शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

नेरूळ -उरण रेल्वे प्रकल्प सुरू करण्यासाठी आमदारांचाच पाठपुराव्याचा दावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2024 17:52 IST

भाजपच्या जाहिरातीमुळे शिंदे गटातुन नाराजीचा सूर 

- मधुकर ठाकूर

उरण : उरण -नेरुळ रेल्वे प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यातील खारकोपर ते उरण रेल्वे मार्ग पाच वर्षांनी प्रवासी वाहतूकीसाठी खुला करण्यात येणार आहे. १२ जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या महत्वाकांक्षी प्रकल्पाच्या लोकार्पणाचा सोहळा पार पडणार आहे.या सोहळ्याची जाहिरात करताना मात्र भाजपचे महेश बालदी आणि प्रशांत ठाकूर यांच्या सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळेच रेल्वे प्रकल्प प्रवाशांसाठी सुरू होत आहे.या जाहिरातीत शिंदे गटाचे खासदार श्रीरंग बारणे यांचा कुठेही साधा उल्लेखही नसल्याने मात्र शिंदे गटातुन नाराजी व्यक्त केली जात आहे.

सिडको,मध्यरेल्वे यांच्या भागीदारीत २७ किमी लांबीचा आणि १७८२ कोटी खर्चाच्या नेरूळ -उरण महत्वाकांक्षी प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. यापैकी या पहिल्या टप्प्यातील २७ किमी लांबीच्या या रेल्वे मार्गावरील ११ स्थानकांपैकी नेरुळ,सीवूड,सागर संगम, बेलापूर, तरघर, बामणडोंगरी, खारकोपर अशा १२.५ किमी अंतरापर्यंत रेल्वे प्रवासी वाहतूक सुरू करण्यात आली आहे. त्यानंतर उर्वरित गव्हाण, रांजणपाडा, न्हावा-शेवा, द्रोणागिरी,उरण या स्टेशन दरम्यान १४.३ किमी लांबीच्या रेल्वे मार्गावरील दुसऱ्या टप्प्यातील रखडलेल्या कामातील विविध अडथळे दूर करण्यात आल्यानंतर रेल्वे मार्ग आता प्रवासी वाहतूकीसाठी तयार झाला आहे. याच रेल्वे प्रकल्पाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते १२ जानेवारी रोजी लोकार्पण होणार असल्याच्या जाहिरातीचे फ्लॅक्स सार्वजनिक ठिकाणी लागले आहेत.भाजपचे महेश बालदी आणि प्रशांत ठाकूर यांनी सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळेच रेल्वे प्रकल्प प्रवाशांसाठी सुरू होत असल्याचे या जाहिरातीमध्ये म्हटले आहे.या जाहिरातीमध्ये शिंदे गटाचे आणि मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी रेल्वे प्रकल्प सुरू करण्यासाठी केलेल्या कामाचा साधा उल्लेखही केला नाही.

पाठपुरावा, पत्रव्यवहार कुणी केला याची माहिती तर साऱ्यांनाच आहे.कुणी काय जाहिरात करावी हा ज्याचा त्याचा प्रश्न असल्याची सावध प्रतिक्रिया श्रीरंग बारणे यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केली आहे. भाजपच्या कुटनितीबाबत मात्र शिंदे गटाचे रायगड जिल्हा उपाध्यक्ष अतुल भगत यांनी नाराजी व्यक्त केली आहे.दिल्लीतील रेल्वे भवन, रेल्वे मंत्री यांच्याशी अनेकदा पत्रव्यवहार करून उरण- नेरुळ लवकरात लवकर प्रवासी वाहतूक सुरू करण्याबाबत खासदार श्रीरंग बारणे यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. असे असतानाही जाहिरातीमध्ये खासदारांचा साधा उल्लेखही केला नसल्याने अतुल भगत यांनी खेदही व्यक्त केला आहे.

टॅग्स :BJPभाजपाShiv Senaशिवसेना