शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
2
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
3
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
4
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
5
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
6
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
7
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
8
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
9
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
10
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
11
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
12
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
13
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
16
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
17
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
18
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
19
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
20
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या

मावळ, रायगडमध्ये पक्षांतर्गत नाराजीचा सूर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2019 02:01 IST

मावळमधून सेनेने दोन वेळा लोकसभेत प्रतिनिधित्व केले आहे. २००९ मध्ये गजानन बाबर यांनी राष्ट्रवादीच्या आझम पानसरे यांना पराभव केला

उरण : साडेचार वर्षांत एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्यानंतरही लोकसभा निवडणुकीत सेना-भाजपची अखेर युती झाली खरी. मात्र, सेना-भाजपकडून झालेल्या परस्परांविरोधी चिखलफेकीमुळे दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये अद्याप मनोमिलन झालेले दिसत नाही. त्यामुळे मावळ आणि रायगड लोकसभा मतदारसंघात सेना-भाजप महायुतीचे उमेदवार अनुक्रमे श्रीरंग बारणे व केंद्रीय मंत्री अनंत गीते यांना स्वपक्षीय कार्यकर्त्यांच्या नाराजीचा सामना करावा लागत आहे.

मावळमधून सेनेने दोन वेळा लोकसभेत प्रतिनिधित्व केले आहे. २००९ मध्ये गजानन बाबर यांनी राष्ट्रवादीच्या आझम पानसरे यांना पराभव केला. मात्र, केंद्रात विरोधक सत्तेवर असल्याने मावळ मतदार संघातील विकासकामे बाबर यांना करणे शक्य झाले नाही.२०१४ मध्ये झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत शेकापच्या लक्ष्मण जगताप यांना पराभूत करून मावळचा किल्ला श्रीरंग बारणे यांनी सर केला होता. खरं तर मोदी लाटेवर आरूढ होऊनच बारणे यांच्या गळ्यात विजयाची माळ पडली होती. तसेच केंद्रातही सेना-भाजपची स्वबळावर सत्ताही स्थापन झाली.सत्तेची जोड मिळाल्यामुळे खासदार बारणे यांच्याबद्दल उरण, पनवेल, कर्जत, मावळ, पिंपरी, चिंचवड या सहा विधानसभा मतदार संघातील जनतेच्या अपेक्षा चांगल्याच उंचावल्या होत्या. मात्र, मावळ, पिंपरी, चिंचवड या विधानसभा मतदार संघातील जनतेचे प्रश्न सोडविण्यात यश आले की नाही, हे जनताच सांगू शकेल. उरण, पनवेल, कर्जत विधानसभा मतदार संघात विकासाची फारशी कामेच केली नसल्याने बारणे यांना संसदरत्न पुरस्काराच्या मुद्द्यावरच प्रचारात भर देण्यास सुरु वात केली आहे. या तिन्ही विधानसभा मतदार संघात झालेल्या बहुतांश विकासकामांचे श्रेय मागील साडेचार वर्षांत सेना-भाजपमध्ये आलेल्या वितुष्टांमुळे खरं तर पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच जाते. मात्र, भाजपाच्या श्रेयावर आता सेना पोळी भाजत असल्याचे चित्र समोर आले आहे़

टॅग्स :Anant Geeteअनंत गीतेraigad-pcरायगडmaval-pcमावळ