शहरं
Join us  
Trending Stories
1
धगधगतं फ्रान्स! लाखो लोक रस्त्यावर उतरले, काही ठिकाणी दगडफेक; रेल्वे, मेट्रो, बस, शाळा बंद
2
Mumbai Crime: घाटकोपर रेल्वे स्थानकाबाहेर सापडला ३५ वर्षाच्या माणसाचा मृतदेह; कोणामुळे गेला जीव?
3
गोपीचंद पडळकरांचे वादग्रस्त विधान: अजित पवारांनी टोचले कान; म्हणाले, 'भाजपची जबाबदारी फडणवीसांची'
4
"आम्ही मित्र बनलो अन्..." १९ वर्षीय मॉडलनं का उचललं टोकाचं पाऊल?; बॅगेतील चिठ्ठीमुळे उघडलं रहस्य
5
रुममेटशी भांडण, पोलिसांनी थेट झाडल्या गोळ्या, अमेरिकेत भारतीय इंजिनियरचा मृत्यू  
6
बँक खात्यात पैसे नाही, टेन्शन कशाला? आता करा UPI पेमेंट, पुढच्या महिन्यात पैसे भरा; 'यांनी' आणलं जबरदस्त फीचर
7
आधी गोलंदाजीवर ठोकले गेले ५ षटकार, मग वडिलांचं निधन, श्रीलंकन क्रिकेटपटूवर कोसळला दु:खाचा डोंगर   
8
Nilon's Success Journey: लोणचं खायला घालून कंपनीनं कमावले ४०० कोटी; छोट्या किचनमधून झाली सुरुवात, आज परदेशातही आहे व्यवसाय
9
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानवर रात्री १.३० वाजताच स्ट्राइक का केले?; CDS चौहान यांचा खुलासा
10
फायद्याची बातमी! पेन्शनचा १००% पैसा टाका इक्विटीत; १ ऑक्टोबरपासून लागू होणार नवा नियम; पैसे कुठे आणि किती वाढत आहेत हे समजणे सोपे होणार
11
..तर महाराष्ट्रात एक नवीन 'खिचडी' पकेल! एकत्र राहण्यासाठी वरून खूपच दबाव आला तर बंडखोरीचे पेव फुटेल
12
आयफोन १७ च्या खरेदीवर ईएमआय किती येईल? जाणून घ्या बँक आणि कॅशबॅक ऑफर्स!
13
सात महिन्यांमध्ये राज्यात वाढले १४ लाख मतदार; राजकीय पक्षांकडून कोणताच आक्षेप नाही
14
iPhone 17: आयफोन १७ मालिकेची विक्री आजपासून सुरू; मुंबईतील अ‍ॅपल स्टोअरबाहेर ग्राहकांची मोठी गर्दी
15
सरकारचे आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर, वितरण २२ सप्टेंबर रोजी मुंबईत होणार; जाणून घ्या यादी
16
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा हल्लाबोल : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार मतचोरांना पाठीशी घालत असल्याचा आरोप, निवडणूक आयोगाचे उत्तर
17
आजचे राशीभविष्य, 19 सप्टेंबर 2025: धनलाभ होण्याचा योग; कोणत्या राशींसाठी आजचा दिवस आनंदाचा?
18
हिंडनबर्ग प्रकरणात अदानींना क्लीन चिट, ४४ पानी आदेशात सेबीने म्हटले; 'व्यवहार' लपवल्याचा पुरावा नाही
19
एका आठवड्यात खड्डे बुजवा, कंत्राटदारांवर कारवाई करा; उच्च न्यायालयाचे महापालिकांना आदेश, राज्यभरात १२ जणांचा मृत्यू
20
मराठा समाजाला मोठा दिलासा, मराठा समाजाला कुणबी जातीचा दर्जा देण्याविरोधातील याचिका फेटाळली

पराभवाची नैतिक जबाबदारी पूर्णपणे माझी - सुरेश लाड

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2019 00:01 IST

कर्जत नगरपरिषदेच्या पराभवानंतर पत्रकार परिषद

कर्जत : कर्जत नगरपरिषदेच्या निवडणुकीत आमच्या पक्षाला कर्जतकर मतदारांनी नाकारले. या निवडणुकीत क ार्यकर्त्यांनी जीव तोडून काम केले, तरीही आम्हाला पराभवाला सामोरे जावे लागले. या पराभवाची नैतिक जबाबदारी मी स्वीकारत आहे. मी लोकशाहीला मानणारा कार्यकर्ता असल्याने हा पराभव मी मोकळ्या मनाने स्वीकारला असून हा पराभव का झाला? याचे कारण आताच सांगू शकत नाही. मात्र हे कसे घडले? याचा शोध घेऊन पुन्हा कामाला लागू. मी सत्तेत नसतानाही जनतेची कामे करत आलो आहे आणि करत राहणार आहे. कर्जतच्या सर्वांगीण विकासासाठी मी सदैव कटिबद्ध आहे, असा विश्वास आमदार सुरेश लाड यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला.कर्जत नगरपरिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस - महाराष्ट्र नवनिर्माण सेना - स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष - शिवराय भीमराय विचार मंच या महाआघाडीचा शिवसेना - भारतीय जनता पक्ष - आरपीआय महायुतीने दारु ण पराभव केल्यानंतर आमदार सुरेश लाड यांनी राष्ट्रवादी भवनच्या सभागृहात पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. याप्रसंगी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष भगवान भोईर, जिल्हासरचिटणीस तानाजी चव्हाण, तालुकाध्यक्ष अशोक भोपतराव आदी उपस्थित होते.सुरेश लाड यांनी सुरुवातीलाच शिवसेना महायुतीच्या उमेदवार सुवर्णा जोशी यांचे तसेच नवनिर्वाचित नगरसेवकांचे अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या. पराभूत झालेल्या महाआघाडीच्या उमेदवारांनी पुन्हा कामाला लागून नागरिक व मतदारांचा विश्वास संपादन करावा असे सांगितले. तुम्ही उमेदवारांमध्ये जास्त लाड उभे केल्याने हा पराभव झाला काय? असे पत्रकारांनी विचारले असता लाड यांनी उत्तर देताना तशी शक्यता आहे असे सावध उत्तर देऊन लगेचच कोणतेही ठोस कारण सांगता येणार नाही. आज केवळ पराभव मान्य करण्यासाठी ही पत्रकार परिषद आयोजित केली असल्याचे स्पष्ट केले.मित्रपक्षांना सामावून न घेतल्याचा फटकातुमचे आघाडीतील मित्रपक्ष काँग्रेस आणि शेतकरी कामगार पक्ष यांना या निवडणुकीत सामील न केल्याने पराभवाला सामोरे जावे लागले काय? या प्रश्नाला उत्तर देताना मी शेवटपर्यंत आमच्या या दोन्ही मित्र पक्षांना महाआघाडीत सामावून घेण्याच्या प्रयत्नात होतो. काँग्रेसने चारही उमेदवारांचे अर्ज मागे घेतले. शेतकरी कामगार पक्षाला प्रभाग सहामधील एक जागा देण्याचे निश्चित केले होते आमचा उमेदवार शेवटच्या मुदतीपर्यंत उमेदवारी मागे घेण्यासाठी उपस्थित होता, परंतु त्यांच्या एका उमेदवाराने प्रभाग दोनमधील माघार घेण्यास नकार दिल्याने नाईलाजाने आम्हाला तेथे आमच्या उमेदवाराला निवडणूक लढवावी लागली.

टॅग्स :Karjatकर्जतElectionनिवडणूकNCPराष्ट्रवादी काँग्रेसShiv SenaशिवसेनाBJPभाजपा