठ्या दुरुस्त्या अथवा बिघाडासाठी अलिबाग येथून येणाºया तंत्रज्ञावर अवलंबून राहावे लागते.निसर्ग चक्रीवादळात येथील दूरध्वनी, भ्रमणध्वनी व इंटरनेट सेवा पूर्णपणे कोलमडली असून, ही सर्व यंत्रणाच पूर्णपणे बंद पडली आहे. या कारणास्तव बहुतांशी घरगुती दूरध्वनी व शेकडो भ्रमणध्वनीधारकांनी ही सेवा बंद करून अन्य कंपन्यांची सेवा घेतली आहे. त्यामुळे भारत संचार निगमला आपला गाशाच गुंडाळावा लागणार असल्याची चिन्हे दिसत आहेत. सेवा बंद केलेल्या ग्राहकांची सुरुवातीला भरलेली अनामत रक्कम परत करण्याचे साधे सौजन्यही भारत संचार निगमने दाखविलेले नाही. वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर सेवा पूर्ववत सुरू राहावी, म्हणून नांदगाव केंद्रासाठी निगमने एक मोठा किमती जनरेटरही येथे बसविला होता; परंतु तोदेखील आता धूळखात पडला आहे. तर केंद्राच्या दरवाजाला मोठे टाळे लावण्यात आले आहे. मुरुड केंद्राचे उपअभियंता कधीतरी येथे भेट देत असल्याचे सूत्रांकडून समजले.घरगुती दूरध्वनी केवळ रहिवासी दाखल्यासाठीयशवंतनगर पंचक्रोशीतील ग्राहकांनी भारत संचार निगमची ही सेवा व त्याचे देयक हे शासकीय कामी एक रहिवासी दाखला म्हणून उपयोगी पडत असल्याने सुरू ठेवले होते.परंतु सध्या सेवा पुन्हा कधी सुरू होईल हे सांगता येत नसल्याने व आता आधार कार्डची सक्ती असल्याने, सेवेचे देयक कुचकामी ठरल्याने ग्राहकांना ही सेवा बंद करण्यास संधी मिळाली आहे.भारत संचार निगमची ही लॅण्डलाइन सेवा सतत बंद स्थितीतच राहात असल्याने व त्याचे देयक मात्र दर महिन्याला बरोबर येत असल्याने ती बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी एप्रिल महिन्यात मुरुड केंद्राकडे अर्ज केला असता, अलिबागच्या कार्यालयात जाण्याचे सांगण्यात आले आहे.- भानुदास राऊत, ग्राहक, नांदगाव

टॅग्स :BSNLबीएसएनएलRaigadरायगड