शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash: 'नो थ्रस्ट', अपघातापूर्वी पायलट सुमित सभरवालांचा ATC ला मेसेज; विमान का कोसळले?
2
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
3
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "MY LOVE...", विमान अपघातात गर्लफ्रेंडचा मृत्यू, डोळे पाणावणारा Video
4
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
5
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
6
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
7
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
8
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
9
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
10
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
11
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
12
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
13
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
14
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
15
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
16
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
17
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
18
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
19
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
20
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती

तोंडली उत्पादकांच्या तोंडचे पाणी पळाले; लॉकडाऊनमुळे लाखो रुपयांचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2020 00:09 IST

तोंडलीची विक्री व्यवस्था ठप्प झाल्यामुळे तोंडलीचे पीक हे शेतातच खराब झाले.

रायगड : अडीज महिन्यांच्या लॉकडाऊनमुळे हाता-तोंडाशी आलेले तोंडलीचे पीक बाजारात विकता आले नाही. त्यामुळे शेतातच पीक खराब झाल्याने तोंडली उत्पादक शेतकऱ्यांना लाखो रुपयांचा आर्थिक भुर्दंड पडला आहे. या शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य आंबा उत्पादक संघाचे अध्यक्ष चंद्रकांत मोकल यांनी जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्याकडे केली. याबाबतचे निवेदन त्यांनी जिल्हाधिकाºयांना दिले.

तोंडलीची विक्री व्यवस्था ठप्प झाल्यामुळे तोंडलीचे पीक हे शेतातच खराब झाले. मालाला उठाव नसल्यामुळे शेतकºयांना ती कवडीमोल दराने ती विकावी लागली. त्यामुळे वर्षाला एकरी लाखाहून अधिक उत्पादन घेणाºया शेतकºयांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे, तरी या तोंडली उत्पादक शेतकºयांना आर्थिक मदतीबरोबरच भरीव अनुदान मिळावे, अशी आग्रही मागणी चंद्रकांत मोकल यांनी रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांना लेखी निवेदनाद्वारे प्रत्यक्ष भेटून केली आहे.

कृषी विकास यंत्रणा (आत्मा)मार्फत मदत व्हावी, असेही ही मोकल यांनी आपल्या निवेदनात नमूद केले आहे. या अनुषंगाने चंद्रकांत मोकल यांनी कोकण विभागाचे सहसंचालक (कृषी) विकास पाटील यांच्या बरोबरही चर्चा करून तोंडली उत्पादकांना आर्थिक मदत करावी, अशी मागणी केली आहे.हजारो हेक्टर क्षेत्रावर घेतात पीक

हमखास उत्पादन देणाºया तोंडलीमध्ये विविध औषधी गुणधर्म आहेत. तोंडली पिकाचे उत्पादन करण्यासाठी रायगड जिल्ह्यातील अलिबाग, मुरुड, रोहा, पेण या तालुक्यात हजारो हेक्टर क्षेत्रावर तोंडलीचे पीक घेतले जाते. शेतकरी वर्षानुवर्षे प्रचलित पद्धतीने तोंडलीची शेती करतात. तोंडलीला बाजारात अधिक मागणी असल्यामुळे ती किरकोळ स्वरूपात विकली जाते. ठोक व्यापारासाठी असलेल्या नवी मुंबईतील एपीएमसी मार्केटमध्ये तिची विक्री होते. तेथून मुंबईसह अन्य शहरात, तसेच काही प्रमाणात ती निर्यातही केली जाते.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसRaigadरायगड