शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी, प्रस्ताव मिळताच मदतनिधी देणार; PM नरेंद्र मोदींचं आश्वासन
2
आजचे राशीभविष्य, २७ सप्टेंबर २०२५: जमीन, घर अथवा वाहन खरेदीसाठी आजचा दिवस अनुकूल नाही
3
ठाण्यात भाजपा-शिंदेसेनेत संघर्ष; एकनाथ शिंदेंच्या अध्यक्षतेत बैठकीला गणेश नाईकांचा ‘बहिष्कार’
4
कुजबुज! ओल्या दुष्काळात काजू-बदामची चर्चा; शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी अन् राजकीय चिखलफेक
5
१६५ तोळे सोने, दोन किलो चांदी अन् ११ लाख राेख देऊनही छळ; मायानगरी मुंबईत विवाहितेचा गर्भपात
6
मढ बेट बनावट नकाशा प्रकरणाची गहाळ फाइल शोधा, अन्यथा गुन्हा दाखल करा; हायकोर्टाचे निर्देश
7
सुपर ओव्हरचा थरार! श्रीलंका २ धावांवर All Out; पहिल्या बॉलवर मॅच संपवत टीम इंडियाचा विजयी 'षटकार'
8
IND vs SL Match Super Over: अखेरच्या चेंडूवर ड्रामा अन् सामन्यात सुपर ओव्हर ट्विस्ट; नेमक काय घडलं (VIDEO)
9
Pathum Nissanka Century : पहिली सेंच्युरी अन् श्रीलंकेच्या पठ्ठ्यानं किंग कोहलीचा मोठा विक्रमही मोडला
10
पीएनबी घोटाळा: सीबीआय न्यायालयात अर्जास मान्यता; नीरव मोदीचा मेव्हणा ‘माफीचा साक्षीदार’
11
‘सीएसएमटी’वरील १८ नंबरचा प्लॅटफॉर्म ३ महिने बंद राहणार; १ ऑक्टोबरपासून पायाभूत कामे
12
दुरुस्तीच्या कामासाठी रेल्वेचा मेगाब्लॉक; तिन्ही मार्गांवर रविवारी होणार ‘प्रवासखोळंबा’
13
तीन कोटी खर्चून ‘उपचार’, तरीही आईची प्रकृती सुधारेना; मुलाची पोलीस स्टेशनला तक्रार, तपास सुरू
14
ठरलं, ८-९ ऑक्टोबरला PM मोदी महाराष्ट्रात येणार; CM फडणवीस म्हणाले, “नवी मुंबई विमानतळ...”
15
“राऊतांनी खासदारकीचा एक महिन्याचा पगार दिला असता तर आभार मानले असते”; कुणी केली खोचक टीका?
16
"रशियन सैन्यात जावू नका, तुमच्या जीवाला धोका"; सरकारने दिला इशारा, म्हणाले, "२७ भारतीय..."
17
या एसयूव्हीचं फक्त नावच काफी...! विक्रीच्या बाबतीत पुन्हा ठरली नंबर-1; 38% मार्केट केला एकटीनं 'कॅप्चर'
18
भारताच्या दिग्गज डिफेंस कंपनीला थेट इस्रायलमधून मिळाली मोठी ऑर्डर, अशी आहे शअरची स्थिती
19
VIDEO: बापरे... चिमुरड्याने बसल्या बैठकीला कचाकचा खाल्ल्या हिरव्या मिरच्या, नेटकरीही थक्क
20
कोण आहेत अरुणाचल प्रदेशात पंतप्रधान मोदींचं स्वागत करणाऱ्या या 'डॅशिंग' IAS अधिकारी? सोशल मीडियावर होतायत व्हायरल!

मुंबईकरांच्या सोयीसाठी झाली मुरुडकरांची गैरसोय; चालक-वाहकांची कमतरता

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2020 00:10 IST

एसटीच्या चालक, वाहकांना मुंबईत सेवा देण्यासाठी पाठविल्याने स्थानिकांची अडचण

मुरुड : कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यसाठी राज्य शासनाने मुंबई उपनगरांना जोडणारी रेल्वे सेवा बंद ठेवल्याने कामावर जाणाऱ्या असंख्य नोकदारांना एसटीद्वारे सेवा दिली जात आहे. यासाठी रायगड जिल्ह्यातील प्रत्येक आगारातून २५ ते ३० चालक, वाहक मुंबई आगारात समाविष्ठ करण्यात येऊन एसटीद्वारे मुंबईकरांची सोय केली जात आहे. याचा परिणाम स्थानिक नागरिकांना सहन करावा लागत आहे.

रायगड जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील आगारातून चालक, वाहक मुंबईला गेल्याने गाड्या उपलब्ध असताना, आता प्रत्येक आगाराला चालक-वाहक उपलब्ध नसल्याने नियोजित गाड्या रद्द कराव्या लागत आहे. जिथे २४ फेऱ्या मारल्या जायच्या, तेथे आता फक्त दहा फेऱ्या होत आहेत. ग्रामीण भागातील फेऱ्या रद्द करण्यात आल्याने जनतेला मोठा त्रास सहन करावा लागत आहे. त्याचप्रमाणे, मुंबई, पुणे या ठिकाणी दिवसाला तीन गाड्या सुटत असत, तेथे आता एखादी गाडी सोडण्यात येत आहे. 

मोठ्या प्रमाणात प्रत्येक आगारातील माणसे मुंबईला सेवा देण्यास गेली, परंतु ग्रामीण व तालुका स्थरावरील सेवा साफ कोलमडली आहे.मुंबईतून निघालेला माणूस अलिबागपर्यंत येतो व कित्येक तास खोळंबून राहतो. जोपर्यंत मुंबई गाडी येत नाही, तोपर्यंत त्याला आपले घर गाठता येत नाही. गाड्यांची संख्या कमी झाल्याने प्रवास खूप महागाचा पडत आहे.

नवीन भरती न केल्याने उपलब्ध कामगारांवर ताणएसटीने खूप वर्षांत नवीन भरती न केल्याने उपलब्ध कामगारांच्या जिवावर त्यांचा कारभार निर्भर आहे. उपलब्ध संख्या खूप कमी असल्याने त्यातच मुंबईला मोठ्या संख्येने माणसे रवाना झाल्याने स्थानिक पातळीवरची एसटी सुविधा ढासळलेली दिसून येत आहे. अनेक गाड्या रद्द, नेमक्याच गाड्यांमुळे वेळेवर न सुटणे, तासंतास वाट पाहावी लागणे हे चित्र सध्या सर्वच आगरात पाहावयास मिळत आहे. अशा अनेक त्रासांमुळे प्रवासी त्रस्त झाला आहे, परंतु सुधारणा होण्याची कोणतीही चिन्ह दिसत नसल्याने हा त्रास प्रवाशांना दीर्घकाळ सोसावा लागणार आहे. 

टॅग्स :state transportएसटी