शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
2
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
3
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
4
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
5
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
6
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
7
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
8
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
9
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
10
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
11
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!
12
निवडणुका जवळ आल्यावर आमच्यावर आरोप होतात; आता आमची बदनामी झाली, अजित पवारांची खंत
13
Digital Gold SEBI: डिजिटल गोल्ड खरेदी असाल, तर थांबा! ऑनलाईन सोने खरेदी करणाऱ्यांना सेबीचा सावधगिरीचा इशारा
14
शशी थरूर यांनी अडवाणींचे कौतुक केले, नेहरू आणि इंदिरा गांधींबद्दल धक्कादायक विधान केले
15
FD सुरक्षित, पण श्रीमंत होण्यासाठी पुरेश नाही! जास्त परतावा हवा असल्यास 'हे' ५ पर्याय बेस्ट
16
...अन् ड्रग माफियाच्या घरात पैसे मोजायला बसले पोलिसवाले; सगळ्या १०, २०, ५० च्याच नोटा, २२ तास लागले
17
Video: 6,6,6,6,6,6,6...भारतीय क्रिकेटरनं रचला नवा इतिहास; अवघ्या ११ चेंडूत सर्वात जलद अर्धशतक
18
चीनमधून MBBS अन् तयार केले खतरनाक विष; गुजरातमध्ये पकडलेल्या ३ दहशतवाद्यांचा प्लॅन काय होता?
19
सामान्यांसाठी मोठा दिलासा! ऑक्टोबरमध्ये शाकाहारी आणि मांसाहारी थाळी स्वस्त; क्रिसीलचा अहवाल आला...
20
मुलीच्या जन्मापासून ते १० वीपर्यंत सरकार देतं आर्थिक मदत! 'या' वर्गातील कुटुंबांसाठी चालवली जाते योजना

विक्रोळी-कोपरखैरणे खाडीपूल दृष्टीपथात, एमएमआरडीएचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2017 06:44 IST

दहा वर्षांपूर्वी महापालिकेने आपल्या नियोजन आराखड्यात समावेश केलेला विक्रोळी-कोपरखैरणे खाडीपूल दृष्टीपथात आला आहे. एमएमआरडीएने त्या दृष्टीने पावले उचलायला सुरुवात केली आहे. दहा कि.मी. लांबीच्या या मार्गावर वाशी खाडीपुलावर दोन कि.मी. लांबीचा पूल बांधण्यात येणार आहे. त्यासाठी सुमारे १२00 कोटी रुपये खर्च अपेक्षित धरण्यात आला आहे.

 - कमलाकर कांबळे नवी मुंबई : दहा वर्षांपूर्वी महापालिकेने आपल्या नियोजन आराखड्यात समावेश केलेला विक्रोळी-कोपरखैरणे खाडीपूल दृष्टीपथात आला आहे. एमएमआरडीएने त्या दृष्टीने पावले उचलायला सुरुवात केली आहे. दहा कि.मी. लांबीच्या या मार्गावर वाशी खाडीपुलावर दोन कि.मी. लांबीचा पूल बांधण्यात येणार आहे. त्यासाठी सुमारे १२00 कोटी रुपये खर्च अपेक्षित धरण्यात आला आहे. २0२१पर्यंत हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प पूर्ण करण्याचे उद्दिष्ट्य एमएमआरडीएने ठेवले आहे.सध्या मुंबई-नवी मुंबई या दोन शहरांना हमरस्त्याने जोडणारे वाशी-मानखुर्द आणि मुलुंड-ऐरोली हे दोन खाडीपूल आहेत. या दोन उड्डाणपुलांवर वाहतुकीची मोठ्या प्रमाणात कोंडी होत आहे. भविष्यातील संभाव्य वाहतूककोंडीचा अंदाज घेऊन दहा वर्षांपूर्वी तिसºया खाडीपुलाचा प्रस्ताव समोर आला होता. महापालिकेने आपल्या नियोजन आराखड्यात या नवीन खाडीपुलाचा समावेश केला होता. राज्य सरकारनेही या प्रकल्पाला हिरवा कंदील दाखविला होता. त्यानुसार या पुलाच्या शक्यतेचा अभ्यास करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाची नियुक्ती केली होती. एका खासगी एजन्सीमार्फत या प्रकल्पाचा सविस्तर अभ्यास करून त्याचा अहवाल सादर करण्याचे आदेशही देण्यात आले होते. सार्वजनिक बांधकाम विभागाने विविध स्तरावर पाहणी करून, हा प्रकल्प अत्यावश्यक असल्याचा अहवाल दिला होता. त्यानुसार आता एमएमआरडीएने या नव्या खाडीपुलाच्या उभारणीसाठी पावले उचलायला सुरुवात केली आहे. या प्रस्तावित पुलाचा आराखडा तयार करण्यासाठी एमएमआरडीएने बेल्जिएम येथील एन. पी. ब्रिजिंग या कंपनीची नियुक्ती केली होती. या कंपनीने अलीकडेच आपला अहवाल एमएमआरडीएला सादर केल्याची माहिती वरिष्ठ सूत्राने दिली.मुंबईला पर्यायी शहर म्हणून नवी मुंबईची निर्मिती करण्यात आली. या दोन शहरांना जोडण्यासाठी सर्वप्रथम ठाणे खाडीपुलावर मानखुर्द-वाशी उड्डाणपूल उभारण्यात आला. शीव-पनवेल महामार्गावरील अत्यंत मोक्याच्या अशा या उड्डाणपुलामुळे मुंबई-पुणे-गोवा महामार्गावरील प्रवासही सोयीचा झाला. या पुलावरील वाहनांची वाढती गर्दी लक्षात घेऊन, जुन्या पुलास लागूनच आणखी एक नवा पूल उभारण्यात आला. त्यापाठोपाठ मुलुंड-ऐरोली पुलाची उभारणी करण्यात आली. त्यामुळे मुंबईतील मध्य उपनगरे नवी मुंबईच्या जवळ आली. अंधेरी ते बोरीवली यादरम्यान असलेल्या पश्चिम उपनगरांनाही पुणे-गोव्याच्या दिशेने जाण्यासाठी ऐरोली-मुलुंड पुलाचा वापर सोयीचा ठरला आहे. या पुलामुळे पूर्व-द्रुतगती महामार्गही नवी मुंबईपासून हाकेच्या अंतरावर आला आहे; परंतु हे दोन्ही खाडीपूल वाहतूककोंडीच्या जंजाळात सापडले असून, भविष्याची मागणी लक्षात घेऊन विक्रोळी- कोपरखैरणे दरम्यान, सुमारे दहा कि.मी. लांबीचा नवीन पूल उभारणीच्या दृष्टीने कार्यवाही सुरू ेकेल्याची माहिती सूत्राने दिली.विक्र ोळी-घाटकोपर येथून वाशीला लागून असलेल्या कोपरखैरणे उपनगरात हा पूल प्रवेश करणार आहे. त्यानंतर पुढे तो ठाणे-बेलापूर मार्गाला जोडला जाणार आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पार्श्वभूमीवर वाशी खाडीपुलावरील हा तिसरा पूल उपयुक्त ठरणार आहे. घाटकोपर, पवई, विक्रोळी, कांजुरमार्ग आणि भांडुप या विभागातून नवी मुंबई, पनवेलकडे जलद प्रवास करण्यासाठी हा पूल सोयीचा ठरणार आहे.पर्यावरण विभागाचा अडथळाही दूरमानखुर्द-वाशी आणि मुलुंड-ऐरोली या दोन खाडीपुलांना मधोमध असा हा पूल उभारला गेल्यास, त्यामुळे सागरी वाहतुकीचे काही प्रश्न उपस्थित होण्याची शक्यता सार्वजनिक बांधकाम विभागाने व्यक्त केली होती. त्यासाठी मेरिटाइम बोर्डाची विशेष परवानगी घेण्याचे सूचित करण्यात आले होते.तसेच खाडीपुलाच्या निर्मितीमुळे विक्रोळी आणि कोपरखैरणे या दोन्ही बाजूंकडील खारफुटीला धक्का लागणार आहे. यापैकी एमएमआरडीएला काही परवानग्या प्राप्त झाल्या आहेत. उर्वरित परवानग्यांची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असल्याचे समजते.