शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
3
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
4
मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
5
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
6
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
7
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर
8
BMC School: १३ वर्षांत मुंबई महापालिकेच्या १३१ मराठी शाळा बंद!
9
मुलांच्या उच्च शिक्षणाची चिंता सतावतेय? SIP, SSY आणि PPF मधून करा करोडपती होण्याची तयारी!
10
गुरुचरित्रात ‘असे’ येते गणेशाचे अद्भूत वर्णन; बाप्पाच्या महात्म्याचा संदर्भ कुठे, कसा येतो?
11
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
12
'मम्मीने दरवाजा उघडला, काशी काका आता आले अन्...'; 9 वर्षाच्या मुलाने सांगितले कशी झाली बापाची हत्या?
13
'आता पुन्हा शरद पवारांकडे जायचे नाही, असं ठरवलंय'; पवारांचा निष्ठावंत दुखावला, बळीराम काका साठेंनी मन केलं मोकळं
14
Swami Samartha: 'भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे' हे स्वामींचे वचन; पण आहे 'ही' एक अट!
15
रोहित शर्माच्या पत्नीचा पाठलाग करत घरापर्यंत पोहोचला, फोटोही काढू लागला, पाहतात रितिकाचा राग अनावर, त्यानंतर...  
16
हिंदी सक्तीवरून राज ठाकरेंचं महाराष्ट्रातील शाळांच्या मुख्याध्यापकांना खुलं पत्र, वाचा जसच्या तसं...
17
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!
18
Mumbai: नियोजनाच्या अभावामुळे विक्रोळीत वाहतूककोंडी
19
Israel Iran War : 'मोसाद'ची नवीन खेळी!, इराण अलर्टवर, नागरिकांना मोबाईलमधून WhatsApp डिलिट करण्याचे आदेश
20
दूधवाल्याची चूक अन् छत्रपती संभाजीनगरजवळ कारसह दोन बस एकमेकांवर धडकल्या

नेरूळ -उरण रेल्वे प्रकल्प सुरू करण्यासाठी आमदारांचाच पाठपुराव्याचा दावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2024 17:52 IST

भाजपच्या जाहिरातीमुळे शिंदे गटातुन नाराजीचा सूर 

- मधुकर ठाकूर

उरण : उरण -नेरुळ रेल्वे प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यातील खारकोपर ते उरण रेल्वे मार्ग पाच वर्षांनी प्रवासी वाहतूकीसाठी खुला करण्यात येणार आहे. १२ जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या महत्वाकांक्षी प्रकल्पाच्या लोकार्पणाचा सोहळा पार पडणार आहे.या सोहळ्याची जाहिरात करताना मात्र भाजपचे महेश बालदी आणि प्रशांत ठाकूर यांच्या सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळेच रेल्वे प्रकल्प प्रवाशांसाठी सुरू होत आहे.या जाहिरातीत शिंदे गटाचे खासदार श्रीरंग बारणे यांचा कुठेही साधा उल्लेखही नसल्याने मात्र शिंदे गटातुन नाराजी व्यक्त केली जात आहे.

सिडको,मध्यरेल्वे यांच्या भागीदारीत २७ किमी लांबीचा आणि १७८२ कोटी खर्चाच्या नेरूळ -उरण महत्वाकांक्षी प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. यापैकी या पहिल्या टप्प्यातील २७ किमी लांबीच्या या रेल्वे मार्गावरील ११ स्थानकांपैकी नेरुळ,सीवूड,सागर संगम, बेलापूर, तरघर, बामणडोंगरी, खारकोपर अशा १२.५ किमी अंतरापर्यंत रेल्वे प्रवासी वाहतूक सुरू करण्यात आली आहे. त्यानंतर उर्वरित गव्हाण, रांजणपाडा, न्हावा-शेवा, द्रोणागिरी,उरण या स्टेशन दरम्यान १४.३ किमी लांबीच्या रेल्वे मार्गावरील दुसऱ्या टप्प्यातील रखडलेल्या कामातील विविध अडथळे दूर करण्यात आल्यानंतर रेल्वे मार्ग आता प्रवासी वाहतूकीसाठी तयार झाला आहे. याच रेल्वे प्रकल्पाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते १२ जानेवारी रोजी लोकार्पण होणार असल्याच्या जाहिरातीचे फ्लॅक्स सार्वजनिक ठिकाणी लागले आहेत.भाजपचे महेश बालदी आणि प्रशांत ठाकूर यांनी सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळेच रेल्वे प्रकल्प प्रवाशांसाठी सुरू होत असल्याचे या जाहिरातीमध्ये म्हटले आहे.या जाहिरातीमध्ये शिंदे गटाचे आणि मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी रेल्वे प्रकल्प सुरू करण्यासाठी केलेल्या कामाचा साधा उल्लेखही केला नाही.

पाठपुरावा, पत्रव्यवहार कुणी केला याची माहिती तर साऱ्यांनाच आहे.कुणी काय जाहिरात करावी हा ज्याचा त्याचा प्रश्न असल्याची सावध प्रतिक्रिया श्रीरंग बारणे यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केली आहे. भाजपच्या कुटनितीबाबत मात्र शिंदे गटाचे रायगड जिल्हा उपाध्यक्ष अतुल भगत यांनी नाराजी व्यक्त केली आहे.दिल्लीतील रेल्वे भवन, रेल्वे मंत्री यांच्याशी अनेकदा पत्रव्यवहार करून उरण- नेरुळ लवकरात लवकर प्रवासी वाहतूक सुरू करण्याबाबत खासदार श्रीरंग बारणे यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. असे असतानाही जाहिरातीमध्ये खासदारांचा साधा उल्लेखही केला नसल्याने अतुल भगत यांनी खेदही व्यक्त केला आहे.

टॅग्स :BJPभाजपाShiv Senaशिवसेना