शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

सहा वर्षापूर्वी झालेल्या खुनाचा लागला छडा; स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाची स्तुत्य कामगिरी

By राजेश भोस्तेकर | Updated: March 18, 2024 14:51 IST

जयेशच्या हत्येप्रकरणी दोन जण ताब्यात

राजेश भोस्तेकर, लोकमत न्युज नेटवर्क, अलिबाग : खालापूर तालुक्यातील रसायनी पोलीस ठाणे हद्दीत झालेल्या जयेश काशिनाथ खुडे या २७ वर्षीय तरुणाच्या खुनाचा छडा सहा वर्षांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने लावला आहे. जयेश यांची हत्या करणाऱ्या मुख्य आरोपी ओमकार सुनील शिंदे (२५) रां. वावंढळ, खालापूर आणि त्याचा साथीदार रोहित पाटील (२७) रा चांभार्ली या दोघांना अटक करण्यात आलेली आहे. सहा वर्षापूर्वी झालेल्या गुन्ह्याचा तपास लावण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला यश आले आहे. अशी माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी सोमवारी १८ मार्च रोजी अधीक्षक कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली. अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे, स्थानिक गुन्हे चे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे, सपोनी संदीप पोमण उपस्थित होते.

रायगड जिल्ह्यात घडलेल्या काही खुनाच्या गुन्ह्याचा तपास अद्यापही लागलेला नाही. अशा गुन्ह्याचा तपास करण्यासाठी जिल्हा पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांच्या आदेशाने  स्थानिक गुन्हे विभागाचे पोलिस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांनी एक पथक नेमले आहे. या पथकांच्या मार्फत उघड न झालेल्या खुनाचे गुन्ह्याचा तपास केला जात आहे. सपोनी संदीप पोमण यांच्या पथकाने रसायनी येथे सहा वर्षापूर्वी घडलेल्या गुन्ह्याचा कोणताही पुरावा नसताना उघडकीस आणला आहे. अशी माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी दिली आहे. 

रसायनी पोलीस ठाणे हद्दीत चावणे गाव ते पेट्रो नॉस रस्त्यावर १३ एप्रिल २०१८ साली रात्री साडे नऊच्या सुमारास अज्ञातांनी जयेश यांच्या अंगावर धारदार शस्त्राने अनेक वार करून मृतदेह नाळ्यामध्ये फेकून दिला होता. ही माहिती कळताच रसायनी पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा करून ३०२ प्रमाणे अज्ञात मारेकरी यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता. मात्र या गुन्ह्याचा तपास लागला नव्हता. विशेष म्हणजे या गुन्ह्यातील मुख्य आरोपी ओमकार शिंदे याला ३२६ अन्वये अटक ही झाली होती. मात्र खुनाच्या बाबतीत त्याचा सबंध आहे अशी तसूभरही कल्पना पोलिसांना नव्हती. त्यानंतर तो सुटून बिनधास्त वावरत होता.

उघड न झालेल्या खुनाच्या गुन्ह्याचा तपास करताना अखेर एका खबऱ्याच्या माहितीने स्थानिक गुन्हे विभागाचे सपोनी संदीप पोमण यांना २०१८ साली झालेल्या जयेश याच्या मारेकऱ्यांची माहिती मिळाली. त्यानुसार सहा फौजदार राजेश पाटील, प्रसाद पाटील, पोह यशवंत झेमसे, पोह संदीप पाटील, राकेश म्हात्रे, सुधीर मोरे यांनी मिळालेल्या माहितीनुसार ओमकार याला ताब्यात घेतले. पोलिसी इंगा दाखवल्यानंतर रोहित पाटील या आपल्या साथीदारांचे नाव घेतले. त्यालाही पथकाने कर्जत, जामखेड, अहमदनगर येथून ताब्यात घेतले. पैशाच्या वादातून खून केल्याचा प्राथमिक अंदाज असून अधिक तपास पोलीस करीत आहेत. 

लिफ्ट देऊन त्याला संपवले

जयेश यांची हत्या का केली याची स्पष्ट कबुली आरोपींनी दिलेली नाही आहे. मात्र पैशाच्या वादातून खून केल्याचे आरोपी म्हणत असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. मयत याला मोटार सायकल वरून लिफ्ट देऊन घटनास्थळी आल्यानंतर त्याच्यावर हत्याराने वार करून संपवले होते. त्यानंतर दोघेही पळाले होते. यातील एकजण आरोपी हा रियल इस्टेट एजंट असून दुसरा सॉफ्ट वेअर इंजिनियर असल्याची पार्श्वभूमी आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीalibaugअलिबाग