शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
3
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
4
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
5
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
6
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
7
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
8
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
9
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
10
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
11
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
12
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
13
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
14
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
15
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
16
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
17
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
18
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
19
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
20
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
Daily Top 2Weekly Top 5

स्वार्थासाठी अनेकांचा स्वाभिमान गहाण; आनंदराज आंबेडकर यांची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2024 07:09 IST

देशात असलेल्या आताच्या सरकारमुळे संविधान धोक्यात

महाड : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वाभिमानाने जगण्याची शिकवण दिली. मात्र, स्वाभिमान गहाण ठेवून अनेकजण आपला स्वार्थ साधत आहेत, अशी टीका रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांनी बुधवारी महाड येथे केली, मनुस्मृती दहन दिनाचा ९७ वा स्मृतिदिन बौद्धजन पंचायत समिती आणि विकास वंचित महिला मंडळाच्या वतीने महाडमध्ये साजरा करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.

देशात असलेल्या आताच्या सरकारमुळे संविधान धोक्यात आले असून, बाबासाहेबांनी लिहिलेली राज्यघटना बदलण्याचे षडयंत्र रचले जात आहे, असा आरोप त्यांनी केला. यावेळी त्यांनी स्थानिक कार्यकर्त्यांवर नाराजी व्यक्त केली. मनुस्मृती दहन दिन आणि चवदार तळे सत्याग्रह स्मृतिदिन या दोन्ही कार्यक्रमांना स्थानिक भूमिपुत्रांची उपस्थिती कमी असते, हे प्रकर्षाने जाणवते, असे सांगितले. महिला परिवर्तन घडवून आणतात. परंतु त्याच महिलांनी या राज्यात मनुवाद्यांना निवडून दिले, असा घणाघात करत आपल्याला एक होऊन लढा दिला पाहिजे, असे मत व्यक्त केले. यावेळी वंचित विकास महिला मंडळाच्या डॉ. प्रमिला संपत यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. 

टॅग्स :Raigadरायगड