शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

बाप्पा पावला, सागरी प्रवास झाला स्वस्त; १ सप्टेंबरपासून तिकीट दर कमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2023 10:46 IST

ऐन गणपतीत अलिबाग-कोकणात जाणाऱ्या हजारो भाविकांची गैरसोय दूर होणार

मधुकर ठाकूर

लोकमत न्यूज नेटवर्क, उरण : तीन महिने पावसाळी हंगामात बंद केलेल्या रेवस-भाऊचा धक्का या सागरी जलमार्गावर १ सप्टेंबरपासून प्रवासी बोट सेवा पूर्ववत सुरू होणार आहे. तर भाऊचा धक्का-मोरादरम्यान पावसाळी हंगामात वाढविलेला तिकीट दर २५ रुपयांनी कमी होणार आहे. यामुळे ऐन गणपती सणातच सुरू होणाऱ्या प्रवासी वाहतुकीमुळे अलिबाग-कोकणात जाणाऱ्या हजारो भाविकांची गैरसोय दूर होणार आहे. तसेच मोरा सागरी प्रवासही स्वस्त होणार असल्याने प्रवाशांनाही दिलासा मिळणार आहे.

वारंवार बदलणारे वादळी व खराब, मुसळधार पाऊस, हवामान समुद्रात उठणाऱ्या उंचच उंच लाटा यामुळे खबरदारीची उपाययोजना म्हणून पावसाळी हंगामासाठी दरवर्षी रेवस-भाऊचा धक्का या सागरी जलमार्गावरील प्रवासी वाहतूक बंद ठेवण्यात येते.

या सागरी मार्गावरील तिकीट दर १०० रुपये आहे. तर गेटवे-मांडवा मार्गावरील स्पीड बोट आणि रो-रो बोट सेवा यांच्या तिकीट दरांपेक्षा सर्वसामान्यांना रेवस-भाऊचा धक्का या सागरी जलमार्गावरील प्रवास परवडतो. त्यामुळे हजारो सर्वसामान्य प्रवासी या मार्गावरून प्रवास करतात. बंद ठेवलेली प्रवासी बोट सेवा १ सप्टेंबरपासून सुरू करण्यात येणार असल्याची माहिती मुंबई जलवाहतूक संस्थेचे सेक्रेटरी शराफत मुकादम यांनी दिली.

भाऊचा धक्का-मोरादरम्यान दरवर्षी पावसाळी हंगामात तिकीट दरात वाढ केली जाते. त्यानुसार तिकीट दरात २५ रुपयांची वाढ केली होती. १ सप्टेंबरपासून पावसाळी हंगाम संपुष्टात येणार असल्याने दर कमी करण्यात येणार आहे. यामुळे भाऊचा धक्का-मोरादरम्यान प्रवाशांना तिकिटासाठी आता ८० रुपये मोजावे लागणार असल्याचे शराफत मुकादम यांनी सांगितले.

टॅग्स :alibaugअलिबागkonkanकोकणMumbaiमुंबई