शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
2
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
7
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
8
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
9
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
10
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
11
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
12
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
13
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
14
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
15
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
16
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
17
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
18
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
19
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
20
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

जंजिरा किल्ल्यावरील तिकीटघर राजपुरी जेट्टीवर हलवा; पर्यटकांसह स्थानिकांची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2020 23:17 IST

गर्दीच्या वेळी चेंगराचेंगरी, धक्काबुक्की

मुरुड : ऐतिहासिक जंजिरा किल्ला पाहण्यासाठी वर्षाला सहा लाखांपेक्षा जास्त पर्यटक येत असतात. त्यातच सलग सुट्ट्या पडल्या, तर एका दिवसाला २५ हजारांपेक्षा जास्त पर्यटक जंजिरा किल्ला पाहण्यासाठी येत असतात. अशा वेळी वाहनांबरोबरच पर्यटकांची अलोट गर्दी जंजिरा किल्ल्यावर होत असते. पूर्वी हा किल्ला विनातिकीट पाहावयास मिळत होता; परंतु काही महिन्यांपूर्वीच पुरातत्त्व खात्याने माणसी २५ रुपये शुल्क आकारण्याची सुरुवात केली आहे. त्यामुळे पर्यटकांना तिकीट काढूनच किल्ल्यात प्रवेश मिळत आहे. या किल्ल्यावरील लोखंडी दरवाजा त्याचप्रमाणे निमुळते प्रवेशद्वार यामुळे पुरातत्त्व खात्याचे तिकीट काढत असताना गर्दीच्या वेळी चेंगराचेंगरी व धक्काबुक्कीचे प्रकार घडत आहेत, यामुळे पुरातत्त्व खात्याचे तिकीटघर राजपुरी जेट्टीवर करावे, अशी मागणी होतआहे.

जंजिरा किल्ल्यात प्रवेशासाठी तिकीट काढणारा व्यक्ती हा माणसे मोजून तिकीट काढली जात असल्यामुळे गर्दीच्या वेळी ही प्रक्रिया धीमी होत असल्याने एक तर पर्यटकांच्या गर्दीने तिकीट काढण्याची प्रक्रिया मंदावली असल्याने या प्रकारचा बराच त्रास पर्यटकांना सहन करावा लागत आहे. त्यामुळे पुरातत्त्व खात्याने आपले तिकीटघर किल्ल्यावर न ठेवता राजपुरी नवीन जेट्टी येथे करावे. त्यामुळे किल्ल्यात प्रवेश करण्यापूर्वीच पुरातत्त्व खात्याचे तिकीट काढले जाईल व पर्यटकांना अगदी सहज किल्ल्यात प्रवेश मिळेल, असे पर्यटकांचे म्हणणे आहे. त्यानुसार राजपुरी नवीन जेट्टीवर तिकिटाची व्यवस्था करण्याची मागणी होत आहे.

याबाबत नाशिक येथील पर्यटक मिलिंद सातपुते यांनी जंजिरा किल्ल्यात प्रवेश करताच पुरातत्व खात्याने लोखंडी दरवाजा बसवला आहे. त्यामुळे काहीअंशी जागा त्यामध्ये गेली आहे. त्यातच गर्दीच्या वेळी तिकीट काढताना चेंगराचेंगरी होत असून तिकीट प्रक्रिया धीम्या गतीने सुरू असल्याने पर्यटकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत असल्याचे ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

तिकीट हे ऑनलाइन असल्याने तिकीट निघण्यास उशीर होतो, ही वस्तुस्थिती सत्य आहे; परंतु वरिष्ठ कार्यालयाकडूनच ही कार्यप्रणाली अवलंबली असल्याने त्याच प्रकारे तिकीट काढले जात आहे. जर पुरातत्त्व खात्यास महाराष्ट्र मेरीटाइम बोर्डाकडून तिकीटघरासाठी जागा उपलब्ध करून दिली तर आम्ही ही जागा बदलण्यास तयार आहोत, यासाठी स्थानिकांनी सहकार्य करणे आवश्यक आहे.- बजरंग ऐलीकर, पुरातत्त्व खात्याचे अधिकारी

टॅग्स :RaigadरायगडMaharashtraमहाराष्ट्र