शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

गणेशोत्सवासाठी आज सुटणार सर्वाधिक बसेस, एसटीकडून २,५०० बसेसची व्यवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2018 05:11 IST

गणेशोत्सवासाठी चाकरमानी कोकणात दाखल होऊ लागले आहेत.

अलिबाग : गणेशोत्सवासाठी चाकरमानी कोकणात दाखल होऊ लागले आहेत. त्यांच्या प्रवास सुखकर व्हावा, यासाठी एसटी महामंडळाने तब्बल २ हजार ५०० विशेष एसटी उपलब्ध करून दिल्या आहेत.गणेशभक्तांसाठी एसटीच्या जादा गाड्या ८ सप्टेंबरपासूून सुरू झाल्या आहेत. संगणकीय आरक्षणाबरोबरच ग्रुप बुकिंगची सोय देखील एसटी महामंडळाने उपलब्ध करून दिली आहे. मुंबई, ठाणे, पालघर येथून या एसटी बसेस सोडण्यात येत आहेत. दरम्यान, रायगड एसटी विभागातून १५० एसटी बसेस मुंबई, ठाणे व पालघर विभागाला चाकरमान्यांच्या सेवेसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.८ सप्टेंबर रोजी १३ तर ९ सप्टेंबर रोजी ७५ एसटी बसेस कोकणात रवाना झाल्या आहेत. सोमवार १० सप्टेंबर रोजी ३५५, ११ सप्टेंबर रोजी सर्वाधिक १,५३९ बसेस रवाना होणार आहेत. १२ सप्टेंबर रोजी २०४ तर १३ सप्टेंबर रोजी ३९ बसेस सोडण्यात येणार आहेत.२ हजार ५०० एसटी बसेसपैकी मुंबई विभागातून १ हजार १२५, ठाणे विभागातून ८७८ तर पालघर विभागातून २२२ गाड्या अशा एकूण आगाऊ आरक्षित २ हजार २२५ एसटीच्या जादा बसेस सोडण्यात येणार आहेत.गोवा राष्ट्रीय महामार्गाची दुरवस्था विचारात घेऊन एसटीबसेस बंद पडण्याची समस्या येऊ नये आणि आलीच तर तत्काळ उपाययोजना करता यावी याकरिता रायगड एसटी विभागीय कार्यालयाच्या माध्यमातून वाकण, इंदापूर, कशेडी येथे गस्तीपथके ठेवण्यात आली आहेत.>परतीचीही सोयगणेशोत्सवानंतर कोकणातून परत मुंबईला जाण्यासाठी १७ ते २३ सप्टेंबर या दरम्यानही परतीच्या प्रवासासाठी जादा गाड्यांची व्यवस्था करण्यात आली आहे.एसटी बसेसबरोबरच खासगी बसेस व वाहनांचे प्रमाण देखील गोवा राष्ट्रीय महामार्गावर वाढले असून, वाहतूक नियंत्रणाकरिता पनवेल ते कशेडी या दरम्यान रायगड वाहतूक पोलिसांनी चोख बंदोबस्त व गस्तीपथके तैनात करण्यात आली आहेत.

टॅग्स :Ganesh Chaturthi 2018गणेश चतुर्थी २०१८Ganpati Festivalगणेशोत्सवkonkanकोकण