शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
3
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
4
'त्या प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
5
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
6
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
7
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
8
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
9
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
10
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
11
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
12
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
13
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
14
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
15
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
16
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
17
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
18
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
19
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
20
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
Daily Top 2Weekly Top 5

नेरूळ -उरण रेल्वे प्रकल्प सुरू करण्यासाठी आमदारांचाच पाठपुराव्याचा दावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2024 17:52 IST

भाजपच्या जाहिरातीमुळे शिंदे गटातुन नाराजीचा सूर 

- मधुकर ठाकूर

उरण : उरण -नेरुळ रेल्वे प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यातील खारकोपर ते उरण रेल्वे मार्ग पाच वर्षांनी प्रवासी वाहतूकीसाठी खुला करण्यात येणार आहे. १२ जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या महत्वाकांक्षी प्रकल्पाच्या लोकार्पणाचा सोहळा पार पडणार आहे.या सोहळ्याची जाहिरात करताना मात्र भाजपचे महेश बालदी आणि प्रशांत ठाकूर यांच्या सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळेच रेल्वे प्रकल्प प्रवाशांसाठी सुरू होत आहे.या जाहिरातीत शिंदे गटाचे खासदार श्रीरंग बारणे यांचा कुठेही साधा उल्लेखही नसल्याने मात्र शिंदे गटातुन नाराजी व्यक्त केली जात आहे.

सिडको,मध्यरेल्वे यांच्या भागीदारीत २७ किमी लांबीचा आणि १७८२ कोटी खर्चाच्या नेरूळ -उरण महत्वाकांक्षी प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. यापैकी या पहिल्या टप्प्यातील २७ किमी लांबीच्या या रेल्वे मार्गावरील ११ स्थानकांपैकी नेरुळ,सीवूड,सागर संगम, बेलापूर, तरघर, बामणडोंगरी, खारकोपर अशा १२.५ किमी अंतरापर्यंत रेल्वे प्रवासी वाहतूक सुरू करण्यात आली आहे. त्यानंतर उर्वरित गव्हाण, रांजणपाडा, न्हावा-शेवा, द्रोणागिरी,उरण या स्टेशन दरम्यान १४.३ किमी लांबीच्या रेल्वे मार्गावरील दुसऱ्या टप्प्यातील रखडलेल्या कामातील विविध अडथळे दूर करण्यात आल्यानंतर रेल्वे मार्ग आता प्रवासी वाहतूकीसाठी तयार झाला आहे. याच रेल्वे प्रकल्पाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते १२ जानेवारी रोजी लोकार्पण होणार असल्याच्या जाहिरातीचे फ्लॅक्स सार्वजनिक ठिकाणी लागले आहेत.भाजपचे महेश बालदी आणि प्रशांत ठाकूर यांनी सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळेच रेल्वे प्रकल्प प्रवाशांसाठी सुरू होत असल्याचे या जाहिरातीमध्ये म्हटले आहे.या जाहिरातीमध्ये शिंदे गटाचे आणि मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी रेल्वे प्रकल्प सुरू करण्यासाठी केलेल्या कामाचा साधा उल्लेखही केला नाही.

पाठपुरावा, पत्रव्यवहार कुणी केला याची माहिती तर साऱ्यांनाच आहे.कुणी काय जाहिरात करावी हा ज्याचा त्याचा प्रश्न असल्याची सावध प्रतिक्रिया श्रीरंग बारणे यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केली आहे. भाजपच्या कुटनितीबाबत मात्र शिंदे गटाचे रायगड जिल्हा उपाध्यक्ष अतुल भगत यांनी नाराजी व्यक्त केली आहे.दिल्लीतील रेल्वे भवन, रेल्वे मंत्री यांच्याशी अनेकदा पत्रव्यवहार करून उरण- नेरुळ लवकरात लवकर प्रवासी वाहतूक सुरू करण्याबाबत खासदार श्रीरंग बारणे यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. असे असतानाही जाहिरातीमध्ये खासदारांचा साधा उल्लेखही केला नसल्याने अतुल भगत यांनी खेदही व्यक्त केला आहे.

टॅग्स :BJPभाजपाShiv Senaशिवसेना