शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
2
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
3
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
4
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
5
Infosys ADR News: इन्फोसिसच्या एडीआरमध्ये ४० टक्क्यांची तेजी; ट्रेडिंगही थांबवलं, पाहा नक्की काय आहे प्रकरण
6
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
7
ठाकरेंना जय महाराष्ट्र, भाजपचा आणखी एक धक्का! लोकसभा लढवणारे संजोग वाघेरेंचा मोठा निर्णय
8
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
9
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
10
मल्लिका शेरावतने डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत व्हाईट हाऊसमध्ये केलं ख्रिसमस डिनर; फोटो केले शेअर
11
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
12
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
13
"मी शाहरुख खान, कृपया मला कॉल कर...", राधिकाला आलेला किंग खानचा मेसेज; म्हणाली...
14
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
15
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
16
अयोध्या राम मंदिरात ७० नवे पुजारी घेतले जाणार, ट्रस्टचा निर्णय; परिसरातील मंदिरात सेवा करणार
17
२१ डिसेंबर रोजी सुरु होणार पौष मास 'भाकड मास' का म्हटला जातो? शुभ कार्यालाही लागतो विराम!
18
पतीनं पत्नीकडून घरखर्चाचा हिशोब मागणं क्रूरता?; सुप्रीम कोर्टाने सुनावला महत्त्वाचा निकाल
19
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
20
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
Daily Top 2Weekly Top 5

महावितरणवर हल्लाबोल; शहरातील बंदोबस्तात वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2019 23:01 IST

लाखो नागरिक आज अधिकाऱ्यांना घालणार घेराव

अलिबाग : महावितरण कंपनीने वेळोवेळी भारनियमन करून दुरुस्तीची कामे केल्याचा दावा करूनही सातत्याने वीजपुरवठा खंडित होत आहे. त्यामुळे लाखो नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत असल्याने नागरिक कमालीचे संतप्त झाले आहेत. नागरिकांच्या मनातील खदखद दूर करण्यासाठी अलिबाग शिवसेना रस्त्यावर उतरून अलिबागमधील महावितरणच्या अधिकाऱ्यांना सोमवारी घेराव घालणार आहे. या पार्श्वभूमीवर शहरात पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे.पावसाळ्यापूर्वीची तयारी म्हणून महावितरणने दुरुस्तीच्या नावावर सहा-सहा तासांचे भारनियमन केले होते. मान्सूनपूर्व पाऊस बरसल्याने महावितरणच्या कारभाराची लक्तरे उघडी पडली. सकाळ, दुपार, संध्याकाळ आणि रात्रीही विजेचा लपंडाव सुरूच आहे. दुरुस्तीची कामे करूनही आठ-आठ तास वीज गायब होत असल्याने नागरिकांना भलताच मनस्ताप सहन करावा लागत आहे. दुरुस्तीची कामे पूर्ण करूनही तारा तुटणे, पोल पडणे, विजेच्या तारांवर झाडे कोसळणे, कंडक्टर तुटणे, डीपीमध्ये बिघाड होणे हे चक्र सातत्याने सुरूच आहे.अखंड वीजपुरवठा देण्यात महावितरण अपयशी ठरत असली तरी विजेचे बिल मात्र न चुकता आणि वेळेवर येत आहेत. दुपारी वीजपुरवठा खंडित होत असल्यामुळे विविध व्यावसायिकांचे चांगलेच हाल होत आहेत, तर रात्री वीज गायब होत असल्याने उकाड्यामुळे नागरिकांचेही हाल होत आहेत. याचा सर्वाधिक त्रास महिला, लहान मुले आणि वयोवृद्धांना अधिक सोसावा लागत आहे.वीज गेल्यावर महावितरणच्या तक्रार निवारण कक्षात फोेन केल्यावर तो लागत नाही आणि चुकून लागलाच तर समोरून उडवाउडवीची उत्तरे मिळतात. त्यामुळे नागरिकांचा पारा स्वाभाविकपणे वर चढतो. अधिकाºयांना फोन केला तर ते अनोळखी फोन उचलत नसल्याचे काहींचे म्हणणे आहे. त्यामुळे वीजपुरवठा कशामुळे खंडित झाला आहे. तो कधी पूर्ववत होणार आहे याची काहीच माहिती मिळत नसल्याने नागरिकांमध्ये महावितरणच्या विरोधात प्रचंड असंतोष आहे; परंतु प्रत्येक नागरिकांना महावितरणच्या कार्यालयावर धडक देता येणार नाही. हे गृहित धरून अलिबाग शिवसेनेचे तालुकाप्रमुख राजा केणी यांनी सोमवारी अलिबाग येथील महावितरणच्या कार्यालयावर धडक देणार असल्याचे स्पष्ट केले.मोर्चामध्ये शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख महेंद्र दळवी, सहसंपर्कप्रमुख सुरेंद्र म्हात्रे, विजय कवळे, कामगार नेते दीपक रानवडे यांच्यासह अन्य नेते उपस्थित राहणार आहेत. शिवसेनेच्या या आंदोलनामुळे महावितरण कार्यालयाच्या परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात केल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. दरम्यान, तीन महिन्यांवर विधानसभेच्या निवडणुका येऊन ठेपल्या आहेत. तसेच चेंढरे आणि वरसोली ग्रामपंचायतीची निवडणूक २३ जून रोजी पार पडणार आहे. त्या पार्श्वभूमीवर जनतेच्या ज्वलंत प्रश्नांसाठी लढा देऊन राजकीय फायदा घेण्याचा प्रयत्न शिवसेना करत असल्याची चर्चा तालुक्यात सुरू आहे.अधिकाºयाकडून नेहमीच उडवाउडवीची उत्तरेसातत्याने वीजपुरवठा खंडित होत असल्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. नागरिकांना उडवाउडवीची उत्तरे दिली जातात. आठ तासांचे भारनियमन करून दर मंगळवारी महावितरण दुरुस्तीची कामे हाती घेत असताना वीज जातेच कशी, असा सवाल राजा केणी यांनी उपस्थित केला आहे. अलिबाग-पेण तालुक्यातील सुमारे ६० हजार ग्राहकांसह रायगड जिल्ह्यातील अन्य तालुक्यातील लाखो ग्राहकांना हा रोजचाच त्रास झाला आहे. सर्वसामान्य नागरिकांना महावितरण दाद लागू देत नाही. त्यामुळे शिवसेनेच्या स्टाइलने महावितरणच्या अधिकाºयांना जाब विचारण्यात येणार असल्याचे तालुकाप्रमुख राजा केणी यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

टॅग्स :mahavitaranमहावितरण