शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
3
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
4
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
5
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
6
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
7
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
8
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
9
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
10
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
11
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
12
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
13
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
14
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
15
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
16
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
17
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
18
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
19
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

बाप्पा पावला, सागरी प्रवास झाला स्वस्त; १ सप्टेंबरपासून तिकीट दर कमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2023 10:46 IST

ऐन गणपतीत अलिबाग-कोकणात जाणाऱ्या हजारो भाविकांची गैरसोय दूर होणार

मधुकर ठाकूर

लोकमत न्यूज नेटवर्क, उरण : तीन महिने पावसाळी हंगामात बंद केलेल्या रेवस-भाऊचा धक्का या सागरी जलमार्गावर १ सप्टेंबरपासून प्रवासी बोट सेवा पूर्ववत सुरू होणार आहे. तर भाऊचा धक्का-मोरादरम्यान पावसाळी हंगामात वाढविलेला तिकीट दर २५ रुपयांनी कमी होणार आहे. यामुळे ऐन गणपती सणातच सुरू होणाऱ्या प्रवासी वाहतुकीमुळे अलिबाग-कोकणात जाणाऱ्या हजारो भाविकांची गैरसोय दूर होणार आहे. तसेच मोरा सागरी प्रवासही स्वस्त होणार असल्याने प्रवाशांनाही दिलासा मिळणार आहे.

वारंवार बदलणारे वादळी व खराब, मुसळधार पाऊस, हवामान समुद्रात उठणाऱ्या उंचच उंच लाटा यामुळे खबरदारीची उपाययोजना म्हणून पावसाळी हंगामासाठी दरवर्षी रेवस-भाऊचा धक्का या सागरी जलमार्गावरील प्रवासी वाहतूक बंद ठेवण्यात येते.

या सागरी मार्गावरील तिकीट दर १०० रुपये आहे. तर गेटवे-मांडवा मार्गावरील स्पीड बोट आणि रो-रो बोट सेवा यांच्या तिकीट दरांपेक्षा सर्वसामान्यांना रेवस-भाऊचा धक्का या सागरी जलमार्गावरील प्रवास परवडतो. त्यामुळे हजारो सर्वसामान्य प्रवासी या मार्गावरून प्रवास करतात. बंद ठेवलेली प्रवासी बोट सेवा १ सप्टेंबरपासून सुरू करण्यात येणार असल्याची माहिती मुंबई जलवाहतूक संस्थेचे सेक्रेटरी शराफत मुकादम यांनी दिली.

भाऊचा धक्का-मोरादरम्यान दरवर्षी पावसाळी हंगामात तिकीट दरात वाढ केली जाते. त्यानुसार तिकीट दरात २५ रुपयांची वाढ केली होती. १ सप्टेंबरपासून पावसाळी हंगाम संपुष्टात येणार असल्याने दर कमी करण्यात येणार आहे. यामुळे भाऊचा धक्का-मोरादरम्यान प्रवाशांना तिकिटासाठी आता ८० रुपये मोजावे लागणार असल्याचे शराफत मुकादम यांनी सांगितले.

टॅग्स :alibaugअलिबागkonkanकोकणMumbaiमुंबई