शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

विक्रोळी-कोपरखैरणे खाडीपूल दृष्टीपथात, एमएमआरडीएचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2017 06:44 IST

दहा वर्षांपूर्वी महापालिकेने आपल्या नियोजन आराखड्यात समावेश केलेला विक्रोळी-कोपरखैरणे खाडीपूल दृष्टीपथात आला आहे. एमएमआरडीएने त्या दृष्टीने पावले उचलायला सुरुवात केली आहे. दहा कि.मी. लांबीच्या या मार्गावर वाशी खाडीपुलावर दोन कि.मी. लांबीचा पूल बांधण्यात येणार आहे. त्यासाठी सुमारे १२00 कोटी रुपये खर्च अपेक्षित धरण्यात आला आहे.

 - कमलाकर कांबळे नवी मुंबई : दहा वर्षांपूर्वी महापालिकेने आपल्या नियोजन आराखड्यात समावेश केलेला विक्रोळी-कोपरखैरणे खाडीपूल दृष्टीपथात आला आहे. एमएमआरडीएने त्या दृष्टीने पावले उचलायला सुरुवात केली आहे. दहा कि.मी. लांबीच्या या मार्गावर वाशी खाडीपुलावर दोन कि.मी. लांबीचा पूल बांधण्यात येणार आहे. त्यासाठी सुमारे १२00 कोटी रुपये खर्च अपेक्षित धरण्यात आला आहे. २0२१पर्यंत हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प पूर्ण करण्याचे उद्दिष्ट्य एमएमआरडीएने ठेवले आहे.सध्या मुंबई-नवी मुंबई या दोन शहरांना हमरस्त्याने जोडणारे वाशी-मानखुर्द आणि मुलुंड-ऐरोली हे दोन खाडीपूल आहेत. या दोन उड्डाणपुलांवर वाहतुकीची मोठ्या प्रमाणात कोंडी होत आहे. भविष्यातील संभाव्य वाहतूककोंडीचा अंदाज घेऊन दहा वर्षांपूर्वी तिसºया खाडीपुलाचा प्रस्ताव समोर आला होता. महापालिकेने आपल्या नियोजन आराखड्यात या नवीन खाडीपुलाचा समावेश केला होता. राज्य सरकारनेही या प्रकल्पाला हिरवा कंदील दाखविला होता. त्यानुसार या पुलाच्या शक्यतेचा अभ्यास करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाची नियुक्ती केली होती. एका खासगी एजन्सीमार्फत या प्रकल्पाचा सविस्तर अभ्यास करून त्याचा अहवाल सादर करण्याचे आदेशही देण्यात आले होते. सार्वजनिक बांधकाम विभागाने विविध स्तरावर पाहणी करून, हा प्रकल्प अत्यावश्यक असल्याचा अहवाल दिला होता. त्यानुसार आता एमएमआरडीएने या नव्या खाडीपुलाच्या उभारणीसाठी पावले उचलायला सुरुवात केली आहे. या प्रस्तावित पुलाचा आराखडा तयार करण्यासाठी एमएमआरडीएने बेल्जिएम येथील एन. पी. ब्रिजिंग या कंपनीची नियुक्ती केली होती. या कंपनीने अलीकडेच आपला अहवाल एमएमआरडीएला सादर केल्याची माहिती वरिष्ठ सूत्राने दिली.मुंबईला पर्यायी शहर म्हणून नवी मुंबईची निर्मिती करण्यात आली. या दोन शहरांना जोडण्यासाठी सर्वप्रथम ठाणे खाडीपुलावर मानखुर्द-वाशी उड्डाणपूल उभारण्यात आला. शीव-पनवेल महामार्गावरील अत्यंत मोक्याच्या अशा या उड्डाणपुलामुळे मुंबई-पुणे-गोवा महामार्गावरील प्रवासही सोयीचा झाला. या पुलावरील वाहनांची वाढती गर्दी लक्षात घेऊन, जुन्या पुलास लागूनच आणखी एक नवा पूल उभारण्यात आला. त्यापाठोपाठ मुलुंड-ऐरोली पुलाची उभारणी करण्यात आली. त्यामुळे मुंबईतील मध्य उपनगरे नवी मुंबईच्या जवळ आली. अंधेरी ते बोरीवली यादरम्यान असलेल्या पश्चिम उपनगरांनाही पुणे-गोव्याच्या दिशेने जाण्यासाठी ऐरोली-मुलुंड पुलाचा वापर सोयीचा ठरला आहे. या पुलामुळे पूर्व-द्रुतगती महामार्गही नवी मुंबईपासून हाकेच्या अंतरावर आला आहे; परंतु हे दोन्ही खाडीपूल वाहतूककोंडीच्या जंजाळात सापडले असून, भविष्याची मागणी लक्षात घेऊन विक्रोळी- कोपरखैरणे दरम्यान, सुमारे दहा कि.मी. लांबीचा नवीन पूल उभारणीच्या दृष्टीने कार्यवाही सुरू ेकेल्याची माहिती सूत्राने दिली.विक्र ोळी-घाटकोपर येथून वाशीला लागून असलेल्या कोपरखैरणे उपनगरात हा पूल प्रवेश करणार आहे. त्यानंतर पुढे तो ठाणे-बेलापूर मार्गाला जोडला जाणार आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पार्श्वभूमीवर वाशी खाडीपुलावरील हा तिसरा पूल उपयुक्त ठरणार आहे. घाटकोपर, पवई, विक्रोळी, कांजुरमार्ग आणि भांडुप या विभागातून नवी मुंबई, पनवेलकडे जलद प्रवास करण्यासाठी हा पूल सोयीचा ठरणार आहे.पर्यावरण विभागाचा अडथळाही दूरमानखुर्द-वाशी आणि मुलुंड-ऐरोली या दोन खाडीपुलांना मधोमध असा हा पूल उभारला गेल्यास, त्यामुळे सागरी वाहतुकीचे काही प्रश्न उपस्थित होण्याची शक्यता सार्वजनिक बांधकाम विभागाने व्यक्त केली होती. त्यासाठी मेरिटाइम बोर्डाची विशेष परवानगी घेण्याचे सूचित करण्यात आले होते.तसेच खाडीपुलाच्या निर्मितीमुळे विक्रोळी आणि कोपरखैरणे या दोन्ही बाजूंकडील खारफुटीला धक्का लागणार आहे. यापैकी एमएमआरडीएला काही परवानग्या प्राप्त झाल्या आहेत. उर्वरित परवानग्यांची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असल्याचे समजते.