शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
2
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
3
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
5
जे रोहित-विराटलाही नाही जमलं ते सूर्या भाऊनं करून दाखवलं; मोडला ११ वर्षांपूर्वीचा विक्रम
6
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
7
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
8
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
9
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
10
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
11
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
12
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
13
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
14
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
15
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
16
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
17
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
18
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
19
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना
20
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला

उमटे धरणातील गाळ १५ मे नंतर काढणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 2, 2019 23:34 IST

अशुद्ध पाणीपुरवठा : १८ गावांतील ग्रामस्थांनी उपसला गाळ

अलिबाग : तालुक्यातील उमटे धरणातील गाळ १५ मे नंतर काढण्यात येईल. जलशुद्धीकरण केंद्रामध्ये काही दोष असल्यास ते दूर करण्यात येतील. नागरिकांना शुद्ध आणि स्वच्छ पाणी देण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासन कटिबद्ध आहे, असे रायगड जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता संजय वेंगुर्लेकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. प्रशासनाच्या या भूमिकेमुळे नागरिकांना गाळातीलच पाणी प्यावे लागणार असल्याने नागरिकांमध्ये नाराजीचा सूर आहे.

सरकारसह प्रशासन काही उपाययोजना करत नसल्याने अलिबाग तालुक्यातील उमटे धरण परिसरातील १८ गावांतील ग्रामस्थांनी श्रमदान करून धरणातील गाळ काढला. धरणाचे पात्र प्रचंड मोठे असल्याने सर्वच गाळ काढणे शक्य नसल्याने ग्रामस्थांच्या या कृतीचा सरकार आणि प्रशासनाने गांभीर्याने विचार करावा हीच अपेक्षा ग्रामस्थांची आहे.

१ मे रोजी महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून उमटे धरण परिसरातील १८ गावच्या ग्रामस्थांनी पुढाकार घेत धरणाची पाणीसाठवण क्षमता आणि जलस्रोत वाढविण्याकरिता गाळउपसा श्रमदान मोहीम राबविली. सरकार आणि प्रशासनाचे लक्ष वेधले जाऊन धरणक्षेत्राचा विकास करण्यात यावा, अशी मागणी या वेळी ग्रामस्थांनी केली. धरणाची साठवण क्षमता मोठी असली तरी सध्या धरण चारही बाजूंनी गाळाने भरलेले आहे. मुबलक आणि स्वच्छ पाणीपुरवठा करण्यात यावा, धरणाची डागडुजी तत्काळ करावी यासाठी असंख्य तरुण, ज्येष्ठ नागरिक यांनी या मोहिमेत सहभाग घेतला.

रामराज परिसरात या धरणाची निर्मिती १९७८ साली करण्यात आली होती. त्यानंतर १९९५ साली हे धरण प्राधिकरणाकडून रायगड जिल्हा परिषेदला हस्तांतरित झाले. त्यामुळे धरणाची जबाबदारी जिल्हा परिषदेवर आहे. उमटे धरणाची साठवण क्षमता ८७ दशलक्ष घनफूट आहे. पाण्याची शेवटची पातळी ४० मीटर, धरणाची उंची ५६.४० मीटर आहे. सद्यस्थितीत धरणात मोठ्या प्रमाणात गाळ साचल्याने पाण्याची साठवण क्षमता सुमारे ३० दशलक्ष घनफूट कमी झाली आहे, असे ग्रामस्थ अ‍ॅड. राकेश पाटील यांनी ‘लोकमत’ला सांगितले. १५ मे नंतर गाळ काढण्यात येणार असल्याने तोपर्यंत गाळातील पाणी नागिरकांनी प्यावे काय, असा संतप्त सवालही त्यांनी केला.

कोट्यवधीचा निधी खर्चून बांधण्यात आलेले धरण ज्या क्षमतेने पाणीपुरवठ्यासाठी उपयुक्त ठरणे गरजेचे आहे त्याप्रमाणे ते उपयुक्त ठरत नाही. उमटे धरणातून साधारणत: दीड लाख लोकांची तहान भागविण्याची क्षमता आहे. आजघडीला धरणालाच कोरड आणि भेगा पडल्याचे दिसून येते. धरणात गुरांचे शेण मलमूत्र, मानवी विष्टा दिसून येते. त्याचप्रमाणे शेवाळ, केरकचराही मोठ्या प्रमाणावर असल्याने सभोवतालच्या गावांना दूषित पाणीपुरवठा होत आहे. परिणामी, दूषित पाण्यामुळे विविध आजार, रोगराई पसरत असल्याने नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे.प्रशासनाने उमटे धरणातील गाळ लवकरात लवकर न उपसल्यास तीव्र आंदोलन छेडणार असल्याचा इशारा माझेरी आगरी समाज उपाध्यक्ष रामचंद्र गुंड यांनी दिला आहे.

उमटे धरण मोठे आहे. त्याची साठवण क्षमता आणि पात्रही विस्तृत आहे. गाळ काढण्यासाठी लागणारी प्रक्रिया सुुरू करण्यात आलेली आहे. धरणातील गाळ १५ मेनंतर काढण्यात येणार आहे. त्याचबरोबर जलशुद्धीकरण यंत्राच्या माध्यमातून होणारा पाणीपुरवठा शुद्ध आहे की नाही, याची शहानिशा केली जाईल. नागरिकांना स्वच्छ आणि शुद्ध पाणी देण्याचा प्रयत्न करू. - संजय वेंगुर्लेकर, कार्यकारी अभियंता, ग्रामीण पाणीपुरवठा

टॅग्स :RaigadरायगडDamधरण