शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
5
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
6
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
7
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
8
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
9
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
10
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
12
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
13
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
14
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
15
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
16
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
17
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
18
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
19
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
20
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले

मुस्लीम आणि कुणबी मतदारांचा भाव वधारला; रायगड मतदारसंघात कुणाची चर्चा?

By राजेश भोस्तेकर | Updated: February 12, 2024 06:05 IST

जेथे पक्षाची स्थिती मजबूत आहे, तो मतदारसंघ देण्याची राजकीय हाराकिरी राष्ट्रवादी करेल? एकदा भाजपकडे जागा गेली, तर जिल्ह्याच्या राजकारणावरील राष्ट्रवादीची पकड ढिली होण्यास वेळ लागणार नाही

शिवसेनेचे (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या कोकण दौऱ्याला रायगडमधून सुरुवात झाली. तेथील सभा, भेटीगाठी यामुळे स्थानिक शिवसेनेला बळ मिळालेच, पण अन्य पक्षांतील राजकीय हालचालीही अचानक वाढल्या.  

महाआघाडीत रायगड-रत्नागिरीच्या जागेवर अनंत गीते लढतील, हे स्पष्ट आहे. महायुतीत ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसकडे (अजित पवार गट) आहे. त्यांना शिवसेनेच्या शिंदे गटाने विरोध करून आधीपासूनच वादाची ठिणगी टाकली आहे. अदिती तटकरे यांना पालकमंत्रिपद मिळू न देण्यापासून सुरू झालेल्या या वादात आता लोकसभेच्या जागेवर दावा सांगण्याइतकी प्रगती झाली आहे, पण दावा करूनही त्यांच्याकडे ठोस उमेदवार नाही. पक्षाची लोकसभेसाठी तयारीही नाही. आता शिंदे गट दावा सांगतोय म्हटल्यावर भाजपनेही धैर्यशील पाटील यांना पुढे करत आपलाही हक्क पुढे केला. त्याच वेळी राष्ट्रवादीचे विद्यमान खासदार सुनील तटकरे हा मतदारसंघ भाजपला सोडतील आणि राज्यसभेवर जातील, अशाही बातम्या पेरल्या गेल्या, पण राष्ट्रवादी काँग्रेसच्या कर्जतच्या राज्यव्यापी मेळाव्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दावा केलेल्या चार लोकसभा मतदारसंघांत रायगड होता, याचा अनेकांना विसर पडला. 

जेथे पक्षाची स्थिती मजबूत आहे, तो मतदारसंघ देण्याची राजकीय हाराकिरी राष्ट्रवादी करेल? एकदा भाजपकडे जागा गेली, तर जिल्ह्याच्या राजकारणावरील राष्ट्रवादीची पकड ढिली होण्यास वेळ लागणार नाही. एकीकडे पक्ष फुटूनही स्थानिक स्वराज्य संस्थेत शिवसेनेने (उबाठा) मिळविलेल्या यशामुळे त्या पक्षाला उभारी मिळाली. आताच्या दौऱ्यात मुस्लीम मतदारांनी त्याच पक्षाचा पर्याय म्हणून विचार केल्याचे सभांच्या गर्दीतून दिसून आले. आजवर काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठीशी असलेल्या मुस्लीम मतदारांनी या नवा राजकीय पर्यायाचा विचार सुरू केल्याचे लक्षात येताच, राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) नेत्यांनी अल्पसंख्यांक मेळावे आयोजित करणार असल्याचे जाहीर केले, तर शिवसेनेच्या शिंदे गटाने ठाकरेंच्या सभेला उत्तर देण्याच्या सभा घेण्याचे नियोजन सुरू केले. नाराज कुणबी मतदारही ठाकरे यांच्या सभेनिमित्ताने व्यक्त होऊ लागला. शेकापने विधानसभेचा - खास करून अलिबागचा विचार करून महाआघाडीला आपले बळ देण्याचा निर्णय कायम ठेवला आहे.  

शेकापप्रमाणेच भाजप, शिवसेनेच्या शिंदे गटानेही लोकसभेच्या निमित्ताने दावे करत, आपली विधानसभेची गणिते पक्की करून घेण्यास सुरुवात केली आहे. लोकसभेला कोण किती मदत करतो, यावरच विधानसभेचे वाटप होणार आणि तेथे लोकसभेचे हिशेब चुकते होणार, हे सर्वसामान्य कार्यकर्त्यांनाही कळून चुकले आहे. यातील जी चर्चा आजवर आडूनआडून होत होती, ती ठाकरेंच्या दौऱ्यानंतर उघडपणे सुरू झाली, हे या दौऱ्याचे फलित.

टॅग्स :raigad-pcरायगडShiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेसsunil tatkareसुनील तटकरे