शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात पाऊल ठेवताच पुतिन यांना मिळाले मोठे सरप्राइज; PM मोदींच्या निर्णयाने झाले आश्चर्यचकित
2
बीएलओंची समस्या आता दूर होणार; SIR प्रक्रियेबाबत सुप्रीम कोर्टाने दिले महत्त्वाचे निर्देश
3
'माझ्या मित्राचे स्वागत करुन आनंद झाला', पीएम मोदी अन् पुतिन यांचा पुन्हा एकाच कारने प्रवास
4
 "SIR ची काही आवश्यकताच नाही, सरकारनं फक्त...!"; प्रवीण तोगडिया यांचं मोठं विधान
5
अभिमानास्पद! PM मोदींनी पुतिन यांना दिली अत्यंत खास भेट; जगात लाखो लोकांना आजही प्रेरणादायी
6
Aurus Senat सोडून फॉर्च्यूनरमध्ये सोबत बसले मोदी-पुतिन, काय आहे या प्रसंगाचं 'चीन कनेक्शन'?
7
पुतिन भारतात दाखल, पंतप्रधान मोदींकडून स्वागत; शिखर परिषदेकडे संपूर्ण जगाचे बारकाईने लक्ष  
8
“राहुल गांधींची विधाने बेजबाबदारपणाची”; भाजपाचा पलटवार, पुतिन भेटीवरून केली होती टीका
9
IPL 2026 : कोट्यवधीचं पॅकेज हवं; पण पूर्णवेळ काम नको! ५ क्रिकेटरपैकी एकाने काढलाय लग्नाचा मुहूर्त
10
पुतिन भारतात पोहोचण्यापूर्वीच मोठी बातमी येऊन धडकली, 2 अब्ज डॉलरच्या डीलवर शिक्कामोर्तब; पाक-चीनची झोप उडणार!
11
रेल्वेत 1.20 लाखांहून अधिक पदांची भरती; रेल्वेमंत्र्यांनी लोकसभेत दिली महत्वाची माहिती...
12
विराट कोहली, रोहित शर्मा दोघेही 'दादा' क्रिकेटर, त्यांच्या नादाला लागाल तर...- रवी शास्त्री
13
प्रेयसीला घरी भेटायला गेला अन् रंगेहाथ पकडला!अर्ध्यातच सोडून मित्रांनी पळ काढला; मग जे घडलं त्याची कुणी कल्पनाही केली नसेल!
14
पुतिन यांचे विमान भारतीय हवाई हद्दीत; रशियाची लढाऊ विमाने माघारी फिरली...
15
AUS vs ENG Ashes Test : एकाच वेळी दोघे कॅचसाठी झेपावले; धडक झाली, पण कॅरीनं चेंडू पकडला अन्...
16
170 अब्ज डॉलर्सचे व्हॅल्युएशन, 38000 कोटी उभारण्याची तयारी; कधी येणार Jio IPO?
17
डॉ. गौरी पालवे-गर्जे मृत्यू प्रकरण: आई-वडील CM फडणवीसांना भेटले; उच्चस्तरीय चौकशीची मागणी
18
आता घ्यायची तर १०० टक्के इथेनॉलवर चालणारीच कार घ्या...; गडकरी बसले, म्हणाले '२५ रुपये लीटर...'
19
मुंबई-गोवा महामार्गाचा मुद्दा पुन्हा संसदेत, मविआ खासदारांचे प्रश्न; नितीन गडकरी म्हणाले...
20
“१७५ जागा आल्या, तर भाजपाने बेईमानी करून निवडणुका जिंकल्या हे सिद्ध होईल”; कुणी केला दावा?
Daily Top 2Weekly Top 5

यांत्रिक युगात बैलगाडीचे अस्तित्व धोक्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2019 23:44 IST

खिल्लारी जोडीही दुर्मीळ; ग्रामीण भागातील पशुधन नष्ट होण्याची भीती

- विनोद भोईर 

पाली : सुधागड तालुका व रायगड जिल्ह्यासह संपूर्ण कोकणात व इतरत्र शेती व्यवसाय मोठ्या प्रमाणावर चालतो. अशातच शेतीशी निगडित असे वाहतुकीचे महत्त्वाचे साधन असलेली बैलगाडी शेतकऱ्यांसाठी मोलाची आहे. मात्र, बदलत्या तंत्रयुक्त व यांत्रिकीकरणाच्या काळात ग्रामीण भागातून बैलगाड्या नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. याबरोबरच घराघरांत दिसणारी सर्जा-राजाची खिल्लारी जोडीही दुर्मीळ झाली आहे.

देशी जनावरांबाबत सरकारची अनास्था दिसून येत आहे. बैलगाडी शर्यतीवरील बंदी व सततचा दुष्काळ यामुळे खिलार गाय, बैल नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. एकूणच दोन दशकांपासून पशुधन नष्ट होत असल्याची आकडेवारी समोर येत असून, पशुधन वाचविण्याचीजबाबदारी आता शेतकºयाबरोबरच पर्यावरणप्रेमी व नागरिकांवर आली आहे. एकेकाळी बैलगाड्यांची सफर म्हणजे जणू हवाई सफरीचा आनंद मिळायचा.

शेत, शिवारासह दुर्गम, डोंगराळ भाग, तसेच नागमोडी वळणावरून खडकाळ चिखल मातीच्या रस्त्यावरून सुसाट धावणाºया बैलगाड्या काळाच्या ओघात नजरेस पडणे, दुर्मीळ झाल्या आहेत. काही वर्षांपूर्वी रस्त्यांचा विकास झाला नव्हता, त्या वेळेस बैलगाडी हे दळणवळणाचे व वाहतुकीचे मुख्य साधन मानले जायचे. इतर वाहनांची संख्या हाताच्या बोटावर मोजण्याइतपतच होती.

एखादे वाहन गाव-खेड्यापाड्यात दाखल झाले तर ते बघण्यासाठी गर्दी जमायची. अशा काळात बैलगाडीला महत्त्वाचे स्थान होते. त्यामुळे ज्याच्या घरात बैलगाडी त्या घराला प्रतिष्ठा मिळत असे. विशिष्ट कार्यक्रम सोहळ्यात बैलगाडीचा वापर मोठ्या प्रमाणात होत असे. नवरदेवाची मिरवणूक, जयंती असो की पालखी सोहळा, बैलगाडीचाच वापर होत असे. शेतीसाठी आवश्यक साहित्य बाजारातून आणणे, तसेच धान्य खरेदी-विक्री करणे, या कामात बैलगाडीचा मोठा वापर होत असे.

बैलगाडी बनविण्यासाठी साधारणत: दहा ते बारा हजार रुपये खर्च व्हायचा. यामध्ये कारागीर व सुताराला मजुरीदेखील मिळायची. शेतकºयाच्या मागणीनुसार लाकडाच्या वापराने सुबक, मजबूत व कलाकुसर करून बैलगाड्या बनविल्या जायच्या. अशा बैलगाडीतून जत्रा, बाजार व दूरवरचा फेरफटका म्हणजे आगळी वेगळी पर्वणीच. त्यानंतर लोखंडी बैलगाड्या बनविण्यास सुरुवात झाली. रस्त्यांचे जाळे वाढल्याने शेतकऱ्यांकडे ट्रॅक्टर, रिक्षा, टॅम्पो व इतर मालवाहतुकीची साधने आल्याने बैलगाडी काळाच्या ओघात मागे पडली.प्रोत्साहानासाठी विशेष प्रयत्न व्हावेत

कालांतराने येणाºया पिढीला ज्याप्रमाणे पशूपक्षी व प्राणी पुस्तकात पाहवे लागतात. त्याप्रमाणे बैलगाडीही पुस्तकात पाहवी लागेल, असे दिसते. त्यामुळे शासनाने गाय, बैल व अन्य जनावरांची संख्या वाढविण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. तसेच रोडावलेल्या बैलांची व बैलगाड्यांची संख्या वाढविण्यासाठी तसेच शेतकºयांना प्रोत्साहन देण्यासाठी शासनाने विशेष प्रयत्न करावेत, अशी मागणी होत आहे.वेगवान वाहनांच्या वापराने जलद वाहतूक होऊ लागली आणि हळूहळू शेतीच्या कामासह दळणवळणाच्या कामातही बैलगाडीचा वापर कमी होत गेला. आता रस्त्यावर कधीतरी एखादी बैलगाडी दिसते. त्यामुळे शहरातून गावाकडे येणारी बच्चेकंपनी कुतूहलाने बैलगाडी सफरीचा आनंद घेताना दिसतात. याशिवाय काही ठिकाणी घोडेस्वारी, उंटाच्या सफारीप्रमाणे बफोलो राइडची सुविधाही उपलब्ध केली जात आहे.

टॅग्स :Raigadरायगड